* त्वचेच्या विकाराची प्रमुख कारणे- विरुद्ध अन्नाचे सेवन,
तेलकट व पचण्यास जड पदार्थ अति प्रमाणात खाणे, नैसर्गिक आवेग रोखणे (मल, मूत्र, भूक, झोप इ.) ही आहेत.
* मूठभर कडुलिंबाचा पाला, चार कप पाण्यात, एक कप पाणी शिल्लक राहील इतका उकळावा, हा काढा बाधीत
जागेवर लावावा.
* उन्हामुळे त्वचा काळसर झाली असेल तर त्यावर कोरफडीचा गर लावावा.
* केळी, लिंबाबरोबर कुस्करून तो लगदा लावावा.
* मेंदी व कडुलिंबाची पाने वाटून तो लगदा बाधीत ठिकाणी लावावा.
* शंभर ग्रॅम मोहरी तेल (Musturd Oil), दहा ग्रॅम कापरात कालवून रोज रात्री बाधीत ठिकाणी
लावावे.
* ताजा पुदिना वाटुन बाधीत भागास लावावा.
* गुळवेल, आवळा व कडुनिबांचे चूर्ण समप्रमाणात एकत्र करून
रोज दोनदा गरम पाण्यातुन घ्यावे.
* काळीमिरी चूर्ण, मोहरीच्या तेलात कालवुन, बाधीत ठिकाणी लावावे.
* कच्चा बटाटा बारीक वाटून त्यात लिंबाचा रस टाकून तो बाधीत जागी लावावा.
* कारल्याची पानांचा पाव कप रस, कडुलिंबाच्या पानांचा
अर्धा कप रस, दोन मोठे चमचे नारळाचे तेलात वाटून हे मिश्रण बाधीत
जागी लावावे.
* कडुलिंबाची पाने, हळद, धने,
शिरस, शेवग्याच्या बिया, दारूहळद यांची चूर्णे समप्रमाणात घेऊन ताकात कालवून लावावीत.
* खरूज झाली असेल तर चंदनाचे तेल लिंबाच्या रसाबरोबर बाधीत जागी लावावे.
* व्रणात कृमी झाल्यास, सीताफळाच्या बियांचा लगदा लावावा.
* कांद्याचा रस तिळाच्या तेलात फेटून चर्मविकारावर लावावा.
* काळे फुटाणे पाण्याबरोबर कुटून मधाबरोबर चर्मविकारावर लावावे.
* कारल्याचा रस व लिंबाचा रस सम प्रमाणात पिण्याने त्वचारोग बरा होतो.
* थंडीत जेव्हा त्वचा रूक्ष होते तेव्हा पिकलेले केळे व मध याची पेस्टकरून त्वचेवर
लावावी.
* रोज पन्नास मि.ली. कारल्याचा रस पंधरा दिवस प्यावा.
* चेहर्याची त्वचा रूक्ष झाली असेल तर पिकलेले केळे व मध याची पेस्ट करून चेहर्यावर
लावावी. अर्धातास ठेवावी. हे एक चांगले
Moisturiser आहे.
* संत्र्याच्या फोडींचा मिक्सरमध्ये लगदा करून त्वचेवर लावणे.
* कडीपत्त्याच्या सात-आठ पानांची पेस्ट करून रोज एक ग्लास
पातळ ताकात घालून प्यावी.
* आहारात कलौंजीचा (Nigella) वापर करावा.
* त्वचेवरील पुरळ (Rashes)
घालवण्यासाठी बीट (Beet root) आणून
त्याची साले काढून तो पाण्यात उकळून घ्यावा. हे पाणी त्वचेवर
लावावे.
* उन्हात त्वचा रापली असता अशा त्वचेवर काकडी व टोमॅटोचा रस लावावा.
* सीताफळ मिळत असेल तेव्हा त्याचा आहारात भरपूर वापर करावा. यात जीवनसत्त्व ‘अ’,‘क’,
असल्याने त्वचा निरोगी राहून तिचे आरोग्य राखले जाते.
* अंगावर आलेला चट्टा (दाद) चिंचोका
लिंबाच्या रसात
उगाळून लेप केल्याने बरा होतो.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला उपाय: त्वचेचे विविध विकार. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !