- महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये, शासन सेवेत कार्यरत असतांना नियम ८ अन्वये विभागीय चौकशी संदर्भात दोषारोपपत्र बजावले असेल तर, किंवा
- शासन सेवेतून निलंबीत केले असेल तर निलंबीत केल्याची तारीख किंवा दोषारोप पत्र दिले असेल ती तारीख, यापैकी जी तारीख अगोदर असेल त्या तारखेपासून विभागीय चौकशी चालू झाल्याचे मानले जाते, अथवा
- शासन सेवेत असताना कर्मचार्याविरुद्ध न्यायीक कारयाई ज्या तारखेपासून चालू झाली असेल त्या तारखेपासून विभागीय चौकशी चालू आहे असे समजण्यात येते. (महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन) नियम,१९८२ नियम २७)
- महाराष्ट्र शासन वित्त विभाग, परिपत्रक क्रमांक से.नि.से.-१०९०/२९०/सेवा-४, दि.२५/३/१९९१ अन्वये, सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांच्या बाबतीत, त्यांच्या सेवानिवृत्तीपुर्वी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२, नियम २७ अन्वये विभागीय चौकशी सुरु करण्यात आली नसेल तर निवृत्तीच्या दिनांकाला त्यांचेविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबीत आहे असे म्हणता येणार नाही.
- महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२, नियम २७ बी (२) अन्वये, सेवानिवृत्त कर्मचारी यांचेविरूध्द विभागीय चौकशीची कारवाई सुरु करताना, प्रमादाचा कालावधी चार वर्षापेक्षा अधीक असेल तर विभागीय चौकशी कारवाई सुरु करता येत नाही.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला विभागीय चौकशी कारवाई सुरु कधी मानावे. (विभागीय चौकशी). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !