* चक्कर/मेंदूची अशक्तता/ डोळ्यासमोर अंधारी येणे
* पाण्याबरोबर
सुपारीएवढा गुळाचा खडा खाल्यास अशक्तपणा त्वरीत कमी होतो.
* अर्धा लिटर
पाण्यात सव्वाशे ग्रॅम धने पावडर, पाणी अर्धे होइपर्यंत उकळावे. नंतर गाळुन त्यात सव्वाशे ग्रॅम पिठी साखर टाकुन पुन्हा उकळावे. घट्ट झाल्यावर रोज आठ ग्रॅम चाटण घ्यावे.
* आवळारसात
खडीसाखर मिसळुन सेवन केल्यास भोवळ, अंधेरी यावर त्वरीत फायदा
होतो.
* पेरू बुध्दिवर्धक
असल्याने पेरू मिळत असेल तेव्हा रोज एक पेरू खाण्यास हरकत नाही.
* संत्र्याचा
रसाच्या सेवनाने अशक्तपणात आराम मिळतो.
* अपघातामुळे व्यक्ती
बेशुध्द पडल्यास डॉ.बाख यांच्या पुष्पौषधीमधील
‘रेस्क्यू रेमेडी’ हे पाच पुष्पौषधींचे मिश्रण असणारे होमिओपॅथीच्या दुकानात
उपलब्ध असणार्या औषधाचे पाच थेंब द्रव अर्धा ग्लास पाण्यात टाकुन ते पाणी ओठ,
कानामागील त्वचा व मनगटावर लावावे.
* एक चमचा
ब्राम्ही रस/चूर्ण, अर्धा चमचा शंखपुष्पी
चूर्ण मधातुन नियमीतपणे, एक वेळा घेणे.
* काळ्या
द्राक्षाचा, पन्नास मि.ली. रस दररोज दोनदा घेणे.
* अर्धा चमचा
अशवगंधा चूर्ण, मध/दुधातुन दररोज एकदा घेणे.
* मेंदूचे विकार
* रात्री
झोपताना गाईचे शुद्ध तूप, कोमट करून दोन्ही नाकपुडींत दोन थेंब
नियमित घालावे. गाईचे तूप जितके जुने असेल तितके चांगले.
* रोज सकाळ
सायंकाळ, मंदिरातील मोठ्या घंटेच्या बरोबर खाली उभे राहून
ती घंटा किमान पाच मिनिटे सतत जोरात वाजवावी. मंदिरातील घंटा
वाजवताना ती बरोबर डोक्यावर येत असल्याने त्यातून उत्पन्न होणार्या कंपन लहरींमुळे
मस्तिष्क विकार नाहीसे होतात, मेंदूतील अवरोध निघून जातो.
हा प्रयोग किमान एक महिना तरी नियमीत करावा.
* कलींगड
अर्धा कापुन त्यातील लाल गर काढुन खावा व साल हेल्मेट प्रमाणे पंधरा मिनिटे डोक्यावर ठेवावी.
* आहारात
ब्रोकोली या भाजीचा वापर करावा.
* अति मानसिक ताण
(Hyper tension)
* यावर तात्पुरता
उपाय म्हणून अर्धे कलिंगड खाणे.
* मानसिक
ताणामुळे डोके दुखत असल्यास विड्याचे पान तेल लावून थोडे तव्यावर गरम करून
कपाळावर बांधून ठेवावे.
* डॉ.बाख यांच्या पुष्पौषधीमधील
‘रेस्क्यू रेमेडी’ हे पाच पुष्पौषधींचे मिश्रण असणारे होमिओपॅथीच्या दुकानात
उपलब्ध असणार्या औषधाचे पाच थेंब द्रव अर्धा ग्लास पाण्यात टाकुन ते पाणी प्यावे
किंवा आराम वाटेपर्यत दर तासाला चार गोळ्या खाव्यात.
* मानसिक ताणामुळे
झोप न येणे
* चिक्कूच्या
बिया मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर तयार करून रात्री झोपताना गरम पाण्याबरोबर
पाव चमचा पावडर घ्यावी. चिक्कू खाल्ल्यानंतर दोन दिवसात ही पावडर
तयार करावी.
* भृंगराज/
केशराज/मार्कव (Hassk) नावाच्या झाडाच्या पानांचा चार ग्रॅम
रस, तीन ग्रॅम साखरे बरोबर दररोज दोन वेळा घेतल्यास मानसिक विकार
दूर होतात, चक्कर येत असल्यास ती बंद होते, अशक्तपणा दूर होतो.
* ब्राम्ही/मंडुकपर्णी (Indian
penny wort) नावाच्या झाडाच्या पानांचे तीन ग्रॅम चूर्ण अर्धा लीटर निरशा दुधात घेतल्याने मानसिक
ताण दूर होऊन चांगली झोप येते.
* औदासीन्य (Depression)
* मानसिक
त्रास (Depression) असलेल्या व्यक्तीने रोज सकाळ सायंकाळ, मंदिरातील मोठ्या घंटेच्या बरोबर
खाली उभे राहून ती घंटा किमान पाच मिनिटे सतत जोरात वाजवावी. मंदिरातील घंटा वाजवताना ती बरोबर डोक्यावर येत असल्याने त्यातून उत्पन्न
होणार्या कंपन लहरींमुळे मस्तिष्क विकार नाहीसे होतात, मेंदूतील
अवरोध निघून जातो. हा प्रयोग किमान पंचेचाळीस दिवस नियमीत करावा.
* मानसिक
त्रास (Depression) असलेल्या व्यक्तीने रोज एक कप सफरचंदाचा रस प्यावा.
* मुलेठी,
आवळा, अश्वगंधा व ब्राम्ही चूर्ण समप्रमाणात घेऊन,
एक चमचा, रोज दोनदा मधातून घेणे.
* कोहळ्याच्या
बियांचे (पेठा बनवताना वापरण्यात येणारे फळ) चूर्ण/पेस्ट करून एक चमचा, दररोज
दोनवेळा गरम पाण्याबरोबर घ्यावे.
* जेवण सात्विक ठेवावे.
* शिरोधारा,
प्राणायाम यांचा प्रयोग करावा.
* व्यायाम
प्रकार - जीभ शक्य तितकी बाहेर काढून मोठ्याने हसावे.
* बौद्धिक दुर्बलता
* पहिल्या
दिवशी एक बदाम रात्री एक कप पाण्यात भिजत ठेवावा, सकाळी तो चावून
खाणे व त्यावर एक कप कोमट, साखर टाकलेले दूध पिणे. दुसर्या दिवशी दोन बदाम, तिसर्या दिवशी तीन बदाम याप्रमाणे
दहा दिवस दहा बदाम पर्यंत करणे. अकराव्या दिवशी नऊ बदाम,
बाराव्या दिवशी आठ बदाम, असे कमी करत आणणे.
हा प्रयोग 20 दिवसांचा आहे.
* मानसिक किंवा शारीरिक
धक्का बसणे
* मानसिक किंवा शारीरिक
धक्का बसणे, धोकादायक परिस्थितीतून जाणे, जगण्याची आशा सोडणे, बेशुध्दी, अपघात अगर मानसिक
किंवा शारीरिक धक्क्यामुळे कोमात जाणे, असहनीय वेदना होणे, अति राग, उन्माद,
आत्महत्येस प्रवृत्त होणे, अत्याधिक मानसिक ताण, निराधार वाटणे अशा परिस्थितींशी
सामना करण्याचा प्रसंग आल्यास डॉ.बाख यांच्या पुष्पौषधीमधील ‘रेस्क्यू
रेमेडी’ हे पाच पुष्पौषधींचे मिश्रण असणारे औषध उपयुक्त आहे. हे औषध होमिओपॅथीच्या
दुकानात गोळ्या किंवा द्रव स्वरूपात उपलब्ध आहे. तातडीच्या वेळेस पाच थेंब
द्रव अर्धा ग्लास पाण्यातून द्यावे, इतर वेळी चार गोळ्या दर दोन तासांनी आराम वाटेपर्यंत द्याव्यात.
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मस्तिष्क विकार :. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !