मधुमेह
मानवी शरीरात निर्माण होणार्या
साखर (ग्लुकोज) निर्मितीवर नियंत्रण ठेवणे, त्याचा योग्य स्त्राव आणि उपयोग
करून घेणे हे काम शरीरातील "पॅनक्रियाज (स्वादूपिंड)" या ग्रंथीचे असते. "पॅनक्रियाज (स्वादूपिंड)" चे काम व्यवस्थित होत नसल्यास, शरीरात
निर्माण होणार्या साखरेवरील (ग्लुकोज) नियंत्रण न राहिल्याने मधुमेहाचा विकार होतो.
मधुमेहाचा विकार होण्याची
कारणे/शक्यता
खालील सात प्रकारे निर्माण होते.
१) अनुवंशिक- आई-वडिलांना
मधुमेहाचा विकार असल्यास तो पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केला जाण्याची शक्यता ८०%
असते.
२) जिभेचे चोचले पुरवणे- अर्थात गोड, तेलकट, अपथ्यकारक इत्यादी पदार्थ अति प्रमाणात खाणे.
३) दही अथवा दह्यापासून बनवलेल्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन.
४) स्थूल व जास्त हालचाल न करणार्या प्राण्यांचे मांस खाणे.
उदा. डुक्कर, म्हैस इत्यादी
५) अति झोप- शरीराला आवश्यक झोपेपेक्षा जास्त
काळ झोपणे, दुपारी झोपणे, नियमित उशिरा
उठणे.
६) नवीन धान्याचे अति प्रमाणात सेवन.
७) गुळाचे अथवा गुळापासून बनवलेल्या पदार्थांचे अति प्रमाणात सेवन.
मधुमेहाची
प्राथमिक लक्षणे-
१) वारंवार लघवीला जावे लागणे.
२) दात, कान,
नाक, डोळे यांच्यात मळ वाढणे.
३) हात-पायांची
जळजळ होणे.
४) शरीराला चिकट घाम येणे.
५) सतत तहान लागणे.
६) जीभ गुळचट होणे.
मधुमेहाचे
प्रकार-
मधुमेहाचे मुख्य दोन
प्रकार आहेत.
१) डी. एम.-1:- शरीरातील ‘पॅनक्रियाज’ मधील बिटा सेल्स मधून ‘इंशुलीन’चे स्त्रवण होत असते. या
मधुमेह प्रकारात ‘पॅनक्रियाज’ मधील बिटा
सेल्सचा नाश होतो त्यामुळे ‘इंशुलीन’चे
स्त्रवण योग्य प्रकारे होत नाही. अशा मधुमेहाच्या रोग्याने इंशुलीन
घेतल्याने रक्तातील साखर काही वेळापुरती नियंत्रित होते. इंशुलीन
घेणे हा तात्पुरता उपाय असून तो कायमचा उपाय नाही.
२) डी. एम.-2:- शरीरातील ‘पॅनक्रियाज’ मधील बिटा सेल्समधून जे ‘इंशुलीन’चे स्त्रवत असते त्याचे शोषण
(Absorption) शरीरातील विविध सेल्स करीत असतात. या मधुमेह प्रकारात ‘इंशुलीन’चे
शोषण करणार्या सेल्स अकार्यक्षम होतात व त्यामुळे ‘इंशुलीन’ चे शोषण शरीरात योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे शरीरात
तयार झालेल्या साखरेचे शोषणही योग्यप्रकारे होत नाही. ही साखर
शरीरभर फिरत राहते.
ह्यामुळे अती तहान लागते, पर्यायामुळे सतत लघवी होते. या लघवीवाटे शरीरातील आवश्यक
तत्त्वेही शरीराबाहेर टाकली जातात, त्यामुळे पुन्हा पुन्हा भूक
लागते. अति खाल्ल्याने वजन वाढते. स्त्रियांमध्ये
मासिक पाळी वेळेवर न येणे ही लक्षणे दिसतात.
मधुमेहाचे
परिणाम-
दुलर्क्ष केलेल्या मधुमेहामुळे
शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत विविध विकार होतात.
¤ रक्तवाहिन्या हळूहळू कडक होत जातात त्यामुळे
शरीराला अपुरा रक्तपुरवठा होऊन रक्तपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे पक्षघाताची (Paralysis) शक्यता वाढते.
ज्यांना रक्तदाबाचा विकारही आहे त्यांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
¤ डोळ्यातील ‘रॅटीना’ला अडथळा उत्पन्न होऊन अंधत्व
येण्याची शक्यता वाढते.
¤ कुठल्याही प्रकारचा संसर्ग लवकर होतो.
¤ हृदयाला रक्तपुरवठा करणार्या धमनींमध्ये अडथळा
उत्पन्न होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
¤ मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा उत्पन्न होऊन
मूत्रपिंडाचे आजार उत्पन्न होतात. ह्यामुळे पायावर, चेहर्यावर सूज वाढते.
¤ जननेंद्रियांशी संबंधित विकार, संसर्ग उद्भवतात. शुक्राणूंची वाढ खुंटते व अशक्तपणा जाणवू लागतो.
¤ स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येत नाही.
¤ सांध्यांची झीज होते, हाडे पोकळ होतात, हालचालींवर बंधन येते.
¤ हातापायांची आग होते.
¤ जखमा लवकर भरत नाही.
मधुमेहाच्या
तपासण्या-
१- रक्तशर्करा तपासणी - यात रिकाम्यापोटी व जेवणानंतर
अथवा ग्लुकोज प्यायला देऊन अशी दोनवेळा तपासणी केली जाते. रिकाम्यापोटी
केलेल्या रक्त तपासणीत रक्तशर्करा ७० ते ११० हे प्रमाण सामान्य मानले जाते तर जेवणानंतर
अथवा ग्लुकोज प्यायला देऊन केलेल्या रक्त तपासणीत रक्तशर्कराचे ११० ते १४० हे प्रमाण
सामान्य मानले जाते.
२- मूत्र तपासणी - या तपासणीत लघवीवाटे शरीरातील
शर्करा बाहेर पडते की काय हे तपासले जाते.
३ - HB A 1-C – शर्करा तपासणीपूर्वी काही दिवस पथ्य पाळल्यास
रक्तशर्करा व मूत्र तपासणीत शर्करा आढळून येत नाही. त्यामुळे मधुमेहाचे अचूक
निदान होत नाही. यासाठी HB A 1-C ही तपासणी करण्यात येते.
रक्तातील लालरक्त पेशींचे (Red Blood Cells) आयुष्य १२०
दिवस असते. रक्तात प्रमाणाबाहेर शर्करा असल्यास लाल रक्त पेशींना
या शर्करेचे अतिसुक्ष्म कण (Glucose Molecules) चिकटतात व शरीरात
फिरत राहतात. HB A 1-C या तपासणीमध्ये हे कण दिसून येतात.
यांचे प्रमाण ६ पर्यंत असल्यास सामान्य (Non Diabetic) मानतात, ६ ते ७ असल्यास चांगले नियंत्रण
(Good Control) मानतात, ७ ते ८ असल्यास खराब नियंत्रण
(Poor Control) मानतात, ८ ते ९ असल्यास वाईट नियंत्रण
(Very Bad Control) मानतात व हे प्रमाण १० किंवा जास्त असेल तर अति गंभीर
(Very Serious) मानतात.
मधुमेहावर
नैसर्गिक पध्दतीने उपाय:
खालील उपाय म्हणजे
जादुची कांडी नाही. या उपायांपैकी कोणताही एक उपाय सातत्याने किमान एक महिना
करावा. उपायापूर्वी व एक महिन्यानंतर रक्तशर्करा पातळी तपासावी. या उपायांसह
डॉक्टरने दिलेली इतर औषधे घेण्यास हरकत नाही.
* मधुमेहामुळे पिडीत व्यक्तींसाठी
एक रामबाण उपाय म्हणजे, १०० ग्रॅम मेथीच्या दाण्याची पावडर,
१०० ग्रॅम तमालपत्र पावडर, १५० ग्रॅम जांभळाच्या
बियांची पावडर, २५० ग्रॅम बेलपत्राची (श्री
महादेवांना वाहतात ते) पावडर, १५० ग्रॅम आवळा पावडर, १०० ग्रॅम पुनर्नवा चूर्ण आणि १०० ग्रॅम अश्वगंधा चूर्ण हे सर्व एकत्र करून,
हे चूर्ण सकाळी एक चमचा, रिकाम्या पोटी,
न्याहारीच्या एक तास पूर्वी व रात्री जेवणाच्या एक तास पूर्वी,
गरम पाण्याबरोबर नियमित सहा महिने घेतल्याने मधुमेहाचा त्रास निश्चित
कमी होतो. जांभळाच्या बियांची पावडर व बेलपत्राची पावडर,
शक्य असल्यास जांभूळ घरी आणून, त्याच्या बिया व
बेलपत्र सावलीत सुकवून त्याची पावडर घरीच तयार करावी.
* मधुमेहाने पिडीत व्यक्तींच्या
शरीरातील शुक्राणू नष्ट होत असल्याने त्यांना थकवा जाणवतो. एक
कारले व चार टोमॅटोचा रस एकत्र दिवसातून दोनदा, किमान सहा महिने
घेतल्यास मधुमेहात निश्चित आराम येतो. कारल्यामुळे शरीरातील
साखर नियंत्रित होते व टोमॅटोमुळे शुक्राणूंची निर्मिती होण्यास मदत होते व थकवा जाणवत
नाही. मधुमेहींनी फक्त कारल्याचा रस कधीही घेऊ नये. त्यामुळे
रक्तातील साखर लगेच कमी होऊन थकवा येतो.
अर्धाकिलो ताजे कारले
आणून ते थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये त्याचा बारीक लगदा करावा. हा लगदा एका
खोलगट ताटात ओतून घ्यावा. या लगद्यात दोन्ही तळपाय बुडवून, कारल्याची चव
जिभेला जाणवेपर्यंत किंवा किमान अर्धा तास बसावे. नंतर हा लगदा फेकून द्यावा. हा उपाय
नियमित पंधरा दिवस केल्याने मधुमेहाचा त्रास निश्चित कमी होतो.
* ज्यांना ‘इन्शुलीन’ घ्यावे लागते त्यांनी दोन चमचे आवळा रस,
एक चिमुट हळद टाकुन दिवसातून दोनवेळा घ्यावा.
* आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेले
आहे हे सर्वश्रुत आहे. मधुमेहामुळे शरीरातील पृथ्वी व जल या महाभुतांचे
आधिक्य होते. मधुमेहाने पिडीत व्यक्तींनी हळद व आवळा यांचे जास्तीत
जास्त सेवन नियमितपणे करावे. हळद व आवळ्याचे लोणचे बनवून,
चूर्ण करून (चूर्ण जेवणाआधी गरम पाण्यातुन घ्यावे)
किंवा अन्यप्रकारे यांचा आहारात समावेश करावा. ह्यामुळे शरीरातील पंचमहाभूतांचा समतोल साधला जातो व मधुमेहाचा त्रास निश्चित
कमी होतो.
* मधुमेहाच्या रोग्यांनी
‘कुटकी’ नावाचे चूर्ण (औषधांच्या
किंवा काष्ठौषधीच्या दुकानात मिळते) आठवड्यातून सलग तीन दिवस,
रात्री गरम पाण्याबरोबर घ्यावे. ह्यामुळे आतड्यांना
चिकटलेला मळ बाहेर पडून पोट साफ होते.
* मधुमेहाच्या रोग्यांनी रिकाम्यापोटी
कढीलिंबाची पंधरा कोवळी पाने नियमितपणे
चावून खावीत किंवा पानांची पेस्ट करून खावी व वरून गरम पाणी प्यावे.
* दोन्ही पायात घोट्यामध्ये
(Ankle) चांदीचे कडे, शरीराला स्पर्श होईल अशा पद्धतीने
घट्ट घालणे हा मधुमेहावर वैदिक शास्त्रानुसार एक प्रभावी उपाय आहे.
* मधुमेही व्यक्तींनी आठवड्याचे
चार दिवस, रात्री दोन चमचे इसबगोल खाऊन वरून किमान दोन ग्लास
कोमट पाणी किंवा खूप पातळ ताक प्यावे. इसबगोलच्या सेवनाने आतड्यांवर
इसबगोलचे आवरण (Lining) तयार होऊन शरीरातील जास्तीच्या साखरेचे
आतड्यात कमी प्रमाणात शोषण (Absorption) होते.
* आहारात साखरेच्या ऐवजी
‘मधुपर्णी’ चा वापर करावा. आयुर्वेदिक/ काष्ठौषधी च्या दुकानात ‘मधुपर्णी’(Stevia Plant)
नावाच्या वनस्पतीची पावडर/पाने मिळतात,
त्यांचा वापर साखरे ऐवजी चहात करावा. ही पाने सुकवून
त्याची पावडर करावी, चहा उकळतांना, साखरे
ऐवजी ही पावडर टाकावी. (एक कप चहात पाव चमचा पावडर पुरेशी आहे.)
किंवा नर्सरीमध्ये मिळणारे ‘मधुपर्णी’(Stevia
Plant) चे रोपटे घरी लावून ताजी पाने वापरावीत. हे साखरेपेक्षा तीनशे पट गोड असून साखरेसाठी नैसर्गिक पर्याय आहे. यात उष्मांक नाहीत. ह्यामुळे वजन नियंत्रणात राहून पॅनक्रियाचे
कार्य उत्तम प्रकारे होऊन, इंशुलीन नियंत्रित होते ज्यामुळे मधुमेहाची
शक्यता धूसर होते.
* आंब्याची पाने सावलीत सुकवून
त्याचे एक ग्रॅम चूर्ण अर्धा लीटर पाण्यात पाणी १/४ शिल्लक राहील इतके उकळावे.
दिवसातून दोन वेळा हे पाणी एक महिना प्यावे.
* आंब्याची कोवळी पाने सावलीत सुकवून
त्याचे पंचवीस ग्रॅम चूर्ण सेवन करावे.
* आहारात आळंबी (मशरूम)चा जास्त
वापर करावा.
* २५० ग्रॅम पिकलेले जांभूळ,
अर्धा लीटर पाण्यात चांगले उकळावे, थंड झाल्यावर
हे मिश्रण जांभळे कुस्करून वस्त्रगाळ करून घ्यावे. दिवसातून
तीनदा, एक महिना हे पाणी प्यायल्यास मधुमेहात आराम मिळतो.
* मोठ्या आकाराची जांभळे सावलीत
वाळवून त्याचे चूर्ण करून रोज २० ग्रॅम दिवसातून तीनदा एक महिना गरम पाण्यातून घेतल्यास
मधुमेहात आराम मिळतो. लघवीतून पडणारी शर्करा बंद होते.
* गहू, काळे
चणे व जौ (Barley- पुजेत वापरतात) सम प्रमाणात
घेऊन त्याचे पीठ करावे, ते भाजून घ्यावे, पोळी करण्यापूर्वी अर्धातास पीठ भिजवून ठेवावे. या पिठाची
पोळी किमान सहा महिने नियमित खाल्यास घेतल्यास मधुमेहात निश्चित आराम येतो.
* मधुमेहामुळे पायावर सूज येणे,
तळपायात जळजळ होणे अशी लक्षणे काही लोकांत दिसू शकतात. या विकारावर रात्री दोन चमचे अख्खे धणे रात्री काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात
भिजवून ठेवावे, सकाळी ते पाणी धण्यासह अर्धे होईल इतपत उकळावे,
कोमट करून, गाळून प्यावे. सकाळी पुन्हा धणे एक ग्लास पाण्यात भिजवून हा प्रयोग रात्री करावा.
किमान पंधरा दिवस घेतल्यास निश्चित आराम येतो.
* ६ ग्रॅम शंखपुष्पी चूर्ण दिवसातून दोनदा एक
महिना गायीच्या लोण्यात किंवा पाण्यातुन घ्यावे.
* कारले व कढीलिंबाची पाने
(Curry Leaves) यांचा आहारात जास्तीत जास्त वापर करावा.
* मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा
कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत. याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित
रहायला फार मदत होते.
* दोन भेंड्या घ्या. त्यांची दोन्ही बाजूंचे
शेवटचे तुकडे कापून टाका. मध्ये एक उभा छेद घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घ्या व
त्यात ह्या दोन्ही भेंड्या टाकून रात्रभर ग्लास झाकून ठेवा. सकाळी उठल्यावर
भेंड्या काढून टाका व ग्लासमधील पाणी पिऊन टाका. हे पंधरा दिवस करुन पाहा.
* सदाफुलीची चार फुले सकाळी व चार
फुले सायंकाळी ४० दिवस खावीत.
* मेथीदाण्याचे चूर्ण करून
2-3 चमचे चूर्ण सकाळी काही न खाता घेणे. किंवा
रात्री दोन चमचे मेथीचे दाणे भिजवुन ठेवावे व सकाळी चावुन खावेत.
* रोज सकाळी दात घासल्यानंतर कपभर
कारल्याच्या रसात दोन चमचे आवळा रस, एक टोमॅटोचा रस नित्य सेवन केल्यास इन्सुलीन तयार
करणार्या पेशी पुन्हा कार्यरत होतात व रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
* आवळा, जांभळाच्या
बिया व कारले सावलीत सुकवून त्याची पूड करावी. ती समप्रमाणात
एकत्र करून दिवसातून तीनवेळा एक चहाचा चमचा या प्रमाणात गरम पाण्यातून घ्यावी.
* गहू, तांदूळ,
मूग, बाजरी प्रत्येकी ५०० ग्रॅम; २० ग्रॅम ओवा, ५० ग्रॅम पांढरे तीळ भाजून एकत्र करून
जाड दळून घ्यावे. याची पेज किंवा खिचडी खावी.
* पांढर्या तांदळा ऐवजी
‘ब्राऊन राईस’चा आहारात समावेश करावा. किंवा पांढरा तांदुळ भाजुन शिजवावा.
* उंबराची कच्ची फळे तशीच किंवा
भाजी करून एकवीस दिवस खाल्यास मधुमेह बरा होतो.
* आहारात ब्रोकोली या भाजीचा वापर
नियमित करावा.
* डाळिंबाची कोवळी पाने अथवा फुले,
एक तोळा, दिवसातून दोनदा चावून खावीत.
* रात्री तांब्याच्या भांड्यात रूद्राक्ष अथवा
शंख अथवा बेलाची पाच पाने अथवा कडुलिंबाची पाच पाने भिजवून ते पाणी सकाळी रिकाम्या
पोटी प्यावे.
* बेलपत्राचा पाव कप काढा रोज घेतल्याने
यकृतील ग्लायकोजेनची पातळी इंश्युलीन घेतल्यासारखी कमी होते.
* नुकताच एक नवीन उपचार समोर आला आहे ज्यामुळे
दिवसातून दोन वेळा इन्श्युलिन
घेणाऱ्या रुग्णाचा मधुमेह सुध्दा बरा होतो तो असा: प्रत्येकी १०० ग्रॅम गव्हाचे पीठ, डिंक, बार्ली आणि कलौंजी हे पाच
कप पाण्यात घालुन एक कप होईपर्यंत उकळणे. हे मिश्रण थंड झाल्यावर ते गाळून सकाळी
अनुशापोटी एक कप असे सात दिवस नियमीतपणे घेणे. दुसऱ्या आठवड्यात हेच मिश्रण एक
दिवसा आड ह्याचप्रमाणे घेणे. हे मिश्रण रोज ताजे तयार करुन प्यावे.
* ज्यांना मधुमेह आटोक्यात आणायचा
आहे त्यांच्यासाठी एकवीस दिवसाचा एक दिव्य प्रयोग पुढील प्रमाणे-
जव/सातू, पांढरे
तीळ प्रत्येकी २०० ग्रॅम; बाजरी, ज्वारी,
मूग, गहू, प्रत्येकी ५०० ग्रॅम; ओवा २० ग्रॅम असे सप्तधान्य रव्यासारखे दळून आणावेत. याची दिवसभर पुरेल इतकी पेज चवी पुरते सैंधव मीठ टाकून करून ठेवावी.
साखर अजिबात वापरू नये. एकवीस दिवस भूक लागेल तेव्हा
ही पेज, दूध, काकडी, टोमॅटो, एखादे फळ असा आहार ठेवावा. औषधे चालू ठेवावीत. एकवीस दिवसानंतर शर्करा पातळी तपासून
फरक बघावा. एकवीस दिवसानंतरही एक वेळा या पेजचा समावेश आहारात
करावा.
आहारात भात, केळं आणि तुपाचा समावेश
अवश्य असावा. दिवसातून दर तीन तासाला थोडेतरी खावे. व्यायाम भरपूर करावा आणि अगदी
झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.
आहारातून 'शुगर फ्री
गोळ्या' वर्ज्यच कराव्या. आहारात दिवसाला अर्धा चमचा साखर खाण्यास काहीच हरकत
नाही. आवश्यकतेनुसार पदार्थात अगदी थोड्या प्रमाणात गुळाचा वापर करावा. शरीरातील
उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
उपरोक्त नमुद
पावडर/चूर्ण, आयूर्वेदिक औषधांच्या किंवा काष्ठौषधीच्या दुकानात उपलब्ध असतात.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मधुमेह. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !