जमीन किंवा पाणी संबंधी वाद
– भा.ना.सु.सं. कलम १६४
(फौ.प्र.सं.
१४५)
१) वाद
मिळकत संबंधित कार्यकारी दंडाधिकार्याच्या अधिकार क्षेत्रातील असावी.
२) वाद हा
जमिनीशी, पाण्याशी
अथवा हद्दीशी संबंधित आणि अस्तित्वात
असावा.
३) वादाबाबत
पोलीस अहवाल किंवा मिळालेल्या अन्य खबरीवरून कार्यकारी दंडाधिकार्याची वाद असल्याची
खात्री झाली पाहिजे.
४) सदर
वादामुळे शांतता भंग घडून येणाचा संभव असावा.
· भा.ना.सु.सं. - कलम १६४(३): कार्यकारी दंडाधिकारी निर्देशित करील अशा सर्व पक्षकारांवर विहित पध्दतीने समन्स बजावण्यात येईल आणि समन्सची एक प्रत वाद मिळकतीच्या ठिकाणी किंवा वाद मिळकतीच्या जवळपास ठळक ठिकाणी लावून प्रदर्शित केली जाईल.
· भा.ना.सु.सं.
- कलम १६४(९): दंडाधिकारी
या कलमाखालील कार्यवाहीत कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही पक्षाच्या अर्जावरून
कोणालाही साक्षीदार म्हणून हजर राहण्यासाठी किंवा कागदपत्र हजर करण्यासाठी समन्स
बजावू शकेल.
दिवाणी
न्यायालयाने या वाद मिळतीस प्रापक नेमल्यानंतर, कार्यकारी दंडाधिकार्याने
नेमलेला प्रापक, दिवाणी न्यायालयाने नेमलेल्या प्रापकास कब्जा देऊन कार्यमुक्त
होईल.
परंतु जर, तो हक्क बारमहा वापरता येण्यासारखा असेल तर,
ज्यामुळे चौकशी सुरू करावी लागली असा,
पोटकलम (१) खालील पोलीस अधिकाऱ्याचा अहवाल किंवा अशी अन्य खबर
मिळण्याच्या लगतपूर्वीच्या तीन महिन्यांमध्ये असा हक्क वापरलेला असल्याशिवाय अथवा
जर तो हक्क केवळ विशिष्ट हंगामात किंवा विशिष्ट प्रसंगीच वापरता येण्यासारखा असेल
तर असा अहवाल किंवा खबर मिळण्यापूर्वीच्या अशा हंगामापैकी अखेरच्या हंगामाला किंवा अशा प्रसंगापैकी अखेरच्या
प्रसंगी असा हक्क वापरला असल्याशिवाय असा कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
· भा.ना.सु.सं. - कलम १६७(३): भा.ना.सु.सं. कलम १६४, १६५ आणि १६६ अन्वयेच्या कार्यवाहीत झालेला खर्च कोण कोणत्या पक्षाने, संपूर्ण किंवा अंशत: द्यावयाचा याबाबत निर्देश देता येतील. या खर्चात साक्षीदारांबाबत व वकीलांच्या फी बाबत आलेला, वाजवी खर्च समाविष्ठ असू शकेल.
¨ भा.ना.सु.सं. -
कलम १६४
अन्वयेची चौकशी संक्षिप्त चौकशी असून ती जलद पूर्ण करावी. (१९७२
एम.पी.एल.जे-६५७)
¨ भा.ना.सु.सं. -
कलम १६४
अन्वयेची चौकशी सुरू करण्यासाठी स्थावर मिळकतीबाबत वाद असून त्यावरून शांततेचा
भंग होण्याचा संभव असावा. (ए.आय.आर. १९६३-आसाम-३२, क्रि.लॉ.जर्न. १९६३(१)-५६५)
¨ भा.ना.सु.सं. -
कलम १६४
च्या चौकशीत दंडाधिकारी मालकी हक्क ठरवू शकणार नाही.
प्रत्यक्ष कब्जा कोणत्या पक्षाचा आहे हे पाहणे आवश्यक असते. (१९६५ के.लॉ.टा.
२१९)
¨
दिवाणी न्यायालयाने मालकी हक्क ठरवेपर्यंत भा.ना.सु.सं. कलम १६४ चा
आदेश अंमलात राहील. (ए.आय.आर. १९५७-मद्रास-४०५)
¨
छापील फॉर्ममधील नोटीस पुरशी नाही (१९७३ सी.एल.आर.-३६३)
¨ जर
दिवाणी न्यायालयाने उभय पक्षांचे हक्क ठरविले असतील तर भा.ना.सु.सं. कलम १६४ अन्वये
कारवाई करता येणार नाही. शांतता भंग होण्याचा संभव असेल तर भा.ना.सु.सं.
कलम १२६ (१०७) अन्वये कारवाई करावी. (ए.आय.आर.
१९६९-म्हैसूर-२९७)
¨
दिवाणी न्यायालयात वाद मिळकतीबाबत दावा सुरू असेल तर भा.ना.सु.सं. कलम १६४ अन्वये
कारवाई करता येणार नाही. (ए.आय.आर. १९८५-सर्वोच्च न्या. ४७२; क्रि.लॉ.जर्न.
७५२)
समन्स
(भा.ना.सु.सं कलम
१६४ (१) पहा)
रीतसर नोंदविलेल्या आधारकारणांवरुन मला असे दिसून आले आहे की, माझ्या स्थानिक
अधिकारितेत स्थित असलेल्या विवक्षित (तंट्याचा
विषय संक्षिप्तपणे नमुद करावा)...... संबंधी
खालील पक्षकारांमध्ये जेणेकरून शांतता भंग होण्याची शक्यता आहे असा तंटा अस्तित्वात
आहे.
(१) पक्षकाराचे नाव: राहण्याचे
ठिकाण:
(२) पक्षकाराचे नाव: राहण्याचे
ठिकाण:
(३) पक्षकाराचे नाव: राहण्याचे
ठिकाण:
(४) पक्षकाराचे नाव: राहण्याचे
ठिकाण:
किंवा
(तंटा गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये असेल तर)
(राहण्याचे ठिकाण) ....................
उक्त सर्व पक्षकारांना जातीने अथवा त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीमार्फत उक्त
(तंट्याची विषयवस्तू), त्याचा प्रत्यक्ष कब्जा कोणाकडे होता या तथ्यासंबंधी आपापले दावे मांडणासाठी
आणि लेखी कैफियती सादर करण्यासाठी जरूर त्या कागदपत्रांसह माझ्या न्यायालयात दिनांक
.../.../.... रोजी सकाळी .../... वाजता रीतसर चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश
देण्यात येत आहेत.
दरम्यानच्या काळात ज्यांच्याकडे उक्त .......... (तट्यांचा विषय) चा कब्जा
आहे आणि त्याला रीतसर कायदेशीर मार्गाने त्यास (त्यांस) काढून टाकण्याचा आदेश
दिला जाईपर्यंत त्यांच्या कब्जाला कोणताही अडथळा आणण्यास मी सक्त मनाई करीत आहे.
आज दिनांक ......... माहे............ २०......... रोजी हा आदेश माझ्या सही
शिक्क्यासह देण्यात आला आहे.
(मोहोर)
दिनांक:
(नाव, पदनाम व दिनांकीत सही)
प्रत: १. संबंधित पोलीस निरीक्षक
२. संबंधित मंडळ अधिकारी
३. संबंधित ग्राम महसूल अधिकारी, साझा......
४. संबंधित पोलीस पाटील
या समन्सची
एक प्रत वाद मिळकतीच्या ठिकाणी किंवा वाद मिळकतीच्या जवळपास ठळक ठिकाणी लावून
प्रदर्शित करावी.
(मोहोर)
दिनांक:
(नाव, पदनाम व दिनांकीत सही)
--
नमुना क्र. २५
आदेश
(भा.ना.सु.सं कलम
१६४ (४) पहा)
रीतसर नोंदलेल्या आधारकारणांवरुन मला असे दिसून येते की, माझ्या स्थानिक
अधिकारितेत स्थित असलेल्या विवक्षित (तंट्याचा
विषय संक्षिप्तपणे नमुद करावा)......
संबंधी..... (पक्षकाराचे नाव व राहण्याचे ठिकाण, किंवा तंटा
गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये असेल तर फक्त राहण्याचे ठिकाण लिहावे) यांच्या मध्ये, जेणेकरून शांतता भंग होण्याची शक्यता आहे असा तंटा अस्तित्वात
होता. उक्त सर्व पक्षकारांना उक्त (तंट्याची विषयवस्तू), त्याचा प्रत्यक्ष कब्जा कोणाकडे होता या तथ्यासंबंधी आपापले
दावे मांडणार्या लेखी कैफियती सादर करण्यास सांगितले होते, आणि रीतसर चौकशी
केली असता, कब्जाच्या वैध
हक्काबाबत, उक्त पक्षकारांपैकी कोणाच्या दाव्यात कितपत तथ्य आहे ते विचारात न घेता
असे दिसते की, उक्त ..........
(नाव किंवा नावे किंवा वर्णन) याचा प्रत्यक्ष कब्जाबाबतचा दावा खरा आहे अशी खात्री झाल्यामुळे, मी,
............... (नाव व पदनाम) असे घोषित करतो की, .............. (नाव/नावे) यांच्याकडे) उक्त .......... (तट्यांचा विषय) चा कब्जा आहे आणि रीतसर
कायदेशीर मार्गाने त्यास (त्यांस) काढून टाकण्याचा आदेश दिला जाईपर्यंत असा कब्जा
ठेऊन घेण्यास तो (ते) हक्कदार आहे (आहेत) आणि दरम्यान त्याच्या (किंवा त्यांच्या)
कब्जाला कोणताही अडथळा आणण्यास मी सक्त मनाई करीत आहे.
आज दिनांक ......... माहे............ २०......... रोजी हा आदेश माझ्या सही
शिक्क्यासह देण्यात आला आहे.
(मोहोर)
दिनांक:
(नाव, पदनाम व दिनांकीत सही)
--
u जप्तीचे वॉरंट
नमुना क्र. २६
जप्तीचे वॉरंट
(भा.ना.सु.सं कलम
१६५(१) पहा)
........... (ठिकाण) येथील पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी,
यांस ,
ज्याअर्थी, मला असे दाखवून
देण्यात आले आहे की, माझ्या अधिकारितेच्या मर्यादांच्या आत स्थित असलेल्या ........ (तंट्याचा विषय संक्षिप्तपणे नमद करावा) संबंधी ........ (संबंधित पक्षकारांची नावे, राहण्याचे ठिकाण, किंवा तंटा गावकर्यांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये असेल तर,फक्त राहण्याचे
ठिकाण लिहावे) यांच्यामध्ये, जेणेकरुन शांतता
भंग होण्याची शक्यता आहे असा तंटा अस्तित्वात होता आणि, उक्त पक्षकारांना .......... (तंट्याची विषयवस्तु) याचा प्रत्यक्ष
कब्जा कोणाकडे होता या तथ्यासंबंधी आपापले दावे लेखी मांडाण्यास सांगितले होते, आणि ज्याअर्थी, उक्त
दाव्यासंबंधी रीतसर चौकशी केली असता, माझा असा निर्णय झाला आहे की, उक्त पक्षकारांपैकी कोणाकडेही ......... (उक्त तंट्याची विषयवस्तु) याचा कब्जा नव्हता (किंवा पूर्वोक्तप्रमाणे कब्जा कोणत्या पक्षकाराकडे होता
याबद्दल मी स्वत:ची खात्री करून घेऊ शकलो नाही)
म्हणून, ..................
(उक्त तंट्याची
विषयवस्तू) याचा कब्जा घेण्यास आणि स्वत: कडे ठेवून घेण्यास, आणि तो कब्जा
पक्षकाराचे हक्क किंवा कब्जासंबंधीचा दावा निर्णीत करणार्या सक्षम न्यायालयाचा
हुकूमनामा किंवा आदेश प्राप्त होईपर्यंत ते जप्तीखाली ठेवण्यास, या वॉरंटाव्दारे
तुम्हास प्राधिकृत करीत आहे आणि फर्मावित आहे.
सदर वॉरंटाची अंमलबजावणी कशा रीतीने केली ते प्रमाणित करणार्या शेर्यासह सदर
वॉरंट परत करण्यात यावे.
आज दिनांक ......... माहे............ २०......... रोजी हा आदेश माझ्या सही
शिक्क्यासह देण्यात आला आहे.
(मोहोर)
दिनांक:
(नाव, पदनाम व दिनांकीत सही)
--
u जमिनीवर किंवा जलाशयावर एखादी गोष्ट करण्यास मनाई
करणारा
आदेश
नमुना क्र. २७
मनाई आदेश
(भा.ना.सु.सं कलम
१६६(३) पहा)
माझ्या स्थानिक अधिकारितेत स्थित असलेली/ला ............................. (तंट्याची विषयवस्तू संक्षिप्तपणे नमूद करावी) याच्या वापरासंबंधी तंटा उद्भवला असून त्या जमिनीच्या
(किंवा जलाशयाच्या) वापरावर ....................... (व्यक्तीचे किंवा व्यक्तींचे वर्णन करावे) याने/यांनी सर्वस्वी आपला हक्क सांगितला आहे, आणि त्याबाबत रीतसर चौकशी केल्यानंतर मला असे दिसू येते की, सदर जमिनीचा
(किंवा जलाशयाचा) वापरहक्क जनतेला (किंवा व्यक्ती
किंवा व्यक्तिवर्ग असेल तर, त्याचे किंवा त्यांचे वर्णन करावे) खूला झालेला आहे आणि उक्त चौकशी सुरु केल्यापासून तीन
महिन्यांत (किंवा जर वापरहक्क फक्त विशिष्ट मोसमातच उपभोगता
येण्यासारखा असेल तर, "तो उपभोगणे शक्य असेल त्या मोसमापैकी फक्त शेवटच्या मोसमात'' असे म्हणावे) सदर वापरहक्क उपभोगण्यात आलेला आहे.
सबब, मी, ............... (नाव व पदनाम) आदेश देत आहे की, उक्त
(कब्जाचा/चे मागणीदार) किंवा त्याचा कोणीही हितसंबंधी याला (किंवा यांना) सर्वस्वी
कब्जा मिळण्यास हक्कदार म्हणून न्यायनिर्णीत करणारा समक्ष न्यायालयाचा हुकूमनामा
किंवा आदेश मिळेपर्यंत, त्याने/त्यांनी, इतरांना उक्त जमिनीच्या (किंवा जलाशयाच्या) वापराचा हक्क
उपभोगण्यापासून वंचित ठेवून कब्जा घेऊ नये (किंवा ठेवून घेऊ नये).
आज दिनांक ......... माहे............ २०......... रोजी हा आदेश माझ्या सही
शिक्क्यासह देण्यात आला आहे.
(मोहोर)
दिनांक:
(नाव, पदनाम व दिनांकीत सही)
b|b
¨ भारतीय
नागरिक सुरक्षा संहिता २०२३, कलम १६४: जमीन किंवा पाणी यासंबंधीच्या तंट्यामुळे शांतता
भंग होण्याची संभावना असेल तेव्हाची प्रक्रिया-
(१) जमीन किंवा पाणी
यासंबंधीच्या तंट्यामुळे शांतता भंग होण्याची संभावना असल्याची खबर मिळाल्यावर असा
तंटा करणार्या दोन्ही पक्षास नोटीस काढून बोलावण्याचा आणि त्यांचे म्हणणे ऐकुन घेण्याचा
अधिकार कार्यकारी दंडाधिकारी यांना आहे.
(२) 'जमीन किंवा
पाणी' या संज्ञेत इमारती, बाजार, मत्स्य क्षेत्रे, पिके किंवा जमिनीतील अन्य
उत्पादने किंवा फायदा यांचा समावेश होतो.
(३) दंडाधिकार्याच्या
आदेशाची एक प्रत संबंधित व्यक्तीवर बजावली जाईल आणि एक प्रत तंट्याच्या विषयस्थळी
किंवा त्याच्या जवळपास ठळक ठिकाणी लावून प्रकाशित केली जाईल.
(४) दोन्ही
पक्ष हजर झाल्यावर त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यांनी सादर केलेला
पुरावा घेतला जाईल. तसेच वादवस्तूचा कब्जा कोणाचा आहे याचा निर्णय घेतला जाईल.
योग्य ती चौकशी करून तालुका दंडाधिकारी त्या वस्तूवर ज्याचा कायदेशीर अधिकार आहे त्याच्या
ताब्यात ती वस्तू देईल जर कोणी अनाधिकाराने आडकाठी करीत असेल तर त्याला निषेध आज्ञा
देईल.
(५)
या बाबत भा.ना.सु.सं. २०२३, कलम १२६ अन्वये कारवाई करणे योग्य असल्याचे
दंडाधिकार्याचे मत झाल्यास तो तशी कारवाई करू शकेल.
bb
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला जमीन- पाणी वाद-भा.ना.सु.सं. कलम १६४. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !