उत्तर: नाही. दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम ५४ अत्यंत स्वयंस्पष्ट आहे, ज्या जमीनीचा महसूल शासनाकडून वसूल केला जातो अशा कोणत्याही अविभक्त शेतजमिनीचे विभाजन करणे, किंवा अशा जमिनीत असणाऱ्या हिश्याचा स्वतंत्र कब्जा मिळविणे, या बाबींसंदर्भातचं कलम ५४ मध्ये तरतुदी आहेत, त्यामुळे जमिनीचे विभाजन किंवा कब्जा या व्यतिरिक्त इतर संदर्भात (उदा- शेत रस्त्यासंदर्भातील, कुळकायद्या संदर्भातील आदेशाबाबत) मा. दिवाणी न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशांवर कलम ५४ अन्वये प्रकिया करण्याची आवश्यकता नसते. अशा आदेशावर थेट कार्यवाही करणे अभिप्रेत असते.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला सर्व कोर्ट हुकुमनाम्यात दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम ५४ अन्वये प्रक्रिया आवश्यक असते काय ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !