हिंदू वारसा कायद्यामधील ‘एकाहून अधिक विधवा’ असा उल्लेख
हिंदू वारसा कायद्यातील तरतुदींचा अभ्यास
करतांना, हिंदू वारसा कायदा, १९५६, कलम १०
मध्ये असा उल्लेख आहे की, ‘‘अकृतमृत्युपत्र
व्यक्तीची संपत्ती अनुसूचीच्या पहिल्या वर्गामधील वारसदारांमध्ये पुढील नियमानुसार
विभागली जाईल :-
नियम १. अकृतमृत्युपत्र
व्यक्तीच्या विधवेला, किंवा एकाहून
अधिक विधवा असतील तर सर्व विधवांना एकत्रितपणे एक हिस्सा मिळेल’’
E[अकृतमृत्युपत्र व्यक्ती (intestate) म्हणजे- स्वत:च्या
संपत्तीबाबात मृत्युपत्र न करता मरण पावलेली व्यक्ती कलम ३(जी)]
कलम १० मधील वरील उल्लेखामुळे, अद्यापही काही महसूल अधिकाऱ्यांचा गैरसमज आहे की, एखाद्या मयत व्यक्तीला एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर, ती व्यक्ती मयत झाल्यानंतर सर्व विधवांना एकत्रितपणे हिस्सा मिळतो, त्यामुळे एकापेक्षा
जास्त पत्नी असलेल्या मयत खातेदाराची वारस नोंद करतांना त्याच्या सर्व विधवांची
नावे वरील तरतुदीनुसार दाखल करावी. असाच सल्ला काही महसूल अधिकार्यांमार्फत दिला
जातो. अर्थातच ही बाब बेकायदेशीर आणि चुकीची आहे.
¡ हिंदू विवाह कायदा १९५५ हा दिनांक १८.५.१९५५ रोजी अंमलात आला. या कायद्यातील
कलम ५ अन्वये, ‘‘पुढील शर्ती पूर्ण झाल्यास कोणत्याही दोन हिंदूमध्ये विवाह
विधिपूर्वक लावता येईल;
(एक) विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास हयात
विवाहसाथी नसावा:’’
म्हणजेच विवाहाच्या वेळी संबंधित व्यक्तीचा/ची पत्नी किंवा पती हयात नसावा
ही कायदेशीर अट आहे.
कलम १७ अन्वये, या कायद्याच्या प्रारंभानंतर विधिपूर्वक
लावण्यात आलेला दोन हिंदूंमधील कोणताही विवाह
हा, जर अशा विवाहाच्या दिनांकास कोणत्याही पक्षाला हयात पती किंवा पत्नी असेल तर, शून्य असेल आणि तदनुसार 'भारतीय दंड संहिता'
यातील ४९४ व ४९५ या कलमांचे उपबंध लागू होतील.
वरील कलमाचा अर्थ असा की, हिंदू विवाह कायदा १९५५ च्या प्रारंभापूर्वी,
म्हणजेच दिनांक १८.५.१९५५ पूर्वी, एखाद्या व्यक्तीला जरी एकापेक्षा जास्त पत्नी असतील
तरी त्या सर्व पत्नींना ‘कायदेशीर पत्नी’ म्हणून मान्यता होती परंतु दिनांक
१८.५.१९५५ नंतर एखाद्या व्यक्तीने, त्याचा
जोडीदार (spouse) हयात असताना दुसरे लग्न केले तर ते बेकायदेशीर आणि फौजदारी
कारवाईस पात्र असेल.
¡ हिंदू वारसा कायदा, १९५६ हा दिनांक १७.६.१९५६ रोजी अंमलात आला आणि त्याआधी अंमलात आलेल्या हिंदू विवाह
कायदा १९५५ अन्वये, बहूपत्नीत्व पध्दत बेकायदेशीर ठरविण्यात आली होती. परंतु हिंदू
विवाह कायदा अंमलात येण्याआधी ज्या व्यक्तींना एकापेक्षा जास्त पत्नी होत्या
अशा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांच्या सर्व विधवांसाठी वारसहक्क निश्चित
करणे आवश्यक होते.
म्हणुनच, हिंदू विवाह कायदा १९५५ अंमलात येण्याआधी ज्या
व्यक्तींना एकापेक्षा जास्त पत्नी होत्या अशा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांच्या
सर्व विधवांना वारसहक्क मिळावा या दृष्टिकोनातून, हिंदू वारसा कायदा,
१९५६, कलम १० मध्ये नियम १ अन्वये, अकृतमृत्युपत्र व्यक्तीच्या
विधवेला, किंवा एकाहून अधिक विधवा असतील तर सर्व विधवांना
एकत्रितपणे एक हिस्सा मिळेल
अशी तरतूद करण्यात आली होती.
अर्थातच, उक्त तरतूद दिनांक १८.५.१९५५ नंतर झालेल्या विवाहांना लागू नाही.
त्यामुळे, आता एखाद्या मयत खातेदाराला एकापेक्षा
जास्त पत्नी असल्या तरी फक्त कायदेशीरपणे विवाह केलेली पहिली पत्नीच
अशा खातेदाराची कायदेशीर वारस ठरेल.
hf
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला हिंदू वारसा कायद्यामधील ‘एकाहून अधिक विधवा’ असा उल्लेख. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link
Telegram Channel Link धन्यवाद !