आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌Mahsul Guru📌

कुळकायदा विषयक प्रश्‍नोत्तरे" 26 to 51


· प्रश्‍न २६: अनेक वर्ष पड असलेली शेतजमीन बिगर शेतकरी व्‍यक्‍ती खरेदी करु शकतो काय?
F उत्तर: नाही, कोणतीही शेतजमीन जोपर्यंत कायदेशीरपणे अकृषीक होत नाही तो पर्यंत ती शेतजमीन या संज्ञेतच येते. आणि कुळकायदा कलम ६३ अन्‍वये बिगर शेतकरी व्‍यक्‍ती, शेतजमीन खरेदी करु शकत नाही. जमीन अनेक वर्ष पड आहे म्‍हणून ती आपोआप बिनशेती होत नाही.

· प्रश्‍न २७: कु.का. कलम ८४ क अन्वये कारवाई पात्र म्‍हणजे काय?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३ अन्‍वये, शेतकरी नसलेल्‍या व्‍यक्‍तीला महाराष्‍ट्र राज्‍यात शेतजमीन खरेदी खरेदी करता येत नाही. असे हस्‍तांतरण किंवा संपादन विधिअग्राह्‍य ठरून अशी जमीन कलम ८४ क अन्वये सरकार जमा करता येते. आणि कलम ८४ कक अन्‍वये अशा जमिनीची विल्‍हेवाट लावता येते.
कलम ८४ क अन्वये करण्‍यात येणारी कार्यवाही, खरेदी दिनांकापासून एक वर्षाच्‍या कालावधीत करावी अशा सूचना अनेक न्‍यायालयीन निर्णयात दिल्‍या गेल्‍या आहेत. (मौजीभाई धारसीभाई वि. गुजरात राज्‍य, १९९४(२), गुजरात लॉ रिपो. ११६८ ; एम.डी.कवी वि. फातिमाबाई इब्राहिम, १९९७(६) एस.सी.सी. ७१ ; मणीबेन वि. गुजरात राज्‍य, ए.आय.आर. १९९१, गुजरात १८४ ; अप्‍पा दादु वि. राज्‍य, २०११(२), महा. लॉ जर्नल ७३९)   

· प्रश्‍न २८: वतन/इनाम जमिनींना कुळवहिवाट अधिनियमाच्‍या तरतुदी लागू होतात काय?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ८८-कअ अन्‍वये, शासनाला विशेष/उपयुक्‍त सेवा दिल्‍याचा मोबदला म्‍हणून प्रदान करण्‍यात आलेल्‍या वतन/इनाम जमिनीस, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमातील कलम ३२ ते ३२-र, ३३-अ,ब,क च्‍या तरतुदी लागू होत नाहीत. तसेच कुळवहिवाट अधिनियमातील कलम ८८-कब अन्‍वये सरंजाम म्‍हणून धारण केलेल्‍या जमिनीस, कलम ३२ ते ३२-र च्‍या तरतुदी लागू होत नाहीत.
कलम ८८-कअ ची तरतुद फक्‍त शासनास उपयुक्‍त सेवा दिल्‍याचा मोबदला म्‍हणून प्रदान करण्‍यात आलेल्‍या जमिनीसच लागू आहे. इतर कारणांसाठी इनाम म्‍हणून दिलेल्‍या जमिनींसाठी नाही.

· प्रश्‍न २९: शासनाच्‍या मालकीच्‍या जमिनींना कुळवहिवाट अधिनियमाच्‍या तरतुदी लागू होतात काय?
F उत्तर: नाही, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ८८-१-अ अन्‍वये, शासनाच्‍या मालकीच्‍या किंवा शासनाकडून पट्‍ट्‍याने धारण केलेल्‍या, कलम ८८-१-ब अन्‍वये, शासनाने राजपत्रातील अधिसूचनेन्‍वये कृषीतर किंवा औद्‍योगिक विकासासाठी विनिर्दिष्‍ट केलेल्‍या जमिनी, कलम ८८-१-क अन्‍वये, पाल्‍य अधिनियम, १८९० अन्‍वये पालक म्‍हणून नेमलेल्‍या शासकीय अधिकार्‍याच्‍या व्‍यवस्‍थापनाखालील जमिनी यांना कुळवहिवाट अधिनियमातील कलम १ ते ८७ लागू होणार नाहीत.
देवस्‍थान इनामाच्‍या जमिनीला कुळकायदा कलम ८८-१-अ लागू होणार नाही कारण देवस्‍थानच्‍या जमिनी शासनास उपयुक्‍त सेवा दिल्‍याचा मोबदला म्‍हणून प्रदान करण्‍यात आलेल्‍या नसतात. (कचरू लखू अहेर वि. मसजीद मानवर देवस्‍थान, १९९० महा. लॉ जर्नल-४४०) 


· प्रश्‍न ३०: ज्‍या व्‍यक्‍तीची जमीन, सार्वजनिक कामासाठी संपादित झाली त्‍याला शेतकरी मानावे काय?
F उत्तर: होय, जर एखाद्या व्‍यक्‍तीची जमीन सार्वजनिक कामासाठी संपादित झाली असेल तर महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६३ अन्वये त्‍याला, अशा संपादनासाठी त्‍याच्‍या जमिनीचा कब्जा घेतल्याच्या तारखेपासून १० वर्षेपर्यंत ती व्‍यक्‍ती शेतकरी असल्याचे मानण्यात येत होते. या कलमात दिनांक २७.५.२०१४ च्‍या शासन राजपत्रानुसार सुधारणा होऊन उपरोक्‍त व्‍यक्‍तीच्‍या वारसांनाही शेतकरी मानण्यात यावे अशी सुधारणा केली आहे.

· प्रश्‍न ३१: इतर राज्यातील शेतकरी महाराष्ट्रात जमीन खरेदी करू शकतो काय?
F उत्तर: होय, अशा व्‍यक्‍तीने सादर केलेला शेतकरी पुरावा, पत्रासह तहसिलदार कार्यालयात पाठवा. तहसिलदार पत्राद्‍वारे संबंधीत राज्‍यातील संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून या पुराव्याच्या खरेपणाबाबत दाखला मागवतील. असा दाखला प्राप्त होईपर्यंत फेरफार नोंद, तसा शेरा नमुद करून प्रलंबित ठेवता येते.

· प्रश्‍न ३२: पत्‍नीच्‍या नावे असणार्‍या जमिनीवर पती कुळ म्‍हणून दावा करू शकतो काय?
F उत्तर: नाही, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ४ मध्‍ये कुळाची व्‍याख्‍या दिलेली आहे. त्‍यानूसार जमीन मालकाच्या कुटुंबातील सदस्‍य कुळ ठरू शकत नाही.
पत्‍नीच्‍या नावे असणारी जमीन पती वहिवाटत असेल तर तो कुळ ठरणार नाही. (अप्‍पालाल उर्फ इस्‍माईल इब्राहम वि. आबा गिराज मुल्‍ला (१९९९, खंड १०१(३) बॉम्‍बे एल. आर. ३८८).

· प्रश्‍न ३३: एका खातेदार अविवाहित महिलेच्‍या नावे शेतजमीन आहे. तिचा विवाह बिगर शेतकरी व्‍यक्‍तीशी झाल्‍यास  तिचा पती शेतकरी मानला जाईल काय?
F उत्तर: नाही, महिलेचा शेतकरी दर्जा फक्‍त विवाहामुळे तिच्‍या पतीला प्राप्‍त होणार नाही. कारण त्‍या महिलेचा पती 'शेतकरी कुटुंबाचा' सदस्‍य होत नाही.


· प्रश्‍न ३४: 'कृषी' जमिन म्‍हणजे काय?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(१) मध्‍ये 'कृषी' ची व्‍याख्‍या दिलेली आहे. 'कृषी' या संज्ञेत फलोत्‍पादन, पिके काढणे यांचा समावेश होतो. परंतू एखाद्‍या व्‍यक्‍तीने जमिनीत फक्‍त 'गवत' उगवतो असा उल्‍लेख केला असेल तर त्‍याचा समावेश 'कृषी' या व्‍याख्‍येत होत नाही तथापि, अशा व्‍यक्‍तीने गुरांना चरणेसाठी गवत वाढविले असेल आणि अशा जमिनीमध्‍ये गुरांना गवत चरण्‍यासाठी मुक्‍तपणे वावर दिला असेल आणि तो अशी कृती सिध्‍द करू शकत असेल तरच 'गवत' चा समावेश हे पिक या सदरात करता येतो आणि त्‍याचा समावेश 'कृषी' या व्‍याख्‍येत करता येतो. (विश्राम काला वि. पी. एम. शाह, १९६० जी.एल.आर.२३)       

· प्रश्‍न ३५: भूमीहीन व्‍यक्‍ती म्‍हणजे कोण?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ९-अ अन्‍वये, शेतीच्‍या प्रयोजनासाठी मालक म्‍हणून किंवा कुळ म्‍हणून कोणत्‍याही प्रकारची शेतजमीन धारण केलेली नाही व जी मुख्‍यत: अंगमेहनतीने आपली उपजीविका करते आणि जिचा शेतीचा व्‍यवसाय करण्‍याचा हेतू आहे व ती जमीन कसण्‍यास समर्थ आहे.

· प्रश्‍न ३६: कुळाच्या वारसाची नोंद करताना मूळ मालकाला नोटीस देणे बंधनकारक आहे काय?
F उत्तर: होय, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ कलम १५०(५)(ब) अन्वये हितसंबंधीतांना नोटीस बजावल्याशिवाय कोणतीही नोंद प्रमाणित करता येणार नाही. त्‍यामुळे सर्व हितसंबंधीतांना नोटीस देणे आवश्‍यक आहे.


· प्रश्‍न ३७: विश्‍वस्‍त संस्‍थेला (Trust) कुळकायद्‍याच्‍या तरतुदी लागू होतात काय?
F उत्तर: नाही, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ८८-ब अन्‍वये स्थानिक प्राधिकरणे, विद्यापीठे, रुग्णालये, पांजरपोळ, गोशाळा तसेच सार्वजनिक पूजास्थानासाठी असणाऱ्या विश्वस्त व्यवस्थेची मालमत्ता असलेल्या जमीनी किंवा त्‍यांनी भाडेपट्‍टा करून दिलेल्‍या जमिनी आणि मुंबई विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम, १९५० (Bombay Public Trust Act, 1950) खाली नोंदणी केलेले ट्रस्ट यांना कुळ कायद्यातील कलम ३, ४-ब, , , ९-अ, ९-ब, ९-क, १०, १०-अ, ११, १३ व १७ तसेच प्रकरण सहा व आठ यातील तरतुदींशिवाय महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्‍या इतर तरतुदी लागू होत नाहीत.
तथापि, अशा विश्‍वस्‍त संस्‍थेची स्थापना दिनांक १/४/१९५७ पूर्वी म्हणजेच कृषकदिनापूर्वी झालेली असणे आणि तिची नोंदणी मुंबई विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम, १९५० अन्‍वये झालेली असणे आवश्यक आहे. तसेच अशा जमिनींच्‍या उत्‍पन्‍नाचा विनीयोग, अशा विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेच्‍या प्रयोजनार्थ होत असावा. कलम ८८-ब चे प्रमाणपत्र जिल्‍हाधिकारी देतात. असे प्रमाणपत्र घेतलेले असेल तरच कुळाचा खरेदीचा हक्क संपुष्टात येईल.  
दिनांक १/४/१९५७ नंतर स्थापन झालेल्या विश्‍वस्‍त संस्‍थेला अशी सूट मिळणार नाही.

· प्रश्‍न ३८: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्‍या कोणकोणत्‍या कलमान्‍वये कुळवहिवाट संपुष्टात आणली जाऊ शकते?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्‍या:
कलम १४ अन्‍वये- कुळाच्‍या कसुरीमुळे
कलम १५ अन्‍वये- कुळहक्‍क स्‍वाधिन करून
कलम ३१ अन्‍वये- मालकास स्‍वत: कसण्‍यासाठी किंवा कृषीतर प्रयोजनासाठी जमीन हवी असेल
कलम ४३-१-ब अन्‍वये जमीन मालकाने कमाल क्षेत्राएवढी जमीन मागून कुळवहिवाट संपुष्टात आणली जाऊ शकते. तसेच कुळकायदा कलम ३२-ग अन्‍वये दाखल केलेला कुळाचा दावा फेटाळण्यात आला असेल तर जमीन खरेदी करण्याचा कुळाचा हक्क संपुष्टात येतो आणि कुळवाहिवाट संपुष्टात येते.

· प्रश्‍न ३९: कुळकायद्‍यान्‍वये कमाल धारण क्षेत्र किती आहे?  
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ५ अन्‍वये:
æ जिरायत जमीन: ४८ एकर अथवा
æ हंगामात पाणी मिळणारी किंवा भात शेती जमीन: २४ एकर अथवा
æ बारा महिने पाणी मिळणारी जमीन: १२ एकर
जर एखाद्‍याने वरील जमिनींपैकी दोन किंवा अधिक प्रकारची जमीन धारण केली असेल तर,
अशा जमिनींचे कमाल क्षेत्र:
¨ बारा महिने पाणी मिळणार्‍या जमिनीच्‍या एक एकराबरोबर,
¨ हंगामात पाणी मिळणार्‍या किंवा भात शेती जमिनीच्‍या दोन एकराबरोबर,
¨ जिरायत जमिनीच्‍या चार एकराबरोबर आहे अशा आधारावर ठरविण्‍यात येते.  


· प्रश्‍न ४०: कुळकायद्‍यान्‍वये निर्वाहक क्षेत्र किती आहे?  
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६ अन्‍वये:
æ जिरायत जमीन: १६ एकर ( वरकस जमीन वगळता) अथवा
æ हंगामात पाणी मिळणारी किंवा भात शेती जमीन: ८ एकर अथवा
æ बारा महिने पाणी मिळणारी जमीन: ४ एकर.
जर एखाद्‍याने वरील जमिनींपैकी दोन किंवा अधिक प्रकारची जमीन धारण केली असेल तर,
अशा जमिनींचे क्षेत्र कमाल क्षेत्रास लागू असलेल्‍या निकषांच्‍या आधारे ठरविण्‍यात येते.  
निर्वाहक क्षेत्राची परिगणना करतांना वरकस चमीन वगळण्‍यात येते.  

· प्रश्‍न ४१: कुळांनी शेतजमिनीत लावलेल्‍या झाडांवर कोणाचा हक्‍क असतो?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम १९ अन्‍वये, कुळांनी शेतजमिनीत लावलेल्‍या झाडांवर कुळाचा हक्‍क असतो. कुळवहिवाट सुरू असतांना अशा झाडांचे उत्‍पन्‍न व लाकूड घेण्‍याचा तसेच कुळवहिवाट संपल्‍यावर अशा झाडांचा मोबदला जमीन मालकाकडून मिळण्‍याचाही हक्‍क असतो.

· प्रश्‍न ४२: शेतजमिनीत नैसर्गिकरीत्‍या वाढणार्‍या झाडांच्‍या उत्‍पन्‍नावर कोणाचा हक्‍क असतो?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २० अन्‍वये, कुळवहिवाट सुरू असतांना शेतजमिनीत नैसर्गिकरीत्‍या वाढणार्‍या झाडांच्‍या उत्‍पन्‍नाच्‍या २/३ भागावर कुळाचा तर उत्‍पन्‍नाच्‍या १/३ भागावर जमीन मालकाचा हक्‍क असतो.

· प्रश्‍न ४३: तहसिलदार तथा शेतजमीन न्‍यायाधिकरण यांच्‍या आदेशाविरूध्‍द अपील कोणाकडे करता येईल?
F उत्तर: शेतजमीन न्‍यायाधिकरणाची स्‍थापना महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६७ अन्‍वये झालेली असते. कलम ७४ अन्‍वये, तहसिलदार तथा शेतजमीन न्‍यायाधिकरण यांच्‍या आदेशाविरूध्‍द, आदेशाच्‍या दिनांकाच्‍या साठ दिवसाच्‍या आत जिल्‍हाधिकारी यांचेकडे अपील दाखल करता येईल.
जिल्‍हाधिकार्‍यांचे अपील चालविण्‍याचे अधिकार, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ७४-अ अन्‍वये, सहायक अथवा उप जिल्‍हाधिकार्‍याकडे सोपविता येतात.



· प्रश्‍न ४४: जिल्‍हाधिकारी किंवा सहायक अथवा उप जिल्‍हाधिकार्‍याने दिलेल्‍या अपिलातील आदेशाविरूध्‍द कोणाकडे अपील दाखल करता येईल?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ७५ अन्‍वये, जिल्‍हाधिकारी किंवा सहायक अथवा उप जिल्‍हाधिकार्‍याने दिलेल्‍या अपिलातील आदेशाविरूध्‍द महाराष्‍ट्र महसूल न्‍यायाधिकरणाकडे, आदेशाच्‍या दिनांकाच्‍या साठ दिवसाच्‍या आत अपील दाखल करता येईल.

· प्रश्‍न ४५: कुळकायदा अंतर्गत होणार्‍या चौकशा न्‍यायिक कार्यवाही आहे काय?
F उत्तर: होय, कुळकायदा अंतर्गत, तहसिलदार, जिल्‍हाधिकारी किंवा सहायक अथवा उप जिल्‍हाधिकारी आणि महाराष्‍ट्र महसूल न्‍यायाधिकरणा मार्फत केली जाणारी चौकशी ही भा.द.वि. कलम १९३, २१९ व २२८ अन्‍वये न्‍यायिक कार्यवाही आहे.

· प्रश्‍न ४६: पिकाखालील जमिन सलग तीन वर्ष पड ठेवली तर काय तरतुद आहे?                        
F उत्तर: पिकाखालील जमिन सलग दोन वर्षे लागवडीखाली न आणल्‍यास, चौकशी अंती महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६५ अन्‍वये शासन अशा जमिनीचा ताबा घेऊ शकेल.
  
· प्रश्‍न ४: एक देवस्थानची जमीन आहे. (देवस्थान इनामाची नाही). कब्जेदार सदरी विष्णु मंदिर संस्थान असुन वहिवाटदारांची नावे इतर हक्‍क सदरी आहेत. सदरचा ट्रस्ट १९५५ साली नोंदणीकृत केलेला आहे. सदर जमीनीत १९५० पासून कुळ होते, तत्कालीन तहसिलदारांनी १९६७ साली कुळास जमीन खरेदी करता येत नाही असे म्हणुन कुळाचे नाव कमी करण्‍याचा आदेश दिला होता परंतु नजर चुकीने कुळ खंड सदरी कुळाचे नाव आजपर्यंत तसेच आहे. एक वर्षापुर्वी यातील काही जमीन तलावासाठी संपादीत झाली नुकसान भरपाईसाठी कोर्टात दावा दाखल झाला होता. कोर्टाने नुकसान भरपाई देवस्थानला देण्याचा निर्णय दिला होता. देवस्‍थान जमीन विकणार अशी कुळास भिती आहे. आता संगणीकृत सात-बारा वरील जमीन कसणार्‍याचे नाव हा स्‍तंभ कमी झाल्‍यामुळे कुळाच्या मनात भिती निर्माण झाली आहे आणि तो पीक पाहणी सदरी नाव लावावे म्हणुन अर्ज करत आहेत. तहसिलदाराचा १९६७ सालचा निर्णय चुकीचा आहे असे कुळाचे म्हणणे आहे. काय कार्यवाही करावी?
F उत्तर: कुळाची वहिवाट समाप्‍त करण्‍याची पध्‍दत कुळवहिवाट अधिनियम, कलम १४, १५, २९ किंवा ३१ मध्‍ये नमुद आहे. त्‍यानुसार रितसर मामलेदारापुढे ताबे देणे-घेणे, ताबा पावती इ. शिवाय कुळाची वहिवाट समाप्त करता येत नाही,  केवळ कुळाला जमीन खरेदीचा हक्क नाही या आदेशावरूनच विहीत पध्दतीशिवाय कुळाची वहिवाट संपविता येणार नाही.  प्रस्तुत प्रकरणात कुळवहिवाट अधिनियम, कलम ८८-ब च्या तरतुदी बघणे क्रमप्राप्त आहे. कलम ८८-ब अन्‍वये स्थानिक प्राधिकरणे, विद्यापीठे, रुग्णालये, पांजरपोळ, गोशाळा तसेच सार्वजनिकपूजास्थानासाठी असणाऱ्या विश्वस्त व्यवस्थेची मालमत्ता असलेल्या जमीनी आणि "Bombay public trust act 1950" खाली नोंदणी केलेले ट्रस्ट यांना कुळ कायद्यातील कलम ३, ४-ब, ८, ९, ९-अ ते क, १०, १०-अ, ११, १३, २७ आणि प्रकरण ६ व ७  यातील तरतुदी वगळता कुळवहिवाट अधिनियमाच्‍या इतर तरतुदी लागू होत नाहीत. त्यामुळे नोंदणीकृत ट्रस्टच्या जमिनींना कुळवहिवाट अधिनियमाचे कलम ३२-ग लागू होत नाही व अशी जमीन कुळाला खरेदी घेता येत नाही. तथापि, अशा ट्रस्टची स्थापना दि. १/४/१९५७ पूर्वी म्हणजेच कृषक दिनापूर्वी झालेली असणे आवश्यक आहे. दि. १/४/१९५७ नंतर स्थापन झालेल्या ट्रस्टला अशी सूट मिळत नाही. कारण अशा जमिनीचा कुळ हा दि. १/४/१९५७ रोजीच (ट्रस्टच्या आधीच) खरेदीदार झाल्याचे मानले जातो.
वरील प्रकरणात कुळ १९५० साली दाखल आहे, व ट्रस्ट १९५५ साली स्थापन झाला आहे, परंतु कुळास जमीन घेण्याचा हक्क मात्र कृषक दिनी म्हणजेच दि. १/४/१९५७ रोजी प्राप्त झाला आहे, मात्र तत्पुर्वीच ट्रस्ट स्थापन झालेला असल्याने ट्रस्टचा हक्क कुळा अगोदर प्रस्थापित झालेला आहे म्हणून ही जमीन कुळास खरेदी घेता येत नाही. तहसीलदार यांनी १९६७ साली दिलेला निर्णय प्रथमदर्शनी न्यायोचित आहे. मा. न्यायालयाने देखील भूसंपादनाचा मोबदला देवस्थानास द्यावा असा आदेश दिल्याने न्यायालयाने देखील देवस्थानाचा मालकी हक्क मान्य केल्याचे दिसून येते.
कुळाने पिकपाहणीसाठी दिलेल्‍या अर्जाला "हक्क वैध नाही म्हणून पिकपाहणी दाखल करता येणार नाही" असे उत्तर देऊन अर्ज फेटाळता येईल. कुळाने तहसीलदार यांच्या सन १९६७ च्या निर्णयाविरुद्ध आजपर्यहत दाद न मागता आता तब्बल ५० वर्षांनी जमिनीवर हक्क सांगणे हे संधिसाधूपणाचे द्योतक आहे.
या प्रकरणात कुळवहिवाट अधिनियम, कलम १४, १५, २९ किंवा ३१ या कलमाखाली ही कार्यवाही झालेली असावी त्या आधारेच कुळाचे नाव कमी करण्याचा आदेश तहसीलदार यांनी दिला असेल किंवा कुळाने जमीन खरेदी घेण्यासाठी 'कलम ३२ ग' खाली दाखल केलेला अर्ज फेटाळण्यात आला असेल. 'कलम ३२ ग' चा दावा फेटाळला की जमीन खरेदी करण्याचा कुळाचा हक्क संपुष्टात येतो आणि कुळवाहिवाट संपुष्टात येऊन जमीन मूळ मालकास सोपवली जाते, म्हणून एकदा ही कार्यवाही झालेली असतांना परत त्याच तरतुदी खाली ती करता येणार नाही. तहसिलदारांनी आदेश देऊनही नाव तसेच राहिले असेल तर म.ज.म.अ १९६६, कलम १५५ अन्‍वये चौकशी करुन ते कमी करता येऊ शकेल.


· प्रश्‍न ४: एका जमिनीच्‍या खरेदीदाखल कुळाला सन १९६८ साली कुळवहिवाट अधिनियम कलम ३२ म प्रमाणपत्र दिले गेले आहे. त्‍यावेळी सदर जमिनीवर कुळवहिवाट अधिनियम कलम ४३ च्‍या बंधनास पात्र असा शेरा नमुद केला गेला आहे. सदर जमीन सन १९९७ मध्‍ये महानगर पालिका क्षेत्रात समाविष्ट झाली आहे. सन २००८ साली त्‍या जमिनीची विक्री कुळवहिवाट अधिनियम कलम ४३ च्‍या परवानगीशिवाय झाल्‍यामुळे कुळवहिवाट अधिनियम कलम ८४-क अन्‍वये कारवाई करता येईल काय?
F उत्तर: कुळवहिवाट अधिनियम कलम ४३-क अन्‍वये नगरपालिका, महानगरपालिका व कटक हद्दीतील क्षेत्रास कुळवहिवाट अधिनियमाच्‍या कलम ३१ ते ३२-र, ३३-अ, ३३-ब, ३३-क व ४३ या कलमांच्‍या तरतुदी लागू होत नाहीत. वरील प्रकरणात सन १९६८ साली कुळवहिवाट अधिनियम कलम '३२-म' चे प्रमाणपत्र दिले गेले तेव्हा हे क्षेत्र म.न.पा. हद्दीत नव्हते, त्यामुळे इथपर्यंत झालेली कार्यवाही योग्य आहे. तथापि सन १९९७ मध्ये हे क्षेत्र म.न.पा. हद्दीत आल्यामुळे सन १९९७ नंतर या जमिनीस कुळवहिवाट अधिनियम कलम ४३ च्‍या तरतुदी लागू होत नाहीत. त्‍यामुळे सन २००८ मध्ये सदर जमिनीची विक्री करतांना कलम ४३ नुसार परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेही सन २००८ नंतर आज सन २०१६ मध्‍ये कुळवहिवाट अधिनियम कलम ८४-क अन्‍वये कारवाई करणे म्‍हणजे सर्वोच्‍च न्‍यायालयासह अनेक न्‍यायालयांनी कुळवहिवाट अधिनियम कलम ८४-क अन्‍वये कारवाईबाबत दिलेल्‍या मार्गदर्शनाच्‍या विरूध्‍द काम करणे होईल. सर्वोच्‍च न्‍यायालयासह अनेक न्‍यायालयांनी कुळवहिवाट अधिनियम कलम ८४-क अन्‍वये केली जाणारी कारवाई एका वर्षाच्‍या आत केली जावी असे निर्देश दिले आहेत.

· प्रश्‍न ४: एका खाजगी कंपनीला, कंपनीच्‍या नावावर शेतजमीन खरेदी करायची आहे. त्‍या जमिनीत सदर कंपनीला फळझाडे लाऊन उत्‍पादन घ्‍यायचे आहे. तर अशी खाजगी कंपनी शेतजमीन विकत घेऊ शकेल काय?
F उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३ अन्‍वये, शेतकरी नसलेल्‍या व्‍यक्‍तीला महाराष्‍ट्र राज्‍यात शेतजमीन खरेदी खरेदी करता येत नाही. असा व्‍यवहार बेकायदेशीर ठरून कलम ८४ क अन्वये कारवाई होणेसाठी पात्र ठरेल. शेतकरी नसलेली एखादी व्‍यक्‍ती, सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगीने महाराष्‍ट्र राज्‍यात शेतजमीन खरेदी करू शकते. तथापि, ज्‍या व्‍यक्‍तीचे वार्षिक उत्‍पन्‍न रु. बारा हजार पेक्षा जास्‍त नसेल अशा बिगर शेतकरी व्‍यक्‍तीला महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३(१)(ब) अन्‍वये शेतजमीन विकत घेण्‍याची परवानगी जिल्‍हाधिकारी देऊ शकतात.
कुळवहिवाट व शेतजमीन कायद्‍यातील कलम २(२) अन्‍वये, शेतकरी म्‍हणजे व्‍यक्‍तिश: जमीन कसणारी  व्‍यक्‍ती. कायद्‍यानुसार 'कंपनी' ही 'व्‍यक्‍ती' नाही त्‍यामुळे 'कंपनी' शेतकरी ठरणार नाही. 
एखाद्‍या सहकारी संस्‍थेने अथवा सहकारी संस्‍थेमार्फत शेतजमिनीची खरेदी विधीग्राह्‍य आहे. कारण कुळवहिवाट अधिनियम, कलम ६४-अ अन्‍वये, सहकारी संस्‍थेस अथवा अशा सहकारी संस्‍थेमार्फत शेतजमिनीची खरेदी विधीग्राह्‍य ठरेल. अशा व्‍यवहारास कुळकायद्‍याची कलमे ६३ व ६४ लागू होणार नाहीत. तथापि, अशी सहकारी संस्‍थेची नोंदणी, खरेदी दिनांकाच्‍या आधी, मुंबई सहकारी संस्‍था अधिनियम, १९२५ अन्‍वये  झालेली असावी अन्‍यथा असा व्‍यवहार अवैध ठरून कुळ कायदा कलम ८४-क अन्‍वये कारवाईस पात्र ठरेल. (विनायक रत्‍नागिरी वि. राज्‍य, २०११(२), महा. लॉ जर्नल-७४०) 
एखादी खाजगी मर्यादित संस्‍था (Private Limited Company), जिल्‍हाधिकारी यांच्‍या परवानगीने शेतजमीन विकसित करून शेती किंवा फळांचे  उत्‍पादन करू शकेल परंतु सदर खाजगी मर्यादित संस्‍था स्‍थापनेचा मूळ उद्‍देश शेतजमीन विकसित करून शेती किंवा फळांचे उत्‍पादन करण्‍याचा व्‍यवसाय करणे हा असायला पाहिजे, कंपनी स्‍थापन करतेवेळी करण्‍यात येणार्‍या कायदेशीर कागदपत्रात सदर उद्‍देश स्‍पष्‍टपणे नमुद असावा आणि कंपनी नोंदणी अधिकारी (Registrar of Companies) यांची त्‍याला मान्‍यता असावी. तथापि, अशा खाजगी मर्यादित संस्‍थेचे संचालक, सदस्‍य, भागधारक यांना 'शेतकरी' समजले जाणार नाही आणि शेतकर्‍याला मिळणारे कोणतेही फायदे अनुज्ञेय नसतील तसेच सदर कंपनीचे शेतकी उत्‍पन्‍न करमुक्‍त नसेल.            


· प्रश्‍न ५०: कुळकायदा कलम ४३ च्‍या बंधनास पात्र जमीन सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगीशिवाय खरेदी केली असल्‍यास काय करावे?
F उत्तर: सन २०१६ चा अधिनियम – २०, दिनांक ७ मे २०१६ अन्वये, कुळकायदा कलम ४३ च्या बंधनास पात्र जमिनीचे हस्‍तांतरण, सक्षम अधिकार्‍याच्‍या पूर्वपरवानगी शिवाय झाले असल्‍यास ते नियामानूकुल करण्‍याची तरतूद या अधिनियमाच्‍या कुळकायदा कलम ८४ क मध्ये करण्‍यात आली आहे. त्यानुसार जमीन खरेदी केलेली व्यक्ती (कुळ नसलेली) हस्‍तांतरण  केलेल्या जमिनीच्‍या अनुषंगाने चालू बाजारभावाच्या ५०% रक्कम (शेती प्रयोजनार्थ वापर होणार असेल तर) अथवा ७५% (जमिनीचा वापर अकृषिक प्रयोजनार्थ होत असेल तर) रक्कम सरकार जमा करावी अशी तरतुद आहे.

· प्रश्‍न ५१: वतन इनाम जमीनीला कुळ कायद्‍याच्‍या तरतुदी लागू होतात काय?
F उत्तर: कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ८८ कअ अन्वयेशासनास उपयुक्त सेवा दिल्याबद्दल' इनाम किंवा वतन म्हणून धारण केलेल्या जमिनींना किंवा 'मुंबई वंशपरंपरागत अधिकारपद अधिनियम १८७४ चे कलम २३ अन्वये परिश्रमिक म्हणून देण्यात आलेल्या जमिनींनाकुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ३२ ते ३२ र, ३३ अ,,क च्या तरतुदी लागू होत नाहीत. (सर्वोच्च न्यायालय- कचरु लखु अहेर वि. मस्जिद मंडवड देवस्थान-१२/१०/१९८९)

Comments

  1. एका व्यक्तीने सन १९७९ साली नोंदणीकृत दस्ताने शेतजमीन खरेदी केली त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारचा सात बारा उतारा जोडलेला नव्हता,अशा व्यक्तीस कायदेशीर रित्या शेतकरी असे म्हणता येईल का ? व तदनंतर त्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर वारसाहक्काच्या नोंदीने त्यांच्या मुलांना कायदेशीररीत्या शेतकरी म्हणता येईल का ?

    ReplyDelete
  2. वडिलांच्या आजोबांनी 1948 साली शेत जमीन खरेदी केली होती शेत जमीन खरेदीची नोंद 1948 साली आढळून आली आहे.परंतु सदर नोंदीत " 1000 रुपये देऊन 1जानेवारी 1948 रोजी तोंडी खरेदीने दिले" असे आढळून येते.1948 पासून ते आज पावेतो सर्व 7/12 उतारा खरेदीदार च्याच नावे आहेत.तरी आता खरेदी घेण्यात आलेल्या वंशजा कडून बिलम्ब माफी तसेच जमिनीचा ताबा मिळणे बाबत तक्रार प्राप्त आहे.तरी आदरणीय महोदय कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

    ReplyDelete
  3. वडिलांच्या आजोबांनी 1948 साली शेत जमीन खरेदी केली होती शेत जमीन खरेदीची नोंद 1948 साली आढळून आली आहे.परंतु सदर नोंदीत " 1000 रुपये देऊन 1जानेवारी 1948 रोजी तोंडी खरेदीने दिले" असे आढळून येते.1948 पासून ते आज पावेतो सर्व 7/12 उतारा खरेदीदार च्याच नावे आहेत.तरी आता खरेदी घेण्यात आलेल्या वंशजा कडून बिलम्ब माफी तसेच जमिनीचा ताबा मिळणे बाबत तक्रार प्राप्त आहे.तरी आदरणीय महोदय कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

    ReplyDelete
  4. सर जर एखादा व्यक्ति शेतकरी नसेल आणी त्याला शेती घ्यायची आहे तर त्या साठी काही पर्याय सांगा .....

    ReplyDelete
    Replies
    1. ज्‍या व्‍यक्‍तीचे वार्षिक उत्‍पन्‍न रु. बारा हजार पेक्षा जास्‍त नसेल अशा बिगर शेतकरी व्‍यक्‍तीला महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३(१)(ब) अन्‍वये शेतजमीन विकत घेण्‍याची परवानगी जिल्‍हाधिकारी देऊ शकतात.

      Delete
  5. एका व्यक्तीने जमिन खरेदी केली आहे केली परंतु ती व्यक्ती शेतकरी नसल्याने सदर शेती सरकार जमा झालेली आहे तर सदर शेती मुळ जमीन मालकांना परत मिळवता येईल का?

    ReplyDelete
    Replies
    1. सांगा जमीन परत घेता येते का.

      Delete
  6. : सर नमस्कार सर आमचे मूळ गाव हे साताराआहे. पण आजोबा यांची सरकारी नोकरी(ministry of Defance) असल्याने सन 1952 ते 1984 हा कालावधी परत वडील त्याच ठिकाणी रुजू कालावधी 1982 ते 2007 असा होता.तसे दाखला मॅनेजर यांनी धीला आहे. आमच्या या दोन पिढया मध्यप्रदेश येथे 70 वर्षे सरकार च्या सेवेत असल्याने आमच्या गावाकडे वडिलोपार्जित असलेली जमीनीला कोणीही वाली नसल्याने. जमिनीला कुळाने 32ग ने बेकायदेशीर खरेदी करून ७/१२ सदरी स्वताचे नाव दाखल केले .त्यात .मूळ जमीन मालक यांना कोणतीही नोटीस किंवा जाब जवाब घेण्यात आला नाही. आणि तेंव्हा पासून आम्ही भूमीहीन आहोत .तर आम्हाला ती जमीन परत मिळवता येईल का . आमचे पुनर्वसन होइल का सर कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

    ReplyDelete
  7. सर नमस्‍कार कुळाच्‍या जमिनवर अकृषिक परवानगी देण्‍यात येवु शकते का

    ReplyDelete
  8. सर 1956 पासुन आमचे वडील कुळ ठरले आहेत सातबार्यामधे ईतर अधीकारात वडलांचे नाव आहे आणी पाचपटीने रक्कम सुद्धा भरली आहे तर सर ही जमीन सात मधे ज्या मुळ मालकाचे नाव आहे ते कमी करुन त्या ठीकानी वडलाचे नाव येऊ शकते का आणी त्या साठी कशी प्रोशीजर आहे सर कृपया माहीती द्यावी सर

    ReplyDelete
  9. बेकायदेशीर व्यवहार विरूद्ध सखाराम पुंजा ताडगे कुळकायदा क.६३/६४ हा इतर अधिकारातील शेरा याबाबत स्पष्टीकरण पाठवा ही विनंती आहे 🙏

    ReplyDelete
  10. आमच्याकडे देवस्थान जमीन आहे.1932 पासून आम्ही संरक्षीत कुळ आहे.1980ला देवस्थान ट्रस्ट नोंद केली आहे.अशी जमीन
    कुळाला खरेदी करता येते का

    ReplyDelete
    Replies
    1. होय करता येते.

      Delete
  11. कूळाला चार मुली वारस आहेत,पण तीन मुली सासरी गोल्या व एका मुलीने कुळाचे पालनपोषण केले,कुळ मरून 25 वर्षे झाली,कुळाला फक्त पोषण केलेल्या मु लगीची वारसनोंद करता येईल का?

    ReplyDelete
  12. सर नमस्कार मी एक जागा पाहिली आहे पण त्या जागेच्या ७/१२ मध्ये कु का क ८४ कसं पात्र असा उल्लेख आहे तर ती जागा खरेदी करताना काय करावे लागेल

    ReplyDelete
  13. शेतजमिनीचा सात-बारा कोरा आहे... शेतजमिनीचे मालक रीतसर खरेदी-विक्री करणार होते, परंतु त्यांनी कूळ लावून विक्री करण्याचा पर्याय दिला आहे... योग्य असेल का? सदर शेतजमिनीला लागून असलेल्या हद्दीदारांची संमतीपत्रे आवश्यक आहे का?

    ReplyDelete
  14. 1948 madhye aajobanni jamin kharedi keli aasun to vyavhar bekaydeshir aahe aase tahashildar yaani sangun ti shet jamin sarkarjama keli aahe to parat milavnyasathi kaay upay karta yeil ka

    ReplyDelete
  15. नगरपालिका क्षेत्रात कुळाची जमीन विक्री कार्यपद्धती

    ReplyDelete
  16. कुळ कायद्याची केस चा निकाल लागला त्यापूर्वी 12 वर्षे अगोदर कुळाचा मृत्यू झाला असेल तर त्या जमिनीचे खरे मालक कोण कुळकी कुळाचे वारसदार 32म चे सर्टिफिकेट कोणाच्या नावाने मिळेल
    कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  17. विहीर खोदण्यासाठी खरेदी केलेली जमीन रहिवासी प्रयोजनासाठी वापरता येऊ शकते का? येत असेल तर कशाप्रकारे
    कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  18. विहीर खोदण्यासाठी खरेदी केलेली जमीन रहिवासी प्रयोजनासाठी वापरता येऊ शकते का? येत असेल तर कशाप्रकारे
    कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  19. विहीर खोदण्यासाठी खरेदी केलेली जमीन रहिवासी प्रयोजनासाठी वापरता येऊ शकते का? येत असेल तर कशाप्रकारे
    कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  20. कुळ कायद्याची केस चा निकाल लागला त्यापूर्वी 12 वर्षे अगोदर कुळाचा मृत्यू झाला असेल तर त्या जमिनीचे खरे मालक कोण कुळकी कुळाचे वारसदार 32म चे सर्टिफिकेट कोणाच्या नावाने मिळेल
    कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
Mahsul Guru

Subscribe YouTube Channel