मुखत्यारपत्र - पॉवर ऑफ ॲटर्नी
मुखत्यारपत्र (Power of Attorney) हा सर्वाधिक वापरल्या
जाणाऱ्या कायदेशीर दस्तऐवजांपैकी एक सर्वाधिक गैरसमज असलेला दस्त आहे. याला कुलमुखत्यारपत्र, वटमुखत्यारपत्र
इत्यादी नावानेही संबोधले जाते.
अनेक लोक मालमत्तेच्या व्यवहारांसाठी, परदेशात असताना कामकाज सांभाळण्यासाठी,
स्वतः कागदपत्रांची कामे हाताळू न शकणाऱ्या वृद्ध पालकांसाठी, व्यावसायिक बाबींसाठी
आणि अशा अनेक इतर परिस्थितींमध्ये मुखत्यारपत्र तयार करतात, जिथे एका व्यक्तीला दुसऱ्या
व्यक्तीला आपल्या वतीने काम करण्यासाठी अधिकृत करण्यासाठी अधिकार दिलेले असतात.
योग्यरित्या वापरल्यास, मुखत्यारपत्र हे एक अत्यंत
उपयुक्त साधन आहे. तथापि,
त्याचा अयोग्य आणि दिलेल्या मर्यादेबाहेर जाऊन केलेला वापर अनेक समस्या
निर्माण करू शकतो.
मुखत्यारपत्र (Power of
Attorney-PoA) हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्याद्वारे एक व्यक्ती, जिला अधिकार देणारी मूळ व्यक्ती किंवा प्रिन्सिपल (Principal) किंवा दाता (Donor) म्हणतात. अशा व्यक्तीचा संबंधित मालमत्तेत हितसंबंध/ मालकी हक्क असतो.
मुखत्यारपत्राद्वारे प्राधिकृत केलेला प्रतिनिधी
हा मूळ मालकाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि फक्त मुखत्यारपत्रात नमूद केलेली कृत्ये किंवा कामे करू शकतो. मूळ मालकाचा प्रतिनिधी नात्याने त्याने मुखत्यारपत्रात नमूद केलेली कामे, कायदेशीररित्या
मूळ मालकानेच केलेली कामे मानली जातात आणि ती मूळ मालकावर, जणू काही त्या मूळ मालकाने स्वतःच ती कृत्ये केली आहेत त्या प्रकारे बंधनकारक ठरतात.
भारतातील मुखत्यारपत्र हे चार प्रमुख कायद्यांद्वारे नियंत्रित केले जाते:
∙ मुखत्यारपत्र अधिनियम, १८८२ - Power of
Attorney Act, 1882
भारतातील मुखत्यारपत्रांची अंमलबजावणी आणि कार्यप्रणाली नियंत्रित करणारा प्रमुख कायदा
आहे. मुखत्यारपत्राद्वारे कोणती कृत्ये केली जाऊ शकतात आणि मुखत्यारपत्रधारकाने केलेल्या कृत्यांचा कायदेशीर परिणाम काय असतो, हे या कायद्यात
परिभाषित केले आहे.
मुखत्यारपत्राची नोंदणी केव्हा करणे आवश्यक आहे, हे नियंत्रित केले जाते. नोंदणी कायद्याचे
कलम १७ काही विशिष्ट मुखत्यारपत्रांसाठी, विशेषतः स्थावर मालमत्तेशी संबंधित असलेल्यांसाठी,
नोंदणी अनिवार्य करते.
मूळ मालक आणि मुखत्यारपत्रधारक यांच्यातील संबंध हा एक करार आहे, जो या कायद्याद्वारे नियंत्रित
केला जातो. या कायद्यातील विशेषतः कलम १८२ ते २३८ अन्वये, प्रतिनिधीची (एजंट) कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि एजन्सीची समाप्ती या सर्वांचा
यात समावेश आहे.
मुखत्यारपत्रावर लागू होणाऱ्या मुद्रांक शुल्काचे नियमन या कायद्यान्वये करतात. महाराष्ट्रात, महाराष्ट्र मुद्रांक कायद्यामध्ये विविध प्रकारच्या मुखत्यारपत्रांवर
लागू होणारे शुल्क निर्दिष्ट केले आहे.
सर्व मुखत्यारपत्रे सारखी नसतात. मुखत्यारपत्राच्या
प्रकारानुसार त्याची व्याप्ती, त्याचा कायदेशीर परिणाम आणि त्याचा वापर कशासाठी केला
जाऊ शकतो हे ठरते.
मुखत्यारपत्राचे सर्वसाधारणपणे खालील प्रकार आहेत.
सर्वसाधारण मुखत्यारपत्रधारकाला, कोणत्याही विशिष्ट
व्यवहाराच्या निर्बंधाशिवाय, आर्थिक, कायदेशीर, मालमत्ता, व्यवसाय अशा विविध बाबींमध्ये
मूळ मालकाच्या वतीने काम करण्याचा अधिकार
दिला जातो. विविध प्रकारच्या व्यवहारांचा आणि बाबींचा समावेश असलेली व्यापक
व्याप्ती असलेले मुखत्यारपत्र.
सर्वसाधारण मुखत्यारपत्रधारकाला व्यापक अधिकार असतात. ज्या परिस्थितीत मूळ मालकाला सर्वसमावेशक
प्रतिनिधित्वाची आवश्यकता असते, अशा परिस्थितीत सर्वसाधारण मुखत्यारपत्र उपयुक्त ठरते.
उदाहरणार्थ, परदेशात आलेला एखादा अनिवासी भारतीय
(NRI) ज्याला आपली भारतातील सर्व कामे आणि व्यवहार सांभाळण्यासाठी सर्वसाधारण मुखत्यारपत्र करून देतो.
ज्येष्ठ व्यक्तींना सर्व आर्थिक आणि मालमत्तेसंबंधी
बाबी सांभाळण्यासाठी सर्वसाधारण
मुखत्यारपत्र करून देता येते.
व्यवसाय करणार्या मालकांना
कंपनीचे सर्व कामकाज सांभाळण्यासाठी सर्वसाधारण मुखत्यारपत्र करून देता येते.
विशेष मुखत्यारपत्रधारकाला एक विशिष्ट कृती किंवा कृतींचा एक परिभाषित प्रकार पार पाडण्याचा अधिकार असतो. त्याची व्याप्ती मर्यादित असते. विशेष मुखत्यारपत्रधारक केवळ तेच करू शकतो जे दस्तऐवजात विशेषतः नमूद केलेले आहे.
विशेष मुखत्यारपत्र हे मुखत्यारासाठी अधिक सुरक्षित
असते, कारण त्यात मुखत्यारपत्रधारकाचे अधिकार मर्यादित स्वरूपात परिभाषित केलेले असतात. तसेच, बहुतेक
कायदेशीर प्राधिकरणे, बँका आणि उप-निबंधक कार्यालये याला प्राधान्य देतात, कारण त्याची
व्याप्ती स्पष्ट आणि निःसंदिग्ध असते.
एखाद्या विशिष्ट विक्री कराराची नोंदणी करण्यासाठी, एखाद्या अनिवासी भारतीयाच्या कुटुंबातील सदस्याला विशिष्ट मालमत्तेचे भाडे वसूल
करण्यासाठी, एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी विशिष्ट सरकारी प्राधिकरणासमोर
हजर राहण्यासाठी, विशिष्ट विक्री कराराच्या अंमलबजावणीसाठी विशेष मुखत्यारपत्र दिले जाते. असे मुखत्यारपत्र एका व्यवहारापुरते किंवा संबंधित कृतींच्या परिभाषित संचापुरते
मर्यादित असते.
हा एक कायदेशीर दस्तऐवज
आहे, पाश्चात्य कायदेशीर प्रणालींमध्ये 'शाश्वत मुखत्यारपत्र' (Durable PoA) ही संकल्पना सुस्थापित आहे. भारतात, याला स्पष्टपणे
मान्यता देणारा विशिष्ट कायदा नाही. तथापि, मुखत्यारपत्राचा मसुदा तयार करताना ते असमर्थतेनंतरही
वैध राहील, असे स्पष्ट कलम समाविष्ट केले जाऊ शकते.
यामध्ये मूळ व्यक्ती (प्रिन्सिपल) मानसिक किंवा शारीरिकरित्या
अक्षम किंवा अकार्यक्षम झाली (उदा. आजारपण, डिमेंशिया किंवा कोमा) तरीही नेमलेला
मुखत्यार दिलेले अधिकार वापरू शकतो. असे मुखत्यारपत्र
हे विशेषतः अक्षमतेनंतरही वैध राहण्यासाठी तयार केलेले असते.
जिथे मूळ व्यक्तीला हे सुनिश्चित
करायचे असते की, आजारपण, अपघात किंवा वयामुळे असमर्थ झाल्यास त्यांच्या मालमत्तेचे
व्यवस्थापन करता येईल, जिथे भविष्यातील असमर्थता हा एक विचार करण्याजोगा मुद्दा आहे तिथे असे मुखत्यारपत्र दिर्ल जाते.
‘कधीही रद्द न होणारे मुखत्यारपत्र’ असा शब्दप्रयोग कायद्यात नाही.
मा. सर्वोच्च न्यायालय;
एम.एस. अनंतमूर्ती विरुद्ध जे. मंजुळा इत्यादी, दिवाणी अपील क्रमांक ३२६६-३२६७/२०२५; दिनांक २७ फेब्रुवारी, २०२५ अन्वये, करार कायद्याचे कलम २०१, मूळ मालकाने आपल्या प्रतिनीधीला (एजंटला) दिलेला
अधिकार रद्द करण्याचे विविध मार्ग विहित करते. जोपर्यंत करार कायद्याच्या कलम २०२
द्वारे असे रद्दीकरण प्रतिबंधित केलेले नाही, तोपर्यंत मूळ मालक एजन्सीचा करार संपुष्टात आणू शकतो. करार कायद्याचे कलम २०२, कलम २०१ अंतर्गत असलेल्या सामान्य नियमाला अपवाद
म्हणून, असे विहित करते की, जिथे एजंटचे स्वतःचे एजन्सीचा विषय असलेल्या मालमत्तेमध्ये हितसंबंध असतील, तिथे अशा हितसंबंधांना बाधा पोहोचेल अशा प्रकारे
एजन्सी संपुष्टात आणली जाऊ शकत नाही, जोपर्यंत याच्या विरुद्ध
कोणतीही स्पष्ट अट नसेल. (where an agent has
himself an interest in the
property
which forms the subject-matter of the agency, the agency cannot be terminated
to the prejudice of such interest unless there is an express tipulation to the
contrary.)
एखाद्या दस्तऐवजाचा अर्थ
लावताना, केवळ दस्तऐवजाचे शीर्षक किंवा त्याचे
नाव पाहून निर्णय घेणे अपेक्षीत नाही. अशा परिस्थितीत, दस्तऐवजातील मजकूर आणि पक्षांचा हेतू पाहणे हे न्यायालयाचे
कर्तव्य आहे, जे दस्तऐवजातील अटींवरून आणि/किंवा
ज्या परिस्थितीत दस्तऐवज तयार करण्यात आला त्यावरून समजू शकते. पक्षांचा हेतू
त्यांनी वापरलेल्या भाषेवरून निश्चित केला जाऊ शकतो. दस्तऐवज संपूर्णपणे पाहिला
पाहिजे.
मुखत्यारपत्रातील
“सर्वसाधारण” या शब्दाचा अर्थ विषयवस्तूसंबंधी प्रदान केलेला अधिकार असा होतो.
मुखत्यारपत्राचे स्वरूप निश्चित करण्याची कसोटी म्हणजे ज्या विषयवस्तूसाठी ते तयार
केले आहे ती होय.
मुखत्यारपत्राचे नाव
त्याचे स्वरूप निश्चित करत नाही. ‘सर्वसाधारण मुखत्यारपत्र’ म्हणून ओळखले जाणारे
मुखत्यारपत्रसुद्धा विषयवस्तूच्या संबंधात विशेष अधिकार प्रदान करू शकते.
त्याचप्रमाणे, ‘विशेष मुखत्यारपत्र’ हे विषयवस्तूसंबंधी सर्वसाधारण
स्वरूपाचे अधिकार प्रदान करू शकते. त्याचे सार अधिकारात असते, विषयवस्तूत नाही.
मुखत्यारपत्रात
केवळ ‘अपरिवर्तनीय’ (‘irrevocable’) या शब्दाच्या वापरामुळे ते मुखत्यारपत्र अपरिवर्तनीय होत
नाही. जर मुखत्यारपत्र, लिहून
देणार आणि मुखत्यारपत्रधारकाच्या हितसंबंधांशी जोडलेले नसेल, तर कोणताही बाह्य शब्दप्रयोग त्याला अपरिवर्तनीय बनवू
शकत नाही. (If the POA is not coupled with
interest, no extraneous expression can make it irrevocable.) त्याच वेळी, जरी मुखत्यारपत्र अपरिवर्तनीय असल्याचा कोणताही उल्लेख नसला, परंतु दस्तऐवज वाचल्यावर ते मुखत्यारपत्र लिहून देणार
आणि मुखत्यारपत्रधारकाच्या हितसंबंधांशी जोडलेले मुखत्यारपत्र असल्याचे दिसून
आले, तरीही ते अपरिवर्तनीय असेल.
(an agreement to sell does not meet the requirements
of Sections 54 and 55 of the TPA to effectuate
a ‘transfer’.)
असा युक्तिवाद केला जातो की, मुखत्यारपत्र अनिवार्यपणे नोंदणी योग्य नाही. मुखत्यारपत्राचा दस्तऐवज हा नोंदणी कायद्याच्या कलम १७ अन्वये अनिवार्यपणे नोंदणीयोग्य असलेल्या दस्तऐवजांपैकी एक नाही. तथापि, जर मुखत्यारपत्रधारकाला मालमत्ता विकण्याचा अधिकार देणारा मुखत्यारपत्र तयार केले असेल, म्हणजेच, जर एखादा दस्तऐवज मुखत्यारपत्र धारकाला स्थावर मालमत्ता विकण्याचा हक्क देत असेल, तर तो स्थावर मालमत्तेमध्ये हितसंबंध निर्माण करणारा दस्तऐवज ठरेल, ज्याची अनिवार्य नोंदणी आवश्यक असेल.
एका सामान्य मुखत्यारपत्राच्या (General Power of
Attorney-GPA) बाबतीत, मूळ मालक/मुखत्यारपत्र लिहून देणार व्यक्तीच्या मृत्युनंतर किंवा त्याला वेड लागल्यास किंवा तो दिवाळखोर ठरल्यास, मुखत्यारपत्रधारकाचा अधिकार आपोआप संपुष्टात येतो. त्यानंतर मुखत्यारधारकाने केलेला कोणताही व्यवहार अवैध ठरतो.
भारतीय
करार अधिनियम १८७२, कलम २०२ अन्वये,
जर मूळ मालकाने मुखत्यारपत्रधारकाला मालमत्तेमध्येच विद्यमान हितसंबंध दिले असतील (जसे की त्यांना देय असलेले कर्ज किंवा कर्जाची आगाऊ रक्कम वसूल करण्यासाठी
मालमत्ता विकण्याचा अधिकार), तर मूळ मालकाच्या मृत्युमुळे, वेडसरपणामुळे, दिवाळखोरीमुळे किंवा मुखत्यारपत्र एकतर्फी रद्दबातल केल्यामुळे
मुखत्यारपत्रधारकाचे अधिकार संपुष्टात आणले जाऊ शकत नाही.
या विशिष्ट परिस्थितीत, मूळ मालकाच्या मृत्युनंतर मुखत्यारपत्रधारकाने केलेला व्यवहार कायदेशीररित्या वैध राहतो आणि मूळ मालकाच्या कायदेशीर वारसांविरुद्ध
तो अंमलात आणण्यायोग्य असतो.
(Where the agent has himself an interest in the
property which forms the subject-matter of the agency, the agency cannot, in
the absence of an express contract, be terminated to the prejudice of such
interest.)
उदा.
१. 'अ' हा 'ब' ला आपली जमीन विकण्याचा आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेतून 'अ' कडून येणे असलेली कर्जे फेडण्याचा
अधिकार देतो. 'अ' हा अधिकार रद्द करू शकत नाही किंवा ‘अ’ च्या वेडेपणामुळे किंवा मृत्युमुळेही
हा अधिकार संपुष्टात येऊ शकत नाही.
उदा.
२. 'अ' हा 'ब' कडे कापसाच्या १,००० गाठी पाठवतो, ज्यासाठीर 'ब' ने त्याला आगाऊ रक्कम दिली आहे. 'अ' ची इच्छा आहे की 'ब' ने तो कापूस विकावा आणि त्या विक्रीच्या किंमतीतून 'अ' ने दिलेल्या आगाऊ रकमेची परतफेड
करावी. 'अ' हा अधिकार रद्द करू शकत नाही, तसेच त्याच्या
वेडेपणामुळे किंवा मृत्युमुळेही तो संपुष्टात येत नाही. परंतु मुखत्यारपत्रात, मूळ
मालकाच्या मृत्युनंतर मुखत्यारपत्रधारकाचे अधिकार संपुष्टात येतील असे कोणतेही कलम असू नये.
तथापि, मोबदला, पगार किंवा विक्री कमिशन गोळा करण्याचा साधा अधिकार
उक्त कलम २०२ अंतर्गत मालमत्तेतील
हितसंबंध म्हणून गणला जात नाही.
मूळ व्यक्ती किंवा प्रिन्सिपल
(Principal) किंवा दाता
(Donor) मुखत्यारपत्र केव्हाही रद्द करू शकतो. परंतु भारतीय करार अधिनियम १८७२, कलम २०८ अन्वये, जेव्हा मुखत्यारपत्रधारकाला, मूळ व्यक्ती किंवा प्रिन्सिपलने
मुखत्यारपत्र व त्यातील अधिकार रद्द झाल्याची प्रत्यक्ष माहिती किंवा सूचना
मिळते तेव्हाच मुखत्यारपत्रधारकाचे अधिकार संपुष्टात येतात. अशी सूचना मिळण्यापूर्वी
खत्यारपत्रधारकाने केलेले व्यवहार वैध राहतात आणि मुख्य पक्षावर कायदेशीररित्या
बंधनकारक असतात.
∙ सज्ञान असावा.
∙ स्वस्थचित्त असावा.
∙ वेडा, दिवाळखोर नसावा. आपण कोणत्या कामासाठी कोणाला प्राधिकृत करत आहोत हे समजण्यास मानसिक आणि बौध्दिकदृष्ट्या सक्षम असावा.
∙ जे काम मुखत्यारपत्रधारकाकडे सोपवायचे आहे त्यात
त्याचा कायदेशीर हितसंबंध असावा.
w मुखत्यारपत्रधारक कोण असावा?
∙ कोणतीही सुज्ञ आणि सज्ञान व्यक्ती, कंपनी किंवा फर्म मुखत्यारपत्रधारक असू शकते.
∙ मुखत्यारपत्रधारक वकीलच असावा असे अनिवार्य नाही.
∙ मुखत्यारपत्रधारक कुटुंबातील सदस्य,
मित्र, विश्वासू सहकारी किंवा कायद्याचे जुजबी ज्ञान असणारी व्यक्ती असावी. मूळ व्यक्ती किंवा प्रिन्सिपल
आणि मुखत्यारपत्रधारकाची चांगली ओळख असावी.
∙ मुखत्यारपत्रधारकाची निवड अत्यंत
काळजीपूर्वक करणे अपेक्षीत आहे. तो मूळ
व्यक्ती किंवा प्रिन्सिपलच्यावतीने व नावाने
कागदपत्रांवर सही करतो, व्यवहार पूर्ण करतो. त्याने केलेल्या कृतीस, व्यवहारास मूळ व्यक्ती किंवा
प्रिन्सिपल जबाबदार असतो.
∙ मूळ मालक आणि प्रतिनिधी
या दोघांचीही संपूर्ण कायदेशीर नावे, वय, पत्ते, संपर्क क्रमांक आणि ओळखपत्रांचा तपशील.
∙ मूळ व्यक्ती/प्रिन्सिपल एनआरआय असल्यास, पासपोर्ट क्रमांक, रहिवासी देश आणि एनआरआय दर्जा.
∙ कंपनी मूळ व्यक्ती/प्रिन्सिपल असल्यास, नोंदणी क्रमांक आणि अधिकृत स्वाक्षरीकर्त्याचा तपशील.
∙ पार्श्वभूमी आणि उद्देश:
मुखत्यारपत्र का दिले जात आहे याचे संक्षिप्त निवेदन, म्हणजेच, मुखत्यारपत्रधारकाला प्रतिनिधीची गरज का आहे याचे कारण.
∙ मालमत्तेच्या मुखत्यारपत्रासाठी: संबंधित मालमत्तेचे
सविस्तर वर्णन, मूळ व्यक्ती/प्रिन्सिपलने ती मालमत्ता कशी
मिळवली आणि कोणता विशिष्ट व्यवहार अपेक्षित आहे.
∙ मुखत्यारपत्रधारकाला प्राधिकृत केलेली प्रत्येक कृती स्पष्टपणे नमूद केली पाहिजे. न्यायालये आणि उप-निबंधक कार्यालये
मुखत्यारपत्राचा अर्थ कठोरपणे लावतात. जर एखाद्या अधिकाराचा
विशेष उल्लेख नसेल, तर ती
कृती मुखत्यारपत्रधारकाला करता येणार नाही.
∙ मालमत्तेच्या व्यवहारासाठीच्या मुखत्यारपत्रात,
विशिष्ट अधिकारांमध्ये, निर्दिष्ट मालमत्तेसाठी विक्री कराराची अंमलबजावणी आणि नोंदणी
करणे, निर्दिष्ट मालमत्तेसाठी [रक्कम] पेक्षा कमी नसलेल्या मोबदल्याकरिता विक्रीपत्र
कार्यान्वित करणे आणि त्याची नोंदणी करणे, नोंदणी अधिकाऱ्यासमोर
हजर राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे, मूळ व्यक्तीच्या वतीने विक्रीची रक्कम स्वीकारणे, मालमत्तेचा ताबा सुपूर्द करणे, व्यवहारासाठी आवश्यक असलेले कोणतेही पूरक दस्तऐवज
कार्यान्वित करणे, निर्दिष्ट मालमत्तेसाठी करार कार्यान्वित करणे आणि नोंदणी करणे.
भाडे गोळा करून निर्दिष्ट बँक खात्यात जमा करणे, मालमत्तेसंबंधीच्या नियमित प्रशासकीय बाबींसाठी सक्षम कार्यालयात हजर राहणे इत्यादी.
∙ मुखत्यारपत्रात, मुखत्यारपत्रधारक काय कृती करू शकत नाही याचा स्पष्ट उल्ख असावा.
उदा. मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण, गहाण किंवा कोणत्याही
भाराची निर्मिती
कोणत्याही त्रयस्थ पक्षाला
मुखत्यारपत्राती अधिकार सोपविणे,
स्पष्ट लेखी परवानगीशिवाय एका विशिष्ट आर्थिक मूल्यापेक्षा
जास्त रकमेचा कोणताही व्यवहार, मालमत्ता किंवा त्यातील कोणताही हक्क भेट देणे किंवा
दान करणे इत्यादी.
∙ मुखत्यारपत्रधारकाला त्यांच्या सेवांसाठी
मोबदला दिला जातो की नाही आणि त्या मोबदल्याच्या अटी काय आहेत याचा स्पष्ट उल्लेख मुखत्यारपत्रात असावा.
∙ कालावधी: मुखत्यारपत्र वैध
असण्याचा कालावधी, विशिष्ट तारखा किंवा एखादी निश्चित घटना (जसे की, “नमूद केलेल्या मालमत्तेच्या
विक्री कराराची नोंदणी होऊन नोंदणीकृत प्रत मिळेपर्यंत”) याचा स्पष्ट उल्लेख मुखत्यारपत्रात असावा. मुदत नसलेले अमर्याद मुखत्यारपत्र धोकादायक असते.
∙ अनिवासी भारतीयांचे मुखत्यारपत्र, रहिवासी देशातील नोटरीकडून नोटरीकृत आणि अपोस्टिल केलेले किंवा दुतावासाकडून साक्षांकीत केलेले
असावे.
∙ मुखत्यारपत्र रद्द करण्याची तरतूद: मुखत्यारपत्र कोण-कोणत्या परिस्थितीत रद्द होऊ
शकेल याची स्पष्ट तरतूद मुखत्यारपत्रात असावी.
मुखत्यारपत्रधारकाला स्थावर मालमत्ता विकण्याचा, हस्तांतरित करण्याचा किंवा त्यामध्ये कोणताही
हक्क निर्माण करण्याचा अधिकार देणारे, स्थावर मालमत्तेचा
ताबा देण्याचा अधिकार देणारे
मुखत्यारपत्र (PoA) नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे.
मालमत्तेच्या सर्वसाधारण व्यवस्थापनासाठी दिलेले मुखत्यारपत्र (ज्यात विक्री किंवा हस्तांतरणाचा समावेश नाही)भाडे वसूल करण्यासाठी
दिलेले मुखत्यारपत्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी दिलेले मुखत्यारपत्र, बँकिंग आणि आर्थिक बाबींसाठी दिलेले मुखत्यारपत्र तांत्रिकदृष्ट्या नोंदणी करणे आवश्यक नसले तरी, नोंदणी करणे अत्यंत उचित आहे. त्यामुळे विश्वसनीयता प्रस्थापित होते, एक सार्वजनिक नोंद तयार होते.
∙ मुखत्यारपत्रधारक हा एक विश्वस्त
असतो, त्याने मालकाच्या हितासाठीच काम केले पाहिजे. मालकाच्या खर्चावर एजंटला श्रीमंत
करण्यासाठी मुखत्यारपत्राचा वापर करणे हे विश्वस्त कर्तव्याचे उल्लंघन आहे आणि तो विश्वासाचा
भंग ठरू शकतो.
4सर्वसाधारण मुखत्यारपत्र आणि विशेष मुखत्यारपत्र यांच्यामध्ये काय फरक आहे?
a सर्वसाधारण मुखत्यारपत्र, मुखत्यारपत्रधारकाला दिलेले अधिकार कोणत्याही विशिष्ट व्यवहारापुरते मर्यादित न राहता, आर्थिक,
मालमत्ता, कायदेशीर, व्यावसायिक अशा विविध बाबींमध्ये काम करण्याचे व्यापक अधिकार देते.
विशेष मुखत्यारपत्र, मुखत्यारपत्रधारकाला एका विशिष्ट कृतीपुरते किंवा संबंधित कृतींच्या एका परिभाषित
श्रेणीपुरते मर्यादित प्रदान
करते.
aमुखत्यारपत्रधारकाला स्थावर मालमत्ता
विकण्याचा, हस्तांतरित करण्याचा, गहाण ठेवण्याचा किंवा इतर प्रकारे व्यवहार करण्याचा
अधिकार देते, तेव्हा मुखत्यारपत्राची
नोंदणी करणे अनिवार्य आहे.
4फक्त ‘कधीही रद्द न होणारे मुखत्यारपत्र’ असे नाव दिल्यामुळे मुखत्यारपत्र कधीही रद्द न होणारे ठरते काय?
aनाही. ‘कधीही रद्द न होणारे मुखत्यारपत्र’ असा शब्दप्रयोग कायद्यात नाही.
एखाद्या दस्तऐवजाचा अर्थ
लावताना, वाचकाने केवळ दस्तऐवजाचे शीर्षक किंवा त्याचे नाव
पाहून निर्णय घेऊ नये. अशा परिस्थितीत, दस्तऐवजातील मजकूर आणि
पक्षांचा हेतू पाहणे आवश्यक आहे. पक्षांचा हेतू त्यांनी वापरलेल्या भाषेवरून
निश्चित केला जाऊ शकतो. दस्तऐवज संपूर्णपणे पाहिला पाहिजे.
मुखत्यारपत्रात केवळ
‘अपरिवर्तनीय’ (‘irrevocable’) या शब्दाच्या वापरामुळे ते
मुखत्यारपत्र अपरिवर्तनीय होत नाही. जर मूळ व्यक्ती किंवा प्रिन्सिपल (Principal) किंवा दाता (Donor) आणि मुखत्यारपत्रधारक यांचे आर्थीक हितसंबंध जोडलेले नसतील, तर कोणताही बाह्य शब्दप्रयोग त्याला अपरिवर्तनीय बनवू
शकत नाही.
aएका सामान्य मुखत्यारपत्राच्या (General Power of Attorney-GPA) बाबतीत, मूळ मालक/मुखत्यारपत्र लिहून देणार व्यक्तीच्या मृत्युनंतर किंवा त्याला वेड लागल्यास किंवा तो दिवाळखोर ठरल्यास, मुखत्यारपत्रधारकाचा अधिकार आपोआप संपुष्टात येतो. त्यानंतर मुखत्यारधारकाने केलेला कोणताही व्यवहार अवैध ठरतो.
तथापि, मुखत्यारपत्रात, मुखत्यारपत्र रद्दतेबाबत स्पष्ट तरतूद असल्यास
किंवा मुखत्यारपत्रातील अटी-शर्तींचा भंग झाल्यास, मूळ व्यक्ती, मुख्यत्यारपत्रधारकास
कळवून ‘कधीही रद्द न होणारे मुखत्यारपत्र’ सुध्दा रद्द करू शकतो. मुखत्यारपत्र दिल्यामुळे
मूळ व्यक्तीचे अधिकार संपुष्टात येत नाहीत.
aनाही. कोणत्याही मुखत्यारपत्रधारकाला असे अधिकार नाहीत. असे अधिकार फक्त मूळ
व्यक्ती किंवा प्रिन्सिपल (Principal) किंवा दाता (Donor) यालाच आहेत.
4अनिवासी भारतीय व्यक्ती परदेशातून भारतातील मालमत्तेसाठी मुखत्यारपत्र कसे कार्यान्वित करू शकतो?
aअनिवासी भारतीयाने, त्याच्या राहत्या देशातील
वकीलाकडून मुखत्यारपत्र तयार करून घेऊन
भारतीय दूतावासाकडून मुखत्यारपत्रवर
सांक्षाकन करून किंवा अपोस्टिल करून मुखत्यारपत्राची मूळ प्रत भारतात पाठवणे आवश्यक असते.
aहोय, मुखत्यारपत्रात नमूद कार्य संपले असेल, मुखत्यारपत्रात
नमूद अटी-शर्तींचा भंग झेला असेल किंवा मुखत्यारपत्रधारकाचे काम समाधानकारक नसेल तर, मूळ व्यक्ती किंवा
प्रिन्सिपल किंवा दाता, मुखत्यारपत्रधारकाला औपचारिकपणे सूचित करून, मुखत्यारपत्र कधीही रद्द करू शकतो.
परंतु भारतीय करार अधिनियम १८७२,
कलम २०८ अन्वये, जेव्हा मुखत्यारपत्रधारकाला, मूळ व्यक्ती किंवा प्रिन्सिपलने मुखत्यारपत्र व त्यातील अधिकार रद्द झाल्याची प्रत्यक्ष माहिती किंवा सूचना मिळते तेव्हाच मुखत्यारपत्रधारकाचे अधिकार संपुष्टात येतात. अशी सूचना मिळण्यापूर्वी
मुखत्यारपत्रधारकाने केलेले व्यवहार वैध राहतात आणि मुख्य पक्षावर कायदेशीररित्या
बंधनकारक असतात.
aहोय, मुखत्यारपत्र दिल्यामुळे
मूळ व्यक्तीचे अधिकार संपुष्टात येत नाहीत.
तथापि, मूळ व्यक्तीने मुखत्यारपत्रात
नमूद मालमत्ता विक्री पूर्वी, मुखत्यारपत्रधारकाला त्याचा विक्रीचा इरादा कळवून, विक्रीपूर्वी मुखत्यारपत्र रद्द करावे. त्यामुळे
दुबार व्यवहार होणार नाहीत.
aजर मुखत्यारपत्रात किंवा स्वतंत्र, वैध दस्तऐवजात मूळ व्यक्ती किंवा
प्रिन्सिपल किंवा दाता याने अगदी स्पष्टपणे अशी परवानगी दिली असेल की, “मुखत्यारपत्रधारकास सदर मालमत्ता स्वतःच्या
नावे/स्वतःच्या फायद्यासाठी खरेदी करण्याचा अधिकार राहील” तर असा व्यवहार वैध
ठरेल.
भारतीय करार अधिनियम १८७२, कलम २१५ अन्वये, जर एखादा मुखत्यारपत्रधारक, आपल्या प्रिन्सिपलची (मुख्य
व्यक्तीची) पूर्वसंमती न घेता आणि त्या विषयासंबंधी स्वतःच्या माहितीत आलेल्या
सर्व महत्त्वाच्या परिस्थितींची त्याला/तिला माहिती न देता, स्वतःच्या वतीने व्यवहार
करत असेल, तर प्रिन्सिपल तो व्यवहार नाकारू शकतो.
a महाराष्ट्र
जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम १५०(२) अन्वये,फेरफारामध्ये ज्यांचा हितसंबंध आहे
त्यांना नोटीस बजावणे महसूल अधिकार्याचे विहीत कर्तव्य आहे.
मुखत्यारपत्र दिले म्हणून
मूळ व्यक्ती किंवा
प्रिन्सिपलचा हितसंबंध संपुष्टात येत नाही. त्याचा हितसंबंध अबाधित असतो.
सबब, मुखत्यारपत्रधारकामार्फत मालमत्ता
विक्रीचा व्यवहार अधिकार
अभिलेखात नोंदविण्यापूर्वी मूळ व्यक्ती किंवा प्रिन्सिपल किंवा दाता याला नोटीस बजवणे अनिवार्य आहे.
अशी नोटीस बजावल्यामुळे,
मूळ व्यक्ती किंवा
प्रिन्सिपल किंवा दाता हयात आहे, त्याने मुखत्यारपत्र रद्द केलेले नाही आणि त्याच्या अपरोक्ष सदरचा व्यवहार झालेला नाही
याची खात्री करून घेता येते.
a होय. एक प्रिन्सिपल दोन किंवा अधिक एजंटना संयुक्तपणे काम करण्यासाठी
नियुक्त करू शकतो.
l
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मुखत्यारपत्र - पॉवर ऑफ ॲटर्नी. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !