उत्तर: खरे तर खरेदी खत करून दिल्यानंतर खरेदी देणार याचा संबंधित जमिनीवरील मालकी हक्क संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्याच्या वारसांची झालेली नोंद पोकळ ठरते. अर्थात सदर खरेदी खताची माहिती नसल्यामुळे वारस नोंद घेण्यात आली होती.
आता नोंदणीकृत खरेदीखताप्रमाणे फेरफार नोंदवून वारसांना नोटीस बजवावी. त्यांचे म्हणणे/जबाब घ्यावा. तक्रार नसेल तर नोंद मंजूर करावी. वारसांनी तक्रार केली तर केस चालवावी. मयत खातेदार आणि खरेदी घेणार यांच्यात झालेला व्यवहार हा नोंदणीकृत दस्ताने झालेला आहे. दस्त नोंदणीच्या तारखेस खरेदी देणार हयात होते. हक्काची नोंद ही दस्तावर आधारीत असते, दस्त हा कितीही जुना झाला तरीही त्याची पत/किंमत (Value) कमी होत नाही. खरेदी देणार मयत झाल्यामुळे त्यात फरक पडत नाही. सबब नोंद मंजूर या आशयाचा निकाल द्यावा.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला खरेदी खताची नोंद घेण्यासाठी आज अर्ज आला आहे. खरेदी देणार मयत असून त्याच्या वारसांची नावे सात-बारा सदरी दाखल आहेत. काय कार्यवाही करावी ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !