आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!

इतर व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीतून पाण्याचे पाट बांधणे म.ज.म.अ. कलम ४९

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 


इतर व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीतून पाण्याचे पाट बांधणे

म.ज.म.अ. कलम ४९

ज्यामधून पाणी घेण्यास परवानगी देण्यात आली आहे असे शासनाच्या मालकीच्‍या असलेल्‍या कोणत्‍याही पाण्याच्‍या साधनांसह पाण्याच्या एखाद्या साधनातून पाणी घेण्याचा ज्‍याला हक्क आहे अशा कोणत्याही व्यक्तीची उपरोक्‍त साधनातून शेतीच्या कारणाकरिता, आपल्या जमिनीस पाणीपुरवठा करण्याची, पाण्याचा पाट बांधण्याची इच्छा असेल, परंतु असा पाण्याचा पाट दुसर्‍या व्यक्तीच्या मालकीच्या किंवा कब्जात असलेल्या जमिनीमधून बांधावयाचा असेल आणि अशा बांधकामाबद्दल त्‍या व्‍यक्‍तीचा आणि  शेजारचा जमीनधारक यांमध्ये कोणताही करार झाला नसेल, तर पाण्याचा पाट बांधण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तीस विहित केलेल्या नमुन्यात तहसिलदाराकडे अर्ज करता येईल.

 तहसिलदारला अर्जदाराचा असा अर्ज मिळाल्यानंतर आणि योग्‍य ती चौकशी केल्यानंतर तसेच शेजारची जमीनधारण करणाऱ्या व्यक्तीस व त्‍या जमिनीत हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तीस अर्जासंबंधी जी कोणतीही हरकत असेल ती सादर करण्याची संधी दिल्यानंतर, अर्जदाराच्या मालकीच्या जमिनीचा शेतीसाठी पूर्णत: व कार्यक्षम रीतीने उपयोग होण्यासाठी पाण्याचे पाट बांधणे आवश्‍यक आहे अशी तहसिलदाराची खात्री झाल्‍यानंतर, तहसिलदार लेखी आदेशान्‍वये अर्जदारास पुढील अटी व शर्तीवर पाण्याचे पाट बांधण्याची परवानगी देण्याविषयी शेजारची जमीन धारण करण्यार्‍या व्यक्तीस निर्देश देईल.

 अटी व शर्ती:

(एक) उभय पक्षांना परस्परसंमत होईल अशा दिशेस व अशा रीतीने किंवा अशी एकवाक्यता न झाल्यास ज्या जमिनीतून उक्त पाट बांधण्यात येतील त्या जमिनीचे ज्यामुळे कमीत कमी नुकसान होईल अशा रितीने, तहसिलदाराकडून निर्देशित करण्यात आल्याप्रमाणे अशा जमिनीतून पाण्याचे पाट बांधण्यात येतील.

(दोन) असे पाण्याचे पाट जमिनीखालील किंवा जमिनीवरील नळाच्या स्वरुपात असतील त्या बाबतीत शेजारची जमीन धारण करणार्‍या व्यक्तीच्या जमिनीची सर्व परिस्थिती विचारात घेऊन, असा नळ अशा जमिनीमधून शक्यतोवर कमीत कमी अंतरावर टाकण्यात येईल.

जेव्हा असे पाण्याचे पाट जमिनीखालील नळाच्या स्वरुपातील असतील त्याबाबतीत, असे नळ जमिनीच्या पृष्ठभागापासून अर्ध्या मीटरहून कमी नसेल इतक्या खोलीवर टाकण्यात येतील.

(तीन) असा पाण्याचा पाट जलखाचेच्या स्वरुपातील असेल त्याबाबतीत, अशा जलखाचेची रुंदी, पाणी वाहून नेण्यासाठी पूर्णत: आवश्यक असेल अशा रुंदीपेक्षा जास्त असणार नाही आणि कोणत्याही बाबतीत ती दीड मीटरपेक्षा अधिक असणार नाही.

(चार) अर्जदार शेजारच्या जमीनधारकास -

(क) अशा जमिनीवर क्षतीकारक रीतीने परिणाम करणारे पाण्याचे पाट बांधल्यामुळे अशा जमिनीचे जे कोणतेही नुकसान झाले असेल त्याबद्दल नुकसानभरपाई देईल; आणि

(ख) पाण्याचे पाट हे जलखाचेच्या व जमिनीवर घालण्यात आलेल्या नळाच्या स्वरुपातील असतील त्याबाबतीत तहसिलदार वाजवी म्हणून ठरवील असे वार्षिक भाडे आणि असा प्रवाह जमिनीखालील नळाच्या स्वरुपातील असेल त्याबाबतीत, ज्या जमिनीखालून नळ घालण्यात आला असेल त्या जमिनीच्या एकूण लांबीबद्दल प्रत्येक दहा मीटरला किंवा त्याच्या भागासाठी २५ पैसे या दराने भाडे देईल.

(पाच) अर्जदार पाण्याचे पाट योग्य अशा दुरुस्त स्थितीत ठेवील.

(सहा) पाण्याचा पाट हा जमिनीखालून कलेल्या नळाच्या स्वरुपाचा असेल त्याबाबतीत अर्जदार:

() शक्यतो कमीत कमी वेळात जमिनीखालून असा नळ टाकण्‍याची व्‍यवस्‍था करील.

() जमिनीखालूनळ टाकण्‍याच्‍या प्रयोजनासाठी वाजवी रित्‍या आवश्‍यक असेल तितकीच जमीन खोदेल आणि अशा रितीने खोदलेली जमीन स्‍वखर्चाने पुन्‍हा भरून काढेल आणि पूर्ववत सपाट करून देईल.

(सात) जेव्हा नळ टाकण्‍याची, तो दुरूस्‍त करण्याची किंवा त्‍याचे नवीकरण करण्‍याची अर्जदाराची इच्छा

असेल तेव्‍हा तो, आपला असा इरादा शेजारच्‍या जमीन मालकास वाजवी नोटीसीव्‍दारे कळवील आणि तसे करतांना जमिनीस किंवा त्यावरील कोणत्याही उभ्या पिकांना शक्यतो कमीत कमी नुकसान पोहोचेल याची दक्षता घेईल.

(आठ) तहसिलदारास ज्या शर्ती घालणे योग्य वाटेल अशा इतर शर्तीचे पालन करेल.

 तहसिलदारने दिलेल्या आदेशात शेजारची जमीन धारण करणार्‍या व अशा जमिनीत हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्ती यांच्यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम कशी विभागून द्यावयाची हे निर्दिष्ट करण्यात येईल.

असा कोणताही आदेश अंतिम असेल आणि अशा आदेशावरून त्याला किंवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधीला किंवा त्या कारणाकरिता त्याने कामावर लावलेल्या इतर व्यक्ती, मदतनीस किंवा कामगार यांना आदेशात निर्दिष्ट केलेल्या जमिनीवर प्रवेश करण्यासाठी आणि पाण्याचा पाट बांधण्याकरिता व त्याचे नवीकरण करण्याकरिता किंवा तो दुरुस्त करण्याकरिता आवश्यक असे सर्व काम करण्यासाठी संपूर्ण अधिकार मिळेल.

 असा आदेश ज्याच्या बाजूने देण्यात आला असेल तो अर्जदार जर,

() नुकसान भरपाईची रक्कम देण्यात किंवा खंडाची रक्कम देण्यात कसूर करील, तर अशी रक्कम मिळण्याचा जिला हक्क असेल अशा व्यक्तीने तहसिलदाराकडे अर्ज केल्यावर ती जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करता येईल.

() पाण्याचा पाट योग्य व दुरुस्त स्थितीत ठेवण्यात कसूर करील तर ती व्यक्ती अशा कसुरीमुळे जे कोणतेही नुकसान होईल त्याबद्दल तहसिलदाराकडून ठरविण्यात येईल अशी नुकसानभरपाई देण्यास पात्र होईल.

 एखाद्या व्यक्तीस या कलमान्वये प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारानुसार बांधलेला पाण्याचा पाट काढून टाकण्याचा किंवा बंद करण्याचा तिचा इरादा असेल तर तिला तहसिलदारास व शेजारची जमीन धारण करणार्‍या व्यक्तीस नोटीस दिल्‍यानंतर तसे करता येईल.असा पाण्याचा पाट काढून टाकल्यास किंवा बंद केल्यास त्‍यातुन पाणी घेणार व्‍यक्‍ती शक्यतो कमीत कमी वेळात, स्वखर्चाने जमीन भरून काढील व पूर्ववत करेल.

ती व्‍यक्‍ती तसे करण्‍यास कसूर करील तर, शेजारची जमीन धारण करणार्‍या व्यक्तीस तहसिलदारकडे अर्ज करता येईल आणि तहसिलदार संबंधीत व्‍यक्‍तीस कमीत कमी वेळात, स्वखर्चाने जमीन भरून काण्‍यास व पूर्ववत करण्‍यास भाग पाडेल.  

 

शेजारची जमीन धारण करणार्‍या व्यक्तीस किंवा तीच्या वतीने कोणत्‍याही व्‍यक्‍तीस उभय पक्षांमध्ये परस्परसंमतीने ठरविण्यात येतील असे दर देऊन एकवाक्यता न झाल्यास तहसिलदार ठरवील असे दर देऊन, पाण्याच्या पाटातील पाण्याचा उपयोग करण्याचा हक्क असेल. पाण्याच्या पाटात जादा पाणी आहे किंवा नाही याविषयी विवाद उदभवल्यास त्याचा निर्णय तहसिलदार करील व तहसिलदाराचा असा निर्णय अंतिम असेल.

 

तहसिलदाराने या कलमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाविरुध्द अपील करता येणार नाही. परंतु जिल्हाधिकाऱ्यास, कोणत्याही प्रकरणासंबंधीचे कागदपत्र मागविता येतील व त्यांची तपासणी करता येईल आणि तहसिलदाराने दिलेला आदेश हा बेकायदेशीर किंवा अयोग्य आहे असे त्यास वाटत असेल, तर उभय पक्षांना नोटीस दिल्यानंतर, त्यास योग्य वाटेल असा आदेश देता येईल.

 

तहसिलदाराने किंवा जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या आदेशाविरुध्द कोणत्याही न्यायालयात आक्षेप घेण्यात येणार नाही.

 जिल्हाधिकारी किंवा भू-मापन अधिकारी, तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांच्या पुढील संक्षिप्त चौकशीनंतर ज्या कोणत्याही व्यक्तीने, योग्यरीत्या बांधलेल्या किंवा टाकलेल्या कोणत्याही पाण्याच्या पाटास हेतुपुरस्पर क्षती किंवा नुकसान पोहोचविल्याचे सिध्द झाले असेल त्या बाबतीत, अशा रीतीने क्षती किंवा नुकसान पोहोचविल्याबद्दल प्रत्येक वेळी शंभर रुपयांहून अधिक नसेल इतक्या दंडास पात्र होईल.

 

पाण्याच्या पाटाचा दर ठरविण्याच्या बाबतीत वाद उद्‍भवल्यास तहसिलदार ठरविल तो दर

शेवटचा समजला जातो. तहसिलदाराने किंवा जिल्हाधिकाऱ्याने दिलेल्या आदेशाविरूध्द कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही.

 

=š

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला इतर व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीतून पाण्याचे पाट बांधणे म.ज.म.अ. कलम ४९. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.