तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम बाबत
तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियम बाबत
जमिनीच्या असंख्य तुकडयांमुळे शेती व्यवसाय तोटयात जातो आणि शेती विकासाला खिळ बसते.
शेती विकासाला प्रोत्साहन देणे
तसेच शेती उत्पादनात सुधारणा करणे, शेतीची उत्पादकता वाढवणे हा प्रमुख उद्देश ठेऊन तुकडेजोड
तुकडेबंदी कायदा अंमलात आणला गेला.
आर्थिकदृष्टया परवडणार नाही असे
शेतीचे आणखी तुकडे होण्यास प्रतिबंध करणे आणि राज्यभरातील तुकडयांचे एकत्रिकरण
करणे हा सदर कायदयामागील प्रमुख हेतू होता.
कलम २(४) अन्वये 'तुकडा' म्हणजे, सदर अधिनियमान्वये ठरविलेल्या समुचित प्रमाण क्षेत्रापेक्षा कमी विस्ताराचा भूखंड. परंतु कोणत्याही जमिनीचा काही भाग पाण्यामुळे वाहून गेला असेल तर उर्वरीत क्षेत्र तुकडा समजण्यात येणार नाही.
जमिनीचा 'तुकडा' म्हणजे किती क्षेत्र हे आवश्यक ती चौकशी करून शासनाने ठरवायचे होते. त्याप्रमाणे
भिन्न भिन्न क्षेत्रासाठी किती क्षेत्राची जमीन तुकडा मानायची हे जाहीर करण्यात
आले. त्यासाठी शासनाने जिराईत, भात, बागायत आणि वरकस अशा वर्गीकरणांना मान्यता
दिली आहे.
शासनाने ठरविलेले क्षेत्र खालील
प्रमाणे.
¢ जिरायत जमीन - ०१ ते ०४ एकर
¢ भात जमीन - ०१ गुंठा ते ०१ एकर
¢ बागायत जमीन - ०५ गुंठे ते ०१ एकर
¢ वरकस जमीन - ०२ एकर ते ०५ एकर
परंतु,
असा
तुकडा धारण करणाऱ्या व्यक्तीस, तो तुकडा
राज्य शासनाकडे किंवा जमीन गहाण घेणाऱ्या बँकेकडे किंवा कोणत्याही इतर सहकारी
संस्थेकडे,
यथास्थिति
राज्य शासनाने किंवा अशा बँकेने किंवा संस्थेने त्यास दिलेल्या कोणत्याही कर्जाबद्दल
तारण म्हणून,
गहाण
ठेवता येईल किंवा त्याचे हस्तांतरण करता येईल.
(२) त्यावेळी
अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात किंवा करारनाम्यात काहीही असेल तरी,
असा
कोणताही तुकडा त्याच्या लगतची जमीन कसणाऱ्या व्यक्तीव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस भाडे पट्ट्याने दिला जाणार नाही.
कोणत्याही
स्थानिक क्षेत्रातील कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभागणी तुकडा निर्माण
होईल अशा रीतीने केली जाणार नाही.
जमिनीचे
तुकडे करणाऱ्या जमीन हस्तांतरणास किंवा जमिन विभागणीस कलम आठच्या तरतुदीने बंदी
घातली असली तरी,
जमिनीच्या
पूर्वीच्याच असलेल्या तुकड्यांना ही बंदी अर्थातच लागू होत नाही. याचा अर्थ
पूर्वीपासून म्हणजे कायदा अंमलात येण्याच्या वेळी अस्तित्वात असलेल्या जमिनीच्या
तुकड्यांचे हस्तांतरण किंवा विभागणी होऊ शकते
(१) हस्तांतरण, हुकूमनामा,
वारसाहक्क
यामुळे किंवा इतर कारणांमुळे, जर दोन किंवा
अधिक व्यक्तींना, ज्या स्थानिक क्षेत्रात प्रमाण
क्षेत्रे ठरविण्यात आली असतील त्या कोणत्याही स्थानिक क्षेत्रातील अविभक्त जमिनीत
हिस्से मिळण्याचा हक्क असेल आणि सदर
जमिनीची त्यांच्यात विभागणी करावयाची असल्यास त्या बाबतीत, अशी
विभागणी तुकडा निर्माण होणार नाही अशा
रीतीने करण्यात येईल.
(अ) जर
अनेक सहहिस्सेदारांमध्ये विभागणी करताना एखाद्या
सहहिस्सेदारास जमिनीतील विशिष्ट हिस्सा मिळण्याचा हक्क आहे आणि त्याला तो हिस्सा
तुकडा निर्माण केल्याशिवाय देणे शक्य नाही, असे
आढळून येईल तर त्याला त्या हिश्श्याबद्दल पैशाच्या स्वरूपात भरपाई देण्यात येईल. भरपाईची रक्कम व्यवहार्य असेल तेथवर,
भूमी
संपादन अधिनियम,
१८९४
मधील कलम २३ च्या उपबंधानुसार ठरविण्यात येईल;
खंड (क) अन्वये ज्यास जमीन नेमून दिलेली आहे असा सहहिस्सेदारापैकी कोणीही भरपाई देऊन हिस्सा घेत नसल्यास, तो हिस्सा लिलाव करून सर्वात जास्त किंमत देणारास विकण्यात येईल आणि खरेदीची किंमत, ज्यास जमीन मिळालेली नाही त्या सहहिस्सेदारास त्याच्या हिश्श्यांच्या प्रमाणात देण्यात येईल. ज्या पद्धतीमुळे तुकडा निर्माण होणार नाही अशी विभागणीची अन्य कोणतीही पद्धत पक्षकारांना मान्य झाल्यास विभागणी करताना ती पद्धत अनुसरण्यात येईल.
सूट मिळालेल्या जमिनी
मुंबईचा
जमिनीचे तुकडे पाहण्यास बंदी व एकसीकरण कायदा सन १९४७, कलम ८
अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे शासनाने अधिसूचित केलेल्या अधिकृत सार्वजनिक कारणे
दाखविणारी यादी परिशिष्ट- 'क'
(एखाद्या अधिकृत सार्वजनिक कारणासाठी जमीन वर्ग केल्यास कलम
७, ८ आणि ८ अ ची बंधने
लागू होणार नाहीत अशा कारणांची
यादी)
१. धर्मशाळा बांधण्यासाठी
२. मुले व प्रौढ यांच्यासाठी खेळाची मैदाने,
३. शाळा,
४. महाविद्यालये,
५. खेड्यातील प्रेक्षागृहे,
६. विद्यार्थ्यांची वसतीगृहे,
७. सार्वजनिक दवाखाने,
८. सार्वजनिक वाचनालये,
९. प्रशासकीय इमारत अथवा कर्मचारी
वृंदांच्या राहण्याची जागा,
१०. गोदामे,
११. प्रवासी बंगले अथवा विश्रामगृहे
(केंद्र अथवा राज्य शासन अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकार्याने बांधलेली)
१२. राज्य शासन अथवा कोणत्याही स्थानिक
प्राधिकार्याने सार्वजनिक कामासाठी बांधलेल्या विहिरी,
तळी,
कालवे,
पाट
व इवर पाण्याचे मार्ग.
१३. राखीव वन,
१४. गावठाण व वाढीव गावठाण,
१५. पाझर तलाव,
१६. शासनाचे जलसिंचन प्रकल्पवृद्धीसाठी
लागणारी जमीन.
१७. मांस, मासे, भाजी बाजार,
१८. पाणी, घाणीचे
हौद व पाट
१९. चामडी कमावण्यासाठी लागणारी जागा.
२०. जकात नाके,
२१. राज्य परिवहन बस डेपो,
पीक-अप शेड,
स्टँड व यंत्रशाळा यासाठी लागणारी जमीन.
२२. कृषी विद्यापिठासाठी लागणारी जमीन.
२३. सार्वजनिक रस्ते,
२४. सार्वजनिक संडास,
२५. दहन अगर दफन भूमि,
२६. सार्वजनिक व्यायामशाळा,
२७. चराऊ जमिनी,
२८. दावणीची जागा,
२९. सार्वजनिक खळ्यांच्या जागा
३०. सार्वजनिक उपयोगासाठी खतांचे खड्डे.
३१. सहकारी गृहरचना संस्था यांना घरांच्या
बांधकामासाठी लागणारी जमीन.
(महसूल
विभाग, अधिसूचना कॉम
/ १०६९/५६२४२- दिनांक ३१.५.१९७१ अन्वये सदर विस्तृत वादी प्रसिद्ध केली आहे.)
महाराष्ट्र शासन राजपत्र-असाधारण
भाग-४ दिनांक ०१ जानेवारी २०१६ अन्वये, मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध
करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५ पारीत करून कलम ८-ब जादा दाखल
करण्यात आले आहे.
त्यानुसार महानगर पालिका किंवा
नगर परिषदांच्या सीमांमध्ये स्थित असलेल्या जमिनीस किंवा महाराष्ट्र प्रादेशीक
नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदी लागू असलेल्या जमिनीस तसेच विशेष
नियोजन प्राधिकरण किंवा नविन नगर विकास प्राधिकरण यांच्या अधिकारितेमध्ये स्थित
असलेल्या जमिनीस आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम १९६६ च्या
अधिकारितेमध्ये स्थित असलेल्या जमिनीस तसेच कटकक्षेत्र यांना लागू होणार नाहीत.
थोडक्यात
उक्त कायदयातील तरतुदींचा विचार करता-
२) यापुर्वीच ज्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडयाची खरेदी घेतली असेल, अशा तुकडयाच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुध्दा उक्त कायदयातील कलम ८ नुसार सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.
ह्या अधिनियमांच्या उपबंधांविरूद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे
हस्तांतरण किंवा विभागणी निरर्थक होईल.
¡ कलम
९ (३) नंतर ज्यादा मजकूर- कलम ३१ मध्ये अन्यथा तरतूद केली असेल त्या व्यतिरिक्त,
“दिनांक १५ नोव्हेंबर,
१९६५ रोजी आणि दिनांक ०६ सप्टेंबर, २०१७ या दिनांकापूर्वी,
जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचा व्यवहार झाला असेल आणि असे
हस्तांतरण किंवा विभाजन हे प्रचलित प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये
निवासी, वाणिज्यीक, औद्योगिक, सार्वजनिक, निमसार्वजनिक किंवा कोणत्याही अकृषिक
वापराकरीता वाटप केले असेल किंवा अशी जमीन कोणत्याही खर्याखुर्या अकृषिक
वापरण्याचे उद्देशीत केले असेल तर वार्षिक दर
विवरणपत्रानुसार (रेडीरेकनर) जमिनीच्या बाजारमुल्याच्या २५ टक्क्यापेक्षा
अधिक नसेल असे अधिमूल्य प्रदान करण्याच्या अटीला अधिन राहून असा व्यवहार
नियमानुकूल करता येईल” अशी तरतुद करण्यात आली आहे.
असा व्यवहार नियमानुकूल करून त्याची वसूल केलेली रक्कम योजना
संकेतांकानुसार जमा करावी.
(१) त्या
त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, ह्या अधिनियमान्वये नेमून दिलेली कोणतीही धारण
जमीन किंवा तिचा कोणताही भाग, या कलमात
अन्यथा उपबंधित केले असल्यास ते खेरीज करून जिल्हाधिकाऱ्याच्या पूर्वसंमतीशिवाय-
(ब) तिचे तुकडे
पडतील अशा रीतीने सदर धारण जमिनीची किंवा तिच्या कोणत्याही भागाची पोट-विभागणी
करता येणार नाही, - मग ती दिवाणी न्यायालय किंवा इतर
कोणत्याही सक्षम प्राधिकारी याच्या हुकूमनाम्यावरून किंवा आदेशावरून किंवा अन्यथा
केलेली असो;
अशी
पूर्वसंमती ही विहित करण्यात येईल अशा परिस्थितीत व अशा शर्तीस अधीन राहून
जिल्हाधिकार्यांकडून देण्यात येईल.
(अ) (एक)
ज्या क्षेत्रासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, मुंबई
प्रांतिक महानगर पालिका अधिनियम, १९४९ किंवा
नागपूर शहर महानगरपालिका अधिनियम, १९४८ अन्वये
महानगर पालिकेची रचना करण्यात आली असेल; किंवा
(दोन) ज्या
क्षेत्रासाठी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, १९५६
अन्वये नगरपालिकेची रचना करण्यात आली असेल; किंवा
(तीन) ज्या
क्षेत्रासाठी कटक अधिनियम, १९२४ अन्वये
कटकाची रचना करण्यात आली असेल अशा क्षेत्रात असलेल्या; किंवा
(ब) महाराष्ट्र
प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ च्या
कलम ४० अन्वये ज्या क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरणाची रचना किंवा नियुक्ती
करण्यात • आली असेल अशा अधिसूचित क्षेत्रात असलेल्या; किंवा
(क) महाराष्ट्र प्रादेशिक व
नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ११३ अन्वये
ज्याच्यासाठी विकास प्राधिकरणाची रचना करण्यात आली असेल त्या नवीन नगराची जागा
म्हणून निर्देशित केलेल्या क्षेत्रात असलेल्या; किंवा
(ड) राज्य
शासन,
शासकीय
राजपत्रातील अधिसूचनेद्वारे जे कोणतेही क्षेत्र कृषीतर किंवा औद्योगिक विकासासाठी
राखून ठेवले असल्याचे निर्दिष्ट करील त्या क्षेत्रात असलेल्या;
कोणत्याही
जमिनीस लागू होणार नाही.
(एक) धारण
जमिनीच्या कुळाकडे किंवा त्याच्या वारसाकडे; किंवा
(दोन) लगतच्या
धारण जमिनीचा जो मालक स्वतः त्याची जमीन कसत असेल त्या मालकाकडे,
किंवा
(तीन) एखाद्या
शेतकऱ्याकडे किंवा शेतमजूराकडे समग्रपणेः किंवा
(चार) सार्वजनिक
प्रयोजनासाठी ज्या व्यक्तीची जमीन संपादन केल्यामुळे ती भूमिहीन झाली असेल अशा
व्यक्तीकडे; किंवा
(पाच) सहकारी
संस्थेकडे;
किंवा
(सहा) मालकाने
त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाने सद्भावनेने दिलेली देणगी (मग ती
त्यास म्हणून असो किंवा अन्यथा असो) म्हणून, किंवा
(सात) धारक अशी
जमीन स्वतः कसम असेल अशा बाबतीत या अधिनियमान्वये देण्यात आलेल्या दुसऱ्या ज्या एखाद्या जमिनीचा धारक आपली जमीन अशाच रीतीने स्वतः
कसत असेल त्या जमिनी बरोबर करण्यात आलेली अदलाबदल म्हणून हस्तांतरित करावयाच्या
जमिनीस लागू होणार नाही.
परंतु
असे कोणतेही हस्तांतरण हे जमिनीचा तुकडा पडेल
अशा रीतीने करण्यात येणार नाही.
विभागणी
यांचे वैधकरण :
या
अधिनियमाच्या उपबंधाचे उल्लंघन करून १५ नोव्हेंबर
१९६५ पूर्वी कोणत्याही जमिनीची केलेली
हस्तांतरणे किंवा विभाजने किंवा पोट-विभागणी ही, जर
उपरोक्त तारखेस हस्तांतरित केलेल्या,
विभाजन केलेल्या किंवा पोट-विभागणी केलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या एक
टक्क्याइतकी रक्कम किंवा १०० रूपये, यांपैकी जी
रक्कम कमी असेल त्या रकमेइतका दंड दिला तर, या
अधिनियमाच्या उपबंधापैकी कोणत्याही
उपबंधाचे उल्लंघन केले आहे याच केवळ कारणावरून, निरर्थक
असल्याचे समजण्यात येणार नाही.
परंतु, हस्तांतरित जमीन ज्याच्या प्रत्यक्ष कब्जात असेल त्या कुळाच्या किंवा त्या जमिनीस लागून असलेली जमीन ज्याच्या प्रत्यक्ष कबजात असेल त्या व्यक्तीच्या नावाने जर असे हस्तांतरण करण्यात आले असेल तर त्या संबंधात द्यावयाचा दंड हा एक रूपया असेल.
तुकडयाची खरेदी किंवा हस्तांतरण, दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याच्या
अंमलबजावणीसाठी, विक्री, देणगी, अदला-बदल किंवा भाडेपट्टयाने देणे यासाठी परवानगी देण्यास जिल्हाधिकारी
सक्षम आहेत. याचाच अर्थ, जरी दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी
करतांना जर तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या तरतुदींचा भंग होत आहे असे निदर्शनास
आल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
तुकडेजोड तुकडेबंदी अधिनियमाच्या कलम ७ अन्वये, हा
अधिनियम अंमलात आल्यानंतर कोणत्याही तुकडयांचे हस्तांतरण किंवा तुकडा होईल असे
पोटहिस्से करणे बेकायदेशीर ठरेल. तथापि, अशा तुकडयाशी संलग्न असलेल्या जमीन
धारकास तुकडयाचे हस्तांतरण करणे विधीग्राहय ठरेल.
प्रदान केलेले अधिकार वापरून
कोणताही आदेश पारित करतांना, ज्या आदेशान्वये असे अधिकार प्रदान केले गेले आहेत
त्या आदेशाचा क्रमांक व दिनांक पारित करीत असलेल्या आदेशावर नमुद करावा.
तुकडा जमीन ४२ क-ड खाली अकृषिक केल्यानंतर ७/१२ वरून तुकडा नोंद काढून टाकतात का?
ReplyDelete