कायदा
व सुव्यवस्था भंग झाल्यास परिस्थिती कशी हाताळावी
भारतीय
नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १४८ मध्ये मुलकी बळाचा वापर करून जमाव पांगविण्याची
तरतुद आहे. या कायद्याच्या कलम १४९ अन्वये जमाव पांगविण्यासाठी सशस्त्र
सेनादलांचा वापर करण्याची तरतुद आहे. याच कायद्याच्या कलम १५१ अन्वये उपरोक्त
कलमान्वये केलेल्या कार्यवाहीला खटला भरला जाण्यापासून संरक्षण दिले आहे.
कायदा
व सुव्यवस्था अबाधित राखणे हे दंडाधिकार्याचे कर्तव्य असते. दंडाधिकारी या नात्याने
काम करतांना, काहीवेळा कायदा व सुव्यवस्था भंग झाल्यास, अशी परिस्थिती मोठ्या
कौशल्याने हाताळावी लागते.
कायदा
व सुव्यवस्था भंग झाल्यास परिस्थिती हाताळतांना, संबंधित
दंडाधिकार्याला उद्या चौकशी समिती समोर उत्तरे द्यावयाची आहेत हे गृहित धरुन पावले
उचलावीत आणि दंडाधिकार्याने स्वत:साठी जास्तीत जास्त अनुकूल असेल असा पुरावा निर्माण
करण्याचा प्रयत्न करावा.
कायदा
व सुव्यवस्था भंग करणारी परिस्थिती निर्माण होत आहे असे जाणवल्यास पोलीस अधिकारी दंडाधिकारी
यांना पाचारण करतात. असा प्रसंग उपस्थित होईल याची चाहूल
लागताच दंडाधिकार्याने वरिष्ठांना कळविण्याची दक्षता घ्यावी. दंडाधिकारी घटनास्थळी
उपस्थित झाल्यानंतर पोलीसांनी प्रथम दंडाधिकारी यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणे
आवश्यक आहे. जरूर तर दंडाधिकार्याने तशा सूचना पोलीसांना द्याव्यात. दंडाधिकारी
यांनी अशा वेळेस स्वत: बरोबर व्हिडीओ चित्रिकरणाची व्यवस्था ठेवावी.
दंडाधिकारी
यांनी प्रथम लाऊड-स्पिकरवर जमावाला निघून जाण्याची सूचना
करावी. निघून
जाण्याच्या सूचनेचा जमावावर काहीही परिणाम झाला नाही तर प्रथम अश्रुधुराच्या कांड्या
फोडण्याचा आदेश देणे भाग पडते. जमावाला अश्रुधुराच्या
कांड्या फोडणार असल्याची कल्पना लाऊड-स्पिकरवरून द्यावी.
वार्याच्या
दिशेची अनुकूलता बघून अश्रुधुराच्या कांड्या फोडण्याचा आदेश पोलिसांना द्यावा.
पोलिसांना
नेहमीच बळाचा वापर करण्याची घाई झालेली असते त्यामुळे शक्य असेल तो पर्यंत पोलिसांना
बळाचा वापर करु देणे दंडाधिकार्याने टाळावे. यामुळे
उद्या चौकशी समिती समोर दंडाधिकार्याच्या सहनशीलतेचा पुरावा मांडणे सोपे जाईल.
अश्रुधुराचाही
परिणाम झाला नाही तर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश देणे भाग पडते.
लाठीचार्ज
करणार असल्याची कल्पना लाऊड-स्पिकरवरून जमावाला
द्यावी.
परंतू
लाठीचार्ज करण्याचा आदेश देण्यापूर्वी पुरेशा रुग्ण वाहिकांची सोय करण्याच्या सूचना
पोलिसांना द्याव्यात. समोरच्या जमावात जर स्त्रिया आणि लहान
मुले असतील तर तसेच फक्त ‘तमाशा’
बघण्यासाठी
थांबलेल्या लोकांना जमावापासून दूर करण्याचा प्रयत्न करण्यास पोलिसांना सांगावे.
त्यानंतरच
जमावाच्या कमरेखाली लाठीचार्ज करण्याचा आदेश द्यावा.
लाठीचार्ज
करुनही पाहिजे तो परिणाम साधता आला नाही तर गोळीबाराचा आदेश देण्याशिवाय दुसरा पर्याय
नसतो.
गोळीबार
करणार असल्याची कल्पना लाऊड-स्पिकरवरून जमावाला
द्यावी.
गोळीबारापूर्वी
लाठीचार्ज करणार्या पोलिसांना परत बोलवावे. गोळीबाराचा
आदेश देण्यापूर्वी गोळीबार करण्यास सक्षम जवानांच्या पथक प्रमुखाशी किंवा बंदोबस्त
प्रमुखाशी थेट संपर्क साधावा. त्याला स्वत:ची ओळख
द्यावी.
त्याला
दंडाधिकारी देणार असलेल्या सुचनांकडे/ इशार्याकडे लक्ष
ठेवण्यास सांगावे.
शक्यतो
गोळीबार पथक आणि जमाव यांच्यामधील अंतर ७५ ते १०० यार्ड असावे.
गोळीबार
करतांना गोळी कमरेखाली लागेल याची दक्षता घेण्यास सांगावे. शक्य
असेल तर पहिल्या ३-४ गोळ्या हवेत फायर करण्यास सांगावे.
त्याचा काही परिणाम होतो का हे बघावे. नंतर अनेक गोळ्या
एकाच वेळेस सुटणार नाहीत तर एक-एक गोळी ४-५ सेकंदाच्या
अंतराने, तुमच्या सुचनेनुसारच फायर होईल अशा सूचना गोळीबार पथक प्रमुखाला द्याव्यात.
यामुळे
गोळीबारानंतर जखमींची संख्या कमी होईल. त्यानंतर गोळीबाराचा आदेश द्यावा.
जमाव
पांगताक्षणी गोळीबार थांबवावा.
जमाव
पांगल्याची खात्री होताच प्रथम लाठीचार्ज/गोळीबारात
जखमी/मयत झालेल्या
व्यक्तींना आणि पोलिसांना उपलब्ध रुग्णवाहिकांतून दवाखान्यात पोहोचविण्याची व्यवस्था
करावी.
लाठीचार्ज/गोळीबारात
जखमी/मयत व्यक्तीवर
जर जमावातील लोकांनी कब्जा केला तर मोठा अनर्थ घडू शकतो हे लक्षात ठेवावे.
या
घटनेत जर काही लोक मरण पावले असतील तर त्यांचा पंचनामा आणि शवचिकित्सा शक्य तितक्या
लवकर उरकण्याचा प्रयत्न करावा.
अश्रुधुर/लाठीचार्ज/गोळीबार
करण्याबाबत विशिष्ठ नमुना उपलब्ध नाही. साध्या कागदावर असे आदेश देता येतात.
अशा
घटनेनंतर दंडाधिकार्याने तात्काळ पोलिस ठाण्यात प्रथम खबर अहवाल दाखल करावा.
जमावाने
आणि पोलिसांनी वापरलेली शस्त्रे पंचनाम्याने ताब्यात घ्यावीत.
लोकांमध्ये
मिसळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. दंडाधिकार्याने
बरोबर नेहमी पोलिस बळ असू द्यावे. पत्रकार मंडळींना
दंडाधिकार्याने त्याची बाजू समजावून सांगावी.
घटनेच्या
वेळी उपस्थित जमावातील लोकांची संख्या, अटक केलेल्या
लोकांची संख्या, जखमी, मयत लोकांची
संख्या,
पोलिस
बळाची संख्या,
लाठी
चार्ज करणार्या आणि गोळीबार करणार्या पोलिसांची संख्या, वापरलेल्या
रायफल्स,
काडतुसे
यांची संख्या या सर्वांची आकडेवारी गोळा करावी.
दंडाधिकार्याने
पोलिस नियंत्रण कक्षात आणि हॉस्पिटलमध्ये स्वत:च्या विश्वासातील माणसे नेमावी.
त्यांना
सतत संपर्कात राहण्याच्या सूचना द्याव्या.
दैनंदिन अहवाल वरिष्ठांना सादर करावा.
दंडाधिकार्याने
वर्तमान पत्रांच्या बातम्यांवर लक्ष ठेवावे. कात्रणे
जमा करून ठेवावीत. शांतता समितीची बैठक बोलवावी.
लोकांना
शांत राहण्याचे आवाहन करावे. कडक पोलिस बदोबस्त
ठेवण्याच्या सूचना द्याव्या.
अशा
प्रसंगी भा.न्या.सं.च्या
खालील कलमांचा वापर प्रभावीपणे करता येतो.
*१९२: दंगल
घडेल अशा उद्देशाने लोकांना चिथावणी देणे; *१९६:
समाजातील
दोन वर्गात तेढ निर्माण होईल अशी चिथावणी देणे; *३५३:
अफवा
पसरवणे,
असत्य
विधाने करणे.
|b|
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला कायदा व सुव्यवस्था भंग झाल्यास परिस्थिती कशी हाताळावी. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link
Telegram Channel Link धन्यवाद !