सामान्यत: हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे तसेच वाताचा प्रकोप वाढल्याने रक्तदाब
वाढलेला आढळतो.
* खूप वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी एक तातडीचा उपाय- एक मोठा टर्किश टॉवेल बर्फाच्या थंड पाण्यात भिजवावा, हलका पिळून घेऊन बाधीत व्यक्तीच्या संपूर्ण मणक्यांवर (Spine) वीस मिनिटे आडवा (माने पासुन कंबरेपर्यंत) ठेवावा. हा प्रयोग सतत तीन-चार वेळा केल्यास वाढलेला रक्तदाब
लगेच कमी होतो.
* चहा, कॉफी, अल्कोहोल इ. उत्तेजक
पेयांचे सेवन बंद करावे.
* एक चमचा जिरा पावडर, एक चमचा आल्याचा रस व एक चमचा मध
असे मिश्रण एकत्र करून दिवसातून दोनदा घेणे.
* पांढर्या कांद्याचा एक चमचा रस, एक चमचा मधातुन,
दिवसातून दोन वेळा देणे.
* पांढरी खसखस व टरबुजाचे टरफल काढलेले बी (मगज बी),
सम प्रमाणात वाटून रोज दोनदा एक चमचा रिकाम्या पोटी घ्यावे.
* केळ्यात पोटॅशियम जास्त प्रमाणात असल्यामुळे एक केळे रोज खावे.
* केळ्याच्या खोडाचा अर्धा कप रस रोज दोन वेळा घ्यावा.
* रक्तदाबाचे महत्त्वाचे कारण पोटॅशिअमची कमी हे आहे. संत्रा,
केळी, नारळाचे पाणी यांचे जास्तीत जास्त सेवन करावे.
* मेथीच्या दाण्याचे एक चमचा चूर्ण रोज सकाळ संध्याकाळ एक महिना रिकाम्या पोटी
घ्यावे.
* आहारात आळंबी(मशरूम)चा वापर करावा.
* रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी प्यावे.
* मनुक्याबरोबर लसणाची पाकळी खावी.
* दोन पाकळ्या लसुण, सालं काढुन त्यावर एक थेंब तुप टाकावे,
ह्या पाकळ्या आगीवर थोड्या भाजुन, चावुन खाव्यात.
* लिंबाची दोन पाने व तुळशीची चार पाने रिकाम्यापोटी चावून खावी.
* उच्च रक्तदाबावर सर्पगंधा, ब्राम्ही, श्वेत चर्पटी या चूर्णांचे मिश्रण जे ‘मुक्तावटी’
म्हणून बाजारात मिळते तेही देतात.
* एक चमचा पांढर्या तिळाचे पाण्यात भिजवून चाटण करावे व दिवसातून दोनदा दुधातून
अथवा मधातून घ्यावे. तिळात कॅल्शियम,
फॉस्फरस, मॅग्नेशियम, झिंक असते.
* शक्य असेल तितके नारळाचे पाणी (शहाळे) प्यावे.
* दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस घालून दिवसातून दोनदा घेणे.
* संत्र्याचा रसाच्या सेवनाने उच्च रक्तदाब कमी होतो.
* रोजच्या जेवणात एकदा लसणाच्या पाच ते सहा कच्च्या पाकळ्या न चुकता नियमित खाव्यात.
* एक बेचाळीस दिवसांचा प्रयोग आहे. पहिल्या दिवशी एक मनुका,
रात्री गुलाब पाण्यात भिजवून ठेवावी, दुसर्या
दिवशी सकाळी रिकाम्या पोटी चावून खावी. दुसर्या दिवशी दोन मनुके
असे करत एकविसाव्या दिवशी एकवीस मनुके खावेत. बाविसाव्या दिवशी
वीस मनुके असे कमी करत बेचाळिसाव्या दिवशी पुन्हा एक बेदाणे खावी. नंतर हा प्रयोग पंधरा दिवस बंद करावा. पंधरा दिवसांनी
पुन्हा असे तीन वेळा करावे.
* दालचिनीची पूड करून रोज सकाळ संध्याकाळ एक छोटा चमचा, मधाबरोबर घ्यावी. तीन महिन्यात उच्च रक्तदाबाचा विकार
कमी होतो.
* मिठामुळे रक्तातील पातळपणा कमी होतो म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी करावे.
शक्यतो जेवण तयार करताना मीठ घालू नये, जेवताना
वरून घ्यावे. जेवण बनवताना त्यात मीठ घातले असता ते अन्नाबरोबर
सरळ रक्तात मिसळते, जेवताना वरून मीठ घेतले असता ते बर्याच मोठ्या
प्रमाणात लघवी व घामावाटे शरीरातून बाहेर निघून जाते.
* रोज रात्री झोपताना दोन चमचे मेथीचे दाणे रात्री काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात
भिजवून ठेवावे, सकाळी ते पाणी व मेथीदाणे चावून खावे.
* अर्जुनसाल नावाचे चूर्ण आयुर्वेदिक/काष्ठौषधी दुकानात
मिळते. हे चूर्ण एक छोटा चमचा, मधाबरोबर
घ्यावे.
* पाच बेलपत्र (श्री महादेवांना वाहतात ते) वाटून अंदाजे एक मोठा चमचा वाटण
तयार करावे, हे वाटण एक ग्लास पाण्यात, पाणी अर्धे होईल इतके उकळावे. कोमट झाल्यावर,
रिकाम्यापोटी, न गाळता प्यावे.
* रोज रात्री झोपताना गरम पाण्यात खडेमीठ (Rock Salt) घालून
त्यात पंधरा मिनिटे पाय घालून बसावे.
* चार टोमॅटो व दहा-बारा तुळशीची पाने मिक्सरमधून पाणी
न घालता चांगले बारीक करावेत, त्याचा झालेला लगदा चाळणीतून गाळून,
त्या रसात अर्धा चमचा हळद घालून पिणे. उच्च रक्तदाब
तासाभरात कमी होतो. उरलेला गर भाजीत वापरावा.
* टरबुजाच्या (Water Melon) बिया सुकवून त्याचे (बियांच्यासाली
सहीत) चूर्ण करून ठेवावे. एक चमचा सकाळ
संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावे.
* थंड दूध व पाणी समप्रमाणात एकत्र करून दोन दोन चमचे दिवसभरात दहा-बारा वेळा प्यावे .
* रोजच्या आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करावा.
* रात्री झोपताना एक कप गरम दुधात एक छोटा चमचा तिळाचे तेल टाकून प्यावे.
* टोमॅटो, गाजर, बीट यांचा रस सम
प्रमाणात एकत्र करून घ्यावा.
* सकाळी जेवणाबरोबर हिंग व जिरा पावडर घालून एक ग्लास ताक प्यावे.
* सर्पगंधा व खडीसाखरेचे चूर्ण गुलाबपाण्यातून वैद्यकीय सल्ल्याने द्यावे.
* एक कप दुधी भोपळा रस (लौकी) साली
न काढता, दोन महिने नियमित घ्यावा.
* रोज सकाळी देशी गाईचे पन्नास मि.ली. ताजे मूत्र रिकाम्या पोटी प्राशन करावे. हे मूत्र गरोदर
गाईचे नसावे.
* 300
ग्रॅम कालीजिरी (आयुर्वेदिक/काष्ठौषधी दुकानात मिळते), 100 ग्रॅम ओवा,
100 ग्रॅम दालचिनी भाजून यांची बारीक पावडर करावी. सहा महिने रोज सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी एक मोठा
चमचा घ्यावी, वरून गरम पाणी प्यावे.
* गहू, काळे चणे व जौ (Barley) यांचे
सम प्रमाण घेऊन त्याचे पीठ करावे, ते भाजून घ्यावे, पोळी करण्यापूर्वी अर्धातास पीठ भिजवून ठेवावे. या पिठाची
पोळी किमान सहा महिने नियमित खाणे.
* सीताफळ मिळत असेल तेव्हा त्याचा भरपूर वापर करावा. यातील मॅग्नेशिअम व पोटॅशियम रक्तदाबावर
फायदेशीर असते.
* ब्राम्ही/मंडुकपर्णी (Indian penny wort) नावाच्या झाडाच्या पानांचा एक चमचा रस मधाबरोबर घेतल्याने वाढलेला रक्तदाब
सामान्य होतो.
* शंखपुष्पीच्या पानांचा 20 मि.ली.
ग्रॅम रस दिवसातून तीनदा एक महिना घेतल्याने रक्तदाबाचा विकार निघून
जातो.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: उच्च रक्तदाब. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !