उत्तर: महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ६५ अन्वये सलग दोन वर्षे लागवडीखाली न आणलेल्या जमिनीचे व्यवस्थापन शासन स्वत:कडे घेऊ शकेल अशी तरतुद आहे.
तथापि, असे झाले नसल्याने आणि त्या जमिनीवर खातेदाराची मालकी अद्याप असल्याने, त्या जमिनीवर पिके घेण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही.
खातेदाराने नवीन हंगामात हवे ते पीक घ्यावे. तलाठी ज्यावेळेस पीक-पाहणीसाठी येतील तेव्हा सदर पिकाची नोंद गाव दप्तरात घेण्याची विनंती त्यांना करावी.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला एका खातेदाराच्या नावे असणारी जमीन सन २०१२ पासून 'पड' आहे. अशी अनेक वर्षे 'पड' असलेली जमीन शासन जप्त करू शकते काय ? . याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !