उत्तर: होय. दिल्ली, मद्रास, केरळ, गुजरात, महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयांनी वाळू चोरीबाबत दिलेल्या निर्णयांचा एकत्रित विचार करून, जयसुख बवानजी सिंगलिया वि. गुजरात राज्य या प्रकरणात दिनांक 04/09/2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने खालील निर्णय दिला आहे.
- फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 41 नुसार कोणताही दखलपात्र गुन्हा घडत असतांना आरोपीला अटक करण्याचे अधिकार पोलीसांना आहेत. मग तो गुन्हा कोणत्याही कायद्यातील तरतुदीनुसार घडलेला असो.
- वाळू ही शासनाच्या मालकीची आहे. त्यामुळे दखल पात्र गुन्ह्याची खबर आली तर पोलीसांना कारवाई करणे भाग आहे.
- गुन्हा जर गौण खनिज कायद्यातील तरतुदीन्वये दाखल करायचा असेल तर सक्षम अधिकार्याने गुन्हा दाखल करणे भाग आहे.
पोलिसांना भारतीय दंड विधान, कलम 379 प्रमाणे वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यास प्रतिबंध नाही. तथापि, गौण खनिज कायद्यातील कलमे पोलिसांना लावता येणार नाहीत. त्यासाठी सक्षम अधिकार्याने गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला वाळू चोरीबाबत पोलीस स्वत: गुन्हा दाखल करू शकतात काय ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !