उत्तर: सदर प्रकरण आधी विवादग्रस्त नोंदवहीला नोंदवून यावर मंडलअधिकारी यांनी सुनावणी घ्यावी.
बक्षीसपत्र नोंदणीकृत असल्याने तो कायदेशीर दस्त आहे. १९९५ साली बक्षीसपत्र करून दिल्यावर आजीचा त्या बक्षीसपत्रात नमुद क्षेत्रावरील (०.८१ आर) मालकी हक्क संपुष्टात आला आहे. ते क्षेत्र तिच्या मालकीचे राहिले नाही. जे क्षेत्र तिच्या मालकीचे नाही त्याबाबत मृत्युपपत्र करण्याचा तिला कायदेशीर अधिकार नाही. या तरतुदीन्वये एकूण १.२१ हेक्टर आर क्षेत्रापैकी ०.८१ आर क्षेत्र नातवाच्या नावे तर उर्वरीत क्षेत्र तिचा मुलगा (तिच्या नातवाचे वडील) यांच्या नावे नोंदवावे.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला आजीने १.२१ हेक्टर आर शेतजमिनीपैकी ०.८१ आर जमीन १९९५ साली तिच्या तीन वर्षाच्या नातवाच्या नावे नोंदणीकृत बक्षीसपत्राने दिली. परंतु सात-बारा सादरी त्या आजीचेच नाव कायम राहिले व जमीन त्या नातवाच्या वडीलांच्या ताब्यात राहिली. १९ वर्षानंतर सन २०१४ मध्ये त्याच आजीबाईने तिचे संपूर्ण १.२१ हेक्टर आर क्षेत्र तिचा मुलगा (तिच्या नातवाचे वडील) याला नोंदणीकृत मृत्युपत्रान्वये दिले. आजी मयत झाल्यानंतर, आज तलाठी यांना दोन्ही कागदपत्रे प्राप्त झाली. या प्रकरणात काय करावे ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !