मृत्युपत्र
भारतात
मृत्युपत्र कसे असावे किंवा मृत्युपत्राने वारसा कसा प्राप्त होतो यासंबंधी भारतीय
वारसा कायदा,
१९२५ मध्ये चर्चा केलेली आहे.
मृत्युपत्र
साध्या कागदावरही करता येते. ते नोंदणीकृतच असावे असे कोणतेही बंधन कायद्यात नाही.
नोंदणी
अधिनियम १९०८, कलम १८ अन्वये मृत्युपत्राची नोंदणी वैकल्पिक आहे. मृत्युपत्र
करणारा हयात असेल तर त्याला कधीही मृत्युपत्र नोंदवून घेता येते.
· भारतीय वारसा
कायदा १९२५, भाग ६ मध्ये कलम ५७ पासून मृत्युपत्राबाबत तरतुदी दिलेल्या आहेत.
· भारतीय वारसा
कायदा,
१९२५, कलम- २ (एच) अन्वये
मृत्युपत्राची व्याख्या दिली आहे.
· भारतीय वारसा
कायदा,
१९२५, कलम ५७ म्हणजे हिंदू विल्स एक्ट, १८७० च्या कलम २ ची
पुनरावृत्ती आहे.
.
· भारतीय वारसा
कायदा,
१९२५ भारतातील सर्व धर्मियांना
म्हणजे हिंदु,
ख्रिश्चन, पारशी, अँग्लो
इंडियन्स इ. यांना लागू होतो. हिंदू या
संज्ञेमध्ये बौद्ध, शिख, जैन, ब्राम्होसमाजी, आर्यसमाजी, नंबुद्री,
लिंगायत यांचाही समावेश होतो व या सर्वांना हा कायदा अंशत: लागू पडतो.
मुस्लिम
धर्मिय लोकांना हा कायदा पूर्णपणे लागू पडत नसला तरी प्रोबेट, लेटर्स ऑफ एडमिनिस्ट्रेशन इ. साठी लागू आहे. जेथे व्यक्तीगत
कायद्यानुसार वारसासंबंधी प्रश्न निर्माण होत नाहीत तेथे मृत्युपत्रासाठी भारतीय वारसा
कायदा १९२५ च्या तरतुदी लागू होतात.
‘‘मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने, त्याच्या मृत्युनंतर
त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीरपध्दतीने घोषित केलेली इच्छा होय.’’
(१) संयुक्त मृत्युपत्र (Joint Will): जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती, एकाच लेखाने,
त्यांच्या मृत्युनंतर, त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावावी याबाबत लेख
करतात त्याला संयुक्त मृत्युपत्र म्हणतात. अशा
व्यक्तींपैकी ज्याचा मृत्यू होईल, त्या व्यक्तीच्या संपत्त्तीबद्दल मृत्युपत्रातील
भाग प्रभावित होईल.
(५) जमा केलेले मृत्युपत्र (Deposited
Will): नोंदणी कायदा, १९०८, कलम ४२ अन्वये
मृत्युपत्र, पाकीटात बंद/सील करुन दुय्यम निबंधकाकडे
जमा करता येते. याला जमा केलेले मृत्युपत्र म्हणतात.
¿ मृत्युपत्र करण्यास सक्षम व्यक्ती: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ५९ अन्वये:
* मृत्युपत्र करणारी व्यक्ती वयाने सज्ञान असावी तसेच तिचे मानसिकदृष्ट्या
सुदृढ असावी.
* मुक किंवा बधीर किंवा अंध व्यक्ती, जर त्यांना परिणामांची
जाणीव असेल तर, मृत्युपत्र करु शकतात.
* मृत्युपत्र स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील
फक्त स्वत:च्या हिश्शाबाबत करता येते.
* हिंदू वारसा कायदा, १९५६, कलम ३० अन्वये हिंदू व्यक्तीला एकत्र
कुटुंबाच्या मिळकतीमधील स्वत:च्या हिश्शाबाबत मृत्युपत्र
करता येते.
* वेडसर व्यक्ती, जेव्हा वेडाच्या भरात नसेल तेव्हा मृत्युपत्र करु
शकते. परंतु वेडाच्या भरात, नशेत, आजारात,
शुद्धीवर नसताना, फसवणुकीने, दबावाखाली करण्यात आलेले मृत्युपत्र विधीग्राह्य असणार नाही.
¿ मृत्युपत्र रद्द करणे/त्यात बदल करणे: भारतीय वारसा
कायदा,
१९२५, कलम- ६२ अन्वये:
मृत्युपत्र
करणारी व्यक्ती, त्याने केलेले मृत्युपत्र रद्द करु शकते किंवा त्यात कितीही
वेळा बदल किंवा दुरुस्ती करू शकते.
¿ मृत्युपत्र कसे असावे: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- ६३ अन्वये:
* मृत्युपत्रावर, मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने, मृत्युपत्र त्याने स्वत:
केले आहे हे दर्शविण्याची निशाणी म्हणून त्यावर किमान दोन किंवा अधिक
साक्षीदारांसमक्ष स्वाक्षरी
किंवा अंगठा किंवा इतर निशाणी केलेली असावी. मृत्युपत्र करणारी व्यक्ती जर स्वाक्षरी
करण्यास असमर्थ असेल तर, इतर कोणतीही व्यक्ती, मृत्युपत्र करणार्या व्यक्तीच्या
निर्देशानुसार, मृत्युपत्र करणार्या व्यक्तीच्या समक्ष मृत्युपत्रावर स्वाक्षरी
करु शकते.
* किमान दोन किंवा अधिक साक्षीदारांनी, त्यांची नावे, वय, पत्ता व स्वाक्षरीसह,
असे मृत्युपत्र साक्षांकीत केलेले असावे.
*
मृत्युपत्रात उल्लेख केलेल्या मिळकतीबाबत पुरेसे आणि निश्चित वर्णन मृत्युपत्रात
असावे.
* मृत्युपत्रात उल्लेखित मिळकत मृत्युपत्र करणार्याकडे कशी आली आणि मृत्युनंतर
त्या मिळकतीची विल्हेवाट कोणी व कशी लावावी याबाबत स्पष्ट उल्लेख असावा.
* मृत्युपत्रात शेवटी, मृत्युपत्र स्वतंत्रपणे, शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ
असतांना आणि विचारपूर्वक केलेले असल्याचा उल्लेख असावा.
* मृत्युपत्रात शेवटी किंवा स्वतंत्रपणे, मृत्युपत्र करणारी व्यक्ती, मृत्युपत्र
करण्यास, शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ असल्याबाबत डॉक्टरचे प्रमाणपत्र असावे.
असे प्रमाणपत्र मृत्युपत्राचाच
भाग असावा. तथापि, डॉक्टरच्या
प्रमाणपत्राचा उल्लेख मूळ कायद्यात नाही. परंतु असे प्रमाणपत्र असल्यास
पुढे
कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत.
* हिंदू व्यक्ती स्वसंपादित संपत्तीबाबत तसेच वंशपरंपरेने मिळालेल्या संपत्तीतील
फक्त स्वत:चा हिस्सा, अशा एकूण मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी
यासाठी मृत्युपत्र करू शकते.
* मुस्लिम धर्मीयाने मुस्लीम कायद्यानुसार आपले मृत्युपत्र केले असेल तरच ते
परिणामक्षम मृत्युपत्र ठरते.
* कोणतेही मृत्युपत्र हे मृत्युपत्र करणार्या व्यक्तीच्या मृत्युनंतरच अंमलात
येऊ शकते.
* मृत्युपूर्वी मृत्युपत्रात बदल करणे, ते रद्द करणे,
नष्ट करणे, नवीन मृत्युपत्र करणे इत्यादी करण्याचे
अधिकार, मृत्युपत्र करणार्या व्यक्तीला असतात.
* आधीचे मृत्युपत्र रद्द करुन नवीन मृत्युपत्र
करतांना, "आधीचे, दिनांक ...रोजी केलेले मृत्युपत्र रद्द समजावे" असा
उल्लेख नवीन मृत्युपत्रात असणे अपेक्षीत आहे.
* एकाच व्यक्तीने, एकापेक्षा जास्त मृत्युपत्र केले असतील तर त्याने
सर्वात शेवटच्या दिनांकास केलेले मृत्युपत्र ग्राह्य मानले जाते.
* एखाद्या सज्ञान सैनिकाने प्रत्यक्ष
युद्धाच्या वेळेस किंवा विशेष मोहीमेवर असतांना, किंवा एखाद्या सज्ञान
दर्यावर्दीने जहाजावर असतांना किंवा एखाद्या सज्ञान वैमानिकाने, विमानात असतांना
केलेल्या मृत्युपत्राला विशेष मृत्युपत्र म्हणतात.
* भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ६६
अन्वये असे विशेष मृत्युपत्र लेखी अथवा तोंडी असू शकते.
* जर असे मृत्युपत्र वर नमूद व्यक्तींनी स्वहस्ताक्षरात
लिहिलेले असेल तर त्यावर त्याची स्वाक्षरी असण्याची आणि ते साक्षीदारांमार्फत
साक्षांकीत असण्याची आवश्यकता नाही.
* जर
अशा मृत्युपत्राचा काही भाग वर नमूद व्यक्तींच्या स्वहस्ताक्षरात असेल आणि
काही भाग इतर व्यक्तीने लिहिले असेल आणि त्याखाली असे मृत्यूपत्र करणार्या व्यक्तीची
स्वाक्षरी असेल तर ते साक्षीदारांमार्फत साक्षांकीत असण्याची आवश्यकता नाही.
* विशेष मृत्युपत्र जर इतर व्यक्तीने लिहिले असेल
आणि त्याखाली असे मृत्युपत्र करणार्या व्यक्तीची स्वाक्षरी नसेल आणि असे
विशेष मृत्युपत्र, वर नमूद व्यक्तींच्या निर्देशानूसार लिहिले गेले असे सिध्द
करण्यात आले तर असे विशेष मृत्युपत्र विधीग्राह्य मृत्युपत्र समजण्यात येते.
¿ साक्षीदार वारस: भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम ६८ अन्वये:
कोणत्याही
मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणार्या व्यक्तीला, त्या मृत्युपत्रात नमूद संपत्तीत वाटा मिळत असल्यास
किंवा अशा साक्षीदार व्यक्तीला, मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने मृत्यूपत्राचा व्यवस्थापक (Executor)
म्हणून नेमलेले असले तरी तिच्या साक्षीदार असण्यावर परिणाम होणार
नाही.
कोडिसिल
म्हणजे एक असा दस्त ज्याद्वारे मृत्युपत्रातील मजकुरासंबंधात स्पष्टीकरण दिलेले
आहे किंवा बदल केलेला आहे किंवा अधिक माहिती जोडलेली (add) आहे. कोडिसिलचा दस्त मृत्युपत्राचा एक भाग मानला जातो.
मृत्युपत्रातील
नाव, क्रमांक इत्यादींबाबतचा लेखन प्रमाद, त्याचा नेमका अर्थ लक्षात येत असेल तर
दुर्लक्षित करण्यात यावा.
जर
एखाद्या मृत्युपत्रात नमूद दोन कलमात नमूद इच्छा दाने विसंगत असतील आणि त्या
दोन्ही इच्छा एकत्रपणे पूर्ण करणे शक्य नसेल तर शेवटी नमूद इच्छा विधिग्राह्य
ठरेल.
उदाहरण १. एका
मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने, त्याच्या मृत्युपत्रातील पहिल्या कलमामध्ये,
त्याची 'क्ष' ठिकाणी असणारी मालमत्ता 'अ' ला द्यावी असे नमूद केले आणि त्याच
मृत्युपत्रात, दुसर्या कलमामध्ये, त्याची 'क्ष' ठिकाणी असणारी मालमत्ता 'ब' ला
द्यावी असे नमूद केले.
एकच
मालमत्ता एकत्रपणे दोघांना देणे शक्य नसल्याने ही दोन्ही कलमे विसंगत ठरतात व
शेवटचे कलम विधिग्राह्य ठरुन अशी मालमत्ता 'ब' ला मिळेल.
उदाहरण २. एका
मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने, त्याच्या मृत्युपत्रातील पहिल्या कलमामध्ये,
त्याची 'क्ष' ठिकाणी असणारे घर 'अ' ला द्यावे असे नमूद केले आणि त्याच मृत्युपत्रात,
शेवटच्या कलमामध्ये असे नमूद केले की, त्याचे
'क्ष' ठिकाणी असणारे घर विकून टाकावे आणि येणार्या रक्कमेचा विनियोग 'ब' साठी करण्यात
यावा.
एकच
घर 'अ' ला देणे आणि तेच घर विकून येणार्या रक्कमेचा विनियोग 'ब' साठी करणे या
दोन्ही गोष्टी एकत्र करणे शक्य नसल्याने ही दोन्ही कलमे विसंगत ठरतात व
शेवटचे कलम विधिग्राह्य ठरुन घर विकून येणार्या रक्कमेचा विनियोग 'ब' साठी करणे
विधिग्राह्य ठरेल.
¿ गर्भस्थ शिशू: हिंदू डिस्पोझिशन्स ऑफ प्रॉपर्टी एक्ट, १९१६ च्या तरतुदी अस्तित्वात असल्याने गर्भस्थ शिशूच्या नावे मृत्युपत्र करता येते.
¿ मृत्युपत्राची
शाबिती (Probate of
Will):
प्रोबेट म्हणजे अशी कायदेशीर प्रक्रिया ज्यात भारतीय उत्तराधिकार
अधिनियम, १९२५ कलम ५७, २१३ अन्वये,
फक्त मुंबई उच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र असलेल्या मुंबई, कलकत्ता, चेन्नई याठिकाणचीच दिवाणी न्यायालये मृत्युपत्राची सत्यता (authenticity) प्रमाणित करतात. फक्त याच न्यायालयांना प्रोबेटचा अधिकार आहे.
याबाबतचा
निर्णय भगवानजी करसनभाई राठोड वि. सुरजमल आनंदराज मेहता या प्रकरणात दिनांक ८ जुलै
२००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. इतर दिवाणी न्यायालये मृत्युपत्रातील
वाटप योग्य की अयोग्य याबाबत निर्णय देऊ शकतात.
* मृत्युपत्रासाठी कोणताही निश्चित असा नमुना कोणत्याही कायद्यात सांगितलेला
नाही. (वेंकटरामा अय्यर वि. सुंदरमबाळ, ए.आर.आर- १९४० मुंबई- ४०२)
* मृत्युपत्र करणार्याने त्याच्या मालमत्तेची विल्हेवाट त्याच्या मृत्युनंतर
कशी लावावी हे स्पष्ट केल्याशिवाय ते मृत्युपत्र पूर्णपणे कायदेशीर होत नाही.
(अहमद बिन सलाह वि. मोहमद बादशहा, ए.आय.आर. १९७२ एस. सी.)
* १८ वर्षाखालील व्यक्तीने केलेले मृत्युपत्र अंमलात येऊ शकणार नाही.
तसेच जर ती व्यक्ती अज्ञान असतानाच मृत झाली तरी असे मृत्युपत्र
विधिग्राह्य व प्रभावशाली ठरणार नाही. (के. विजयरत्नम वि. सुदरसनराव ए. आय.आर. १९२०, मद्रास-२३७)
* मृत्युपत्र खरे नाही, ते खोटे आहे हे सिद्ध करण्याची
जबाबदारी जो तसा अरोप करतो त्याच्याकडे आहे. (चंद्रकांत मेढी वि. लखेश्वरनाथ ए.आय.आर- १९७६ गोहत्ती पान
-९८)
* मृत्युपत्र हा एक पवित्र दस्त मानला गेला आहे. अशा दस्ताद्वारे
मृत व्यक्ती आपल्या संपत्तीच्या विल्हेवाटीबाबतची इच्छा व्यक्त करीत असते. म्हणून मृत्युपत्राचे एक गंभीर व पवित्र दस्त म्हणून पालन केले गेले पाहिजे.
(रामगोपाल लाल वि. ऐपिनकुमार ४९.ए. आय. आर ४१३)
* मा. उच्च न्यायालयाने
जे
टी. सुरप्पा वि. सच्चिदानंदेंद्र सरस्वती स्वामीजी पब्लिक
चॅरिटेबल ट्रस्ट (आयएलआर-२००८- केआर-२११५) या दाव्यामध्ये
भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ अन्वये असलेले
मृत्युपत्र सिध्द करण्यासाठी मार्गदर्शन करतांना न्यायालयांसाठी मृत्युपत्र
तपासणीचे पाच टप्पे विहित केले आहेत.
१. मृत्युपत्र हे लिखित स्वरूपात
असावे, त्यावर मृत्युपत्र करणार्याची स्वाक्षरी असावी.
तसेच दोन
किंवा अधिक साक्षीदारांनी स्वत:च्या स्वाक्षरीने
मृत्युपत्र करणार्याची स्वाक्षरी साक्षांकीत केलेली असावी.
जरूर तर न्यायालय किमान एक साक्षीदाराची अशा साक्षांकनाबाबत तपासणी करू शकेल. हा पहिला टप्पा आहे. उपरोक्त कायदेशीर बाबींची
पुर्तता मृत्युपत्रात केली नसेल तर कायद्याच्या दृष्टिने ते मृत्युपत्रच नाही.
२. मृत्युपत्रामुळे जेव्हा कायदेशीर वारस विस्थापित होतात तेव्हा न्यायालयाने सर्वसाधारण तपासणी न करता मृत्युपत्राबाबत सखोल छाननी
करणे आवश्यक आहे. हा दुसरा टप्पा आहे.
३. मृत्युपत्र करणार्या व्यक्तीची मानसिक अवस्था/मनःस्थिती मृत्युपत्र करतेवेळी सुदृढ होती किंवा नाही याची तपासणी
करणे हा तिसरा टप्पा आहे.
४. चौथ्या टप्प्यात, मृत्युपत्र संदर्भात कोणतीही
संशयास्पद परिस्थिती अस्तित्वात आहे काय याची
तपासणी करावी.
५. पाचव्या
टप्प्यावर पायरीवर, मृत्युपत्र भारतीय
उत्तराधिकार कायदा,
कलम ६३ सह भारतीय
पुरावा कायदा, कलम ६८ अनुसार आहे किंवा
नाही याची खात्री करावी.
वरील टप्प्यांचा विचार करता मृत्युपत्र साक्षांकित
करणार्या साक्षीदारांची
तपासणी अनिवार्य (sine qua non) आहे हे लक्षात येते.
तथापि, फक्त साक्षीदारांनी
मृत्युपत्र साक्षांकित करणे पुरेसे नाही तर मृत्युपत्र
साक्षांकित करणार्या साक्षीदारांनी, मृत्युपत्र करणार्या व्यक्तीला मृत्युपत्रावर स्वाक्षरी करतांना पाहणेही
आवश्यक आहे. थोडक्यात मृत्युपत्र करणार्या व्यक्तीने, मृत्युपत्र
साक्षांकीत करणार्या साक्षीदारांच्या समक्ष मृत्युपत्रावर स्वाक्षरी करावी.
मृत्युपत्र किमान दोन साक्षीदारांमार्फत साक्षांकीत केलेले
असणे अनिवार्य आहे.
मृत्युपत्राची प्रमाणित प्रत प्राथमिक दस्तऐवज असल्याचे मानले जाऊ शकत नाही त्यामुळे मृत्युपत्राची प्रमाणित प्रत पुरावा म्हणून दाखल करून घेता येणार नाही. (The Will is not a public
document under Section 74 of the Act. It can be held that
certified copy of the Will is not admissible per se in
evidence. It cannot be presumed to be a primary document, which
could be adduced in evidence.)
मृत
व्यक्तीची असा इरादा त्याच्या इच्छेनुसार अत्यंत आदराने
आणि पवित्रतेने अंमलात आणला गेला पाहिजे.
भारतीय
वारसा कायदा, १९२५, कलम ५८ अन्वये हा कायदा मुस्लिम व्यक्तीच्या मृत्युपत्राबाबत
(वसियतनामा) लागू होत नाही. मुस्लिम
धर्मिय व्यक्तींसाठी मृत्युपत्राबाबतच्या तरतूदी त्यांच्या 'हेदाय' या
बाराव्या शतकातील अधिकृत ग्रंथात दिलेल्या आहेत. यासंबंधात दुसरा ग्रंथ 'फतवा
आलमगिरी' हा सतराव्या शतकात लिहिण्यात आला. 'शराय-उल-इस्लाम' हा ग्रंथ प्रामुख्याने
शिया पंथीय मुस्लिमांसाठी आहे.
¿ स्वाक्षरी:
मुस्लिम धर्मिय व्यक्तीने केलेल्या मृत्युपत्रावर स्वाक्षरी केली नसेल किंवा
त्यावर साक्षीदारांचे साक्षांकन नसले तरी ते मत्युपत्र वैध मानले जाते.
¿ सज्ञानता:
मुस्लिम कायद्यानुसार पुरूष व्यक्ती १५ वर्षे वयाचा झाल्यावर त्याला सज्ञान
समजले जाते. इंडियन मेजॉरिटी एक्ट, १८७५ अन्वये पुरूष व्यक्ती १८ वर्षे वयाचा
झाल्यावर त्याला सज्ञान समजतात परंतू जर अशी व्यक्ती अज्ञान असतांना न्यायालयाने
त्याच्याबाबत 'पालक' नेमला असेल तर अशी व्यक्ती २१ वर्षे वयाचा झाल्यावर त्याला
सज्ञान समजतात. इंडियन मेजॉरिटी एक्ट, १८७५ हा सर्वधर्मियांना लागू असल्याने
मुस्लिम पुरूष व्यक्ती १८ वर्षे वयाचा झाल्यावर सज्ञान समजली जाते. १५ वर्षे
वयाची सज्ञानता केवळ विवाह, तलाक. मेहेर यांसाठीच लागू आहे.
¿ गर्भस्थ शिशू: मुस्लिम धर्मानुसार त्याच व्यक्तीच्या नावे मृत्युपत्र करता येते जी मृत्युपत्र करणार्या व्यक्तीच्या मृत्युच्यावेळी जीवित असेल. तथापि, मृत्युपत्र करण्याच्यावेळी गर्भात असणार्या शिशूचा जन्म मृत्युपत्र करणार्या व्यक्तीच्या मृत्युनंतर सहा महिन्यात झाला तर त्याच्या नावे केलेले मृत्युपत्र ग्राह्य मानले जाते.
पवित्र
कुराणात,
सर्व रक्त संबंधी, लग्नामुळे झालेले संबंधी हे
जवळचे वारस (शेअरर) मानले जातात.
मुस्लिम कायद्यान्वये पवित्र कुराणात ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वारसांना
हिस्सा मिळतो.
मुस्लिम
सुन्नी हनफी कायद्यानुसार मुस्लिम व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला मयत व्यक्तीच्या
मालमत्तेतील १/८ ठराविक हिस्सा मिळतो. मयत मुस्लिम व्यक्तीस
दोन पत्नी असतील तर प्रत्येक पत्नीला १/१६ हिस्सा मिळतो. मयताला
मुले असतील तर मुलाला दोन हिस्से आणि मुलीला एक हिस्सा मिळतो.
¿ अपात्रता: मुस्लिम
कायद्यान्वये ज्या व्यक्तीने आत्महत्त्या करण्यासाठी विष प्राशन केले असेल किंवा स्वत:ला जखमी करुन घेतले असेल अशा व्यक्तीला वसियतनामा करण्याचा अधिकार नसतो.
उच्च न्यायालय, मुंबई येथील न्यायमुर्ती मा. श्री. अभय ओक आणि मा. श्री. सय्यद
ह्यांच्या खंडपीठाने एका निकालाच्या निमित्ताने नॉमिनेशन बद्दलच्या
वेगवेगळ्या कायद्याबाबद्दल सखोल विवेचन केले आहे.
नॉमिनी
हा केवळ एक ट्रस्टी असतो आणि नॉमिनेशन मुळे इतर वारसांचे कायदेशीर हक्क हिरावून घेतले
जाऊ शकत नाहीत,
नॉमिनेशन हा वारसाहक्काचा तिसरा कायदा होऊ शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन
केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी
विरुद्ध सोसायटी रजिस्ट्रार- पश्चिम
बंगाल ,
ह्या प्रकरणी निकाल
देतांना स्पष्ट केले आहे की, मूळ सभासद मयत झाल्यावर सोसायटीने फक्त
नॉमिनी व्यक्तीच्या नावे केलेल्या शेअर्स हस्तांतरणामुळे इतर वारसांचे जागेमधील मालकी हक्क
हिरावले जाऊ शकत नाहीत. सोसायटी रेकॉर्डप्रमाणे
संबंधित नॉमिनी व्यक्तीच्या नावे शेअर हस्तांतरित केले की सोसायटीची जबादारी संपुष्टात येते. त्यामुळे ज्या वारसांना
जागेवर हक्क सांगायचा आहे त्यांना सक्षम न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल. ह्या बाबतीत
सोसायटी काही निर्णय देऊ शकत नाही, कारण
वारस कोण हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीला नसून फक्त न्यायालयालाच
आहे.
F शब्दार्थ:
¿ Testator: अशी व्यक्ती ज्याने मृत्युपूर्वी मृत्युपत्र केले आहे.
¿ Intestate: अशी व्यक्ती ज्याने मृत्युपूर्वी मृत्युपत्र केलेले नाही.
¿ Legatee/Beneficiary: अशी व्यक्ती ज्याला मृत्युपत्रान्वये मालमत्ता मिळाली आहे.
¿ Executor: अशी व्यक्ती ज्याची नेमणूक मृत्युपत्र करणार्याने किंवा आदेशान्वये
न्यायालयाने, मयताच्या मालमत्तेचे मृत्युपत्रानुसार वाटप
करण्यासाठी केलेली आहे. अशी व्यक्ती मृत्युपत्र करणार्या मयत व्यक्तीची
कायदेशीर प्रतिनिधी म्ह्णून काम करते.
bb
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मृत्युपत्र. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !