उत्तर: नोंदणीकृत खरेदीखत सक्षम न्यायालयाकडून रद्द होत नाही तोपर्यंत वैध (valid) असते. वरील प्रकरणात नोंदणीकृत खरेदी खताची नोंद घ्यावी. वारसांना नोटीस द्यावी.
खरेदी झालेल्या क्षणाला खरेदी देणार याचा मालकी हक्क, खरेदी घेणार यांच्या नावे हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे खरेदी घेणार याची नोंद होणे आवश्यक आहे. महसूल दप्तरी त्याची नोंद नाही म्हणून नोंदणीकृत खरेदी खत बेकायदेशीर/अवैध/रद्द ठरत नाही. तक्रार आल्यास मंडलअधिकार्यांनी केस चालवावी व उपरोक्त तरतुदींन्वये निकाल द्यावा.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला एका मिळकतीचे सन १९८८ मध्ये खरेदी नोंदणीकृत खत झाले आहे , परंतु तेव्हा त्याबाबचा फेरफार नोंदविण्यात आला नाही. सदर खातेदार मयत झाल्यानंतर सात-बारा सदरी त्याचे वारस दाखल झाले आहेत. आज सन १९८८ मध्ये झालेले नोंदणीकृत खरेदीखत सादर करून संबंधिताने फेरफार नोंदविण्याकामी अर्ज सादर केला आहे. नोंदणीकृत खरेदीखताची वैधता (validity) किती वर्षे असते? या प्रकरणात काय कार्यवाही करावी ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !