आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न आमच्या वेबसाईटवर विचारावेत. 📌 Mahsul Guru 📌 YouTube Channel Link!

बेवारस जमीन - म.ज.म.अ. कलम ३४

Please wait 0 seconds...
Scroll Down and click on Go to Link for destination
Congrats! Link is Generated

 

बेवारस जमीन - म.ज.म.अ. कलम ३४

 एखादा खातेदार मृत्युपत्र न करता मयत झाला, त्‍याच्‍या वारसांचा पत्ता माहित नाही किंवा अशा खातेदाराला कोणीही वारस नाही, अशा परिस्‍थितीत संबंधीत जमिनीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६, कलम ३४ अन्‍वये कार्यवाही करण्‍याची तरतुद आहे.

 n कलम ३४ (१) अन्‍वये, जर एखादा भोगवटादार मृत्युपत्र न करता मरण पावला असेल आणि त्याचे वारसदार माहीत नसतील तर जिल्हाधिकारी त्याच्या वहिवाटीचा कब्जा घेतील.

असा आदेश तलाठ्‍याकडे प्राप्‍त झाल्‍यानंतर, त्‍यान्‍वये सविस्‍तर फेरफार घेण्‍यात यावा व कब्‍जेदार सदरी संबंधित जिल्‍हाधिकेर्‍यांचे नाव दाखल करून इतर हक्‍कात, ʻमूळ मालक .............. (नाव) हे बेवारस मयत, म.ज.म.अ. कलम ३४ अन्‍वये मा. जिल्‍हाधिकारी ...........(जिल्‍हा) यांचा कब्‍जाʼ अशी नोंद करावी.

जिल्हाधिकारी यांनी कब्‍जात घेतलेली अशी जमीन एका वेळी एका वर्षाच्या मुदतीकरिता, (एक साली लावणीने) पट्टयाने देता येईल.

 n कलम ३४ () अन्‍वये, पोट कलम (१) अन्‍वये जिल्हाधिकार्‍यांनी ज्या दिनांकास अशा जमिनीच्‍या वहिवाटीचा कब्जा घेतला असेल त्या दिनांकापासून तीन वर्षांच्या आत, मयत मूळ मालकाच्‍या कोणत्याही हक्कदाराने/वारसाने पुराव्‍यांसह, अशी जमीन परत देण्यात यावी म्हणून अर्ज केल्यास जिल्हाधिकारी त्‍याबाबत योग्य वाटेल अशी चौकशी करून त्‍या जमिनीचा कब्‍जा हक्कदारास/वारसास परत करतील किंवा हक्क नाकारतील.

 

n कलम ३४ () अन्‍वये, पोट कलम (२) अन्‍वये जिल्हाधिकार्‍यांनी पारीत केलेला आदेश

अपिलास किंवा फेरतपासणीस अधीन असणार नाही.

परंतु उपरोक्‍त आदेशान्‍वये जिचा हक्क नाकारण्यात आला असेल अशा कोणत्याही व्यक्तीस, जिल्हाधिकार्‍यांच्‍या आदेशाविरूध्‍द, असा आदेश प्राप्‍त झाल्‍याच्‍या दिनांकापासून एक वर्षाच्या आत, आपला हक्क शाबीत करण्यासाठी दिवाणी दावा दाखल करता येईल.

जर असा दावा दाखल करण्यात आला असेल तर, दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८, कलम ८० अन्‍वये जिल्हाधिकार्‍यांना नोटीस द्यावी लागते. अशा दाव्याचा अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्हाधिकारी पोटकलम () मध्ये तरतूद केल्याप्रमाणे ती जमीन वार्षिक पट्ट्याने देणे चालू ठेवतील.

 

n कलम ३४ () अन्‍वये, पोट कलम (१) अन्‍वये जिल्हाधिकार्‍यांनी ज्या दिनांकास अशा जमिनीचा कब्जा घेतला असेल, त्या दिनांकापासून तीन वर्षांच्या आत, अशा जमिनीचा  कोणताही हक्कदार/वारस उपस्थित झाला नाही तर किंवा पोटकलम (२) अन्वये ज्याचा हक्क नाकारण्यात आला आहे, अशा हक्कदाराने/वारसाने जर पोटकलम (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे एक वर्षाच्या आत दावा दाखल केला नाही तर जिल्हाधिकार्‍यांना अशी कब्‍जात घेतलेली जमीन लिलावाने विकता येईल.

 n कलम ३४ () अन्‍वये, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, पोट कलम (४) अन्‍वये ज्या जमिनीची विल्‍हेवाट लावण्यात आली असेल, त्या जमिनीसंबंधी ज्या हक्कदाराने/वारसाने, उक्‍त मुदतीनंतर त्‍याचा हक्क प्रस्थापित केला असेल तरी अशा हक्कदारास/वारसास संबंधीत जमीन परत देता येणार नाही.

अशा हक्कदारास/वारसास, पोटकलम (१) अन्वये जमीन एकसाली लावणीने दिल्‍यापोटी प्राप्‍त झालेला खंड आणि पोटकलम (४) अन्वये लिलावात वसूल झालेली रक्कम, यातून जमीन महसूल आणि व्यवस्थेचा व विक्रीचा खर्च तसेच वहिवाटीवरील येणे असलेल्या सर्व रकमा वजा करून फक्त शिल्लक राहणारी रक्‍कम मिळण्याचा हक्क असेल.

 थोडक्‍यात, एखाद्‍या भोगवटादाराचे वारस माहीत नसतील किंवा त्याने मृत्युपत्र केले नसेल तर त्याची जमीन जिल्हाधिकार्‍यांनी ताब्यात घेण्याची व तिची विल्हेवाट लावण्याची या कलमात तरतूद केलेली आहे.

जिल्हाधिकारी यांनी अशी बेवारस जमीन प्रथम एकावेळी एक वर्ष मुदतीने, अशी तीन वर्षापर्यंत  एक साली लावणीने/ भाडेपट्‍ट्‍याने दिली पाहिजे. नमुद मुदतीत मयत खातेदाराचे कोणी हक्‍कदार/वारस पुढे आल्यास, त्यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांना चौकशी करावी लागते.

असा हक्क सांगणारी व्‍यक्‍ती मयताची हक्‍कदार/ वारस आहे किंवा नाही, हे मयत खातेदारास लागू असलेल्या वारसा कायद्याप्रमाणे ठरवावे लागते. मयत खातेदार हिंदू, बौद्ध, जैन, अगर शीख असल्यास, हिंदू वारसा अधिनियम, १९५६ प्रमाणे, तो मुसलमान असल्यास मुस्‍लिम वैयक्‍तिक कायद्यानुसार, तो पारसी किंवा ख्रिश्चन असल्‍या भारतीय वारस अधिनियम, १९२५ नुसार त्‍याचे वारस ठरविले जातात.

संबंधीताचा वार हक्क मान्य झाल्‍यास आणि दरम्‍यानच्‍या काळात अशा जमिनीचा लिलाव झाला नसल्‍यास सदर हक्‍कदारास/वारसास जमिनीचा कब्‍जा परत मिळतो. परंतु अशा हक्‍कदाराने/वारसाने तीन वर्षानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला असेल आणि दरम्‍यानच्‍या काळात अशा जमिनीचा लिलाव झाला असेल तर जमीन एकसाली लावणीने दिल्‍यापोटी प्राप्‍त झालेला खंड आणि पोटकलम (४) अन्वये लिलावात वसूल झालेली रक्कम, यातून जमीन महसूल आणि व्यवस्थेचा व विक्रीचा खर्च तसेच वहिवाटीवरील येणे असलेल्या सर्व रकमा वजा करून फक्त शिल्लक रक्कम हक्‍कदारास/वारसास मिळते.

 

³ n ´

Rate This Article

या लेखात, आम्ही आपणाला बेवारस जमीन - म.ज.म.अ. कलम ३४. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !

Getting Info...

About the Author

Deputy Collector in Revenue Dept. Government of Maharashtra

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.