पोकळीस्त नाव किंवा नोंद कमी करणे
पोकळीस्त नाव
किंवा नोंद कमी करणे
अनेकदा तहसिलदार कार्यालयात पोकळीस्त नोंद किंवा पोकळीस्त नाव कमी करण्यासाठी अर्ज/ प्रकरणे दाखल केली जातात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम किंवा तत्सम कायद्यांमध्ये "पोकळीस्त नाव कमी करणे" या नावाने कुठलेही कलम किंवा अशा प्रकारचा उल्लेख आढळून येत नाही.
'पोकळीस्त'
हा बोली भाषेचा शब्द असून त्याचा अर्थ पोकळ (Hollow) किंवा अर्थहीन
असा होतो. कायद्याच्या भाषेत त्याला "ज्या नोंदीला किंवा नावाला आज रोजी कायदेशीररित्या
महत्व नाही किंवा नजर चुकीने तशीच राहून गेलेली नोंद किंवा नाव" असे म्हणता
येईल.
P इतर
हक्कातील व्यक्ती किंवा वारसदार यांची नावे कब्जेदार सदरी दाखल झालीत परंतु त्यांचे
इतर हक्कातील नाव तसेच राहीले.
P
सात-बारा सदरी इतर हक्कात नाव असलेली व्यक्ती मयत झाल्यानंतर वारस नोंदींने त्याच्या
वारसांची नावे सात-बारा सदरी दाखल झाली परंतु मयत व्यक्तीचे नाव कमी करण्यात आले नाही.
P
सात-बारा सदरी नाव दाखल आहे परंतु त्याबाबतचा फेरफार आढळून येत नाही.
P सात-बारा
सदरी इतर हक्कात बँकेचा किंवा गहाणदाराचा बोजा होता. कर्जाची परतफेड झाली तरीही आज
तो बोजा इतर हक्कात तसाच आहे.
P सात-बारा
सदरी इतर हक्कात एखाद्या व्यक्तीचे नाव फेरफार नोंदीशिवाय दाखल झाले आहे. परंतु
अशी व्यक्ती गावात उपलब्ध नाही किंवा त्या नावाचा सदर जमिनीशी काहीही संबंध
नाही.
P सात-बारा
सदरी इतर हक्कात बँकेचा जुना बोजा दाखल आहे. कर्ज घेणारी व्यक्ती मयत असून त्याच्या
वारसांची सदर कर्ज फेडण्याची तयारी आहे परंतु संबंधित बँक आता अस्तित्वात नाही,
बँकेचा ठावठिकाणा आढळून येत नाही.
P सात-बारा
सदरी इतर हक्कात तगाई, बंडीग बोजे, सावकारांची
नावे व बोजे,
रद्द
झालेल्या भूसंपादनाच्या नोंदी, आयटक बोजे इत्यादी....
शासनाकडून शेती/ जमीन सुधारणासाठी विहीर तगाई, बैल तगाई, चारा तगाई खावटी तगाई, ऑईल इंजिन तगाई, घरबांधणे तगाई, जळीत तगाई, बी-बियाणे तगाई देण्यात आल्या होत्या. सदर विविध तगाईची परतफेड करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना हप्ते ठरवून दिलेले होते. त्याची नोंद सात-बाराच्या इतर हक्कात वेळोवेळी नोंदवण्यात आली होती. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी कर्जाची फेड करून ना हरकत दाखला प्राप्त करून इतर हक्कातील बोजे कमी करून घेतले आहेत. शासनाने देखील वेळोवेळी तगाई कर्जे माफ केलेली आहेत.
शासन निर्णय क्र. टीएजी -१०८८/ प्र.क्र. २२१४ / म-११, दिनांक ३१.१२.१९८८ अन्वये वर नमुद केलेले तगाई विषयक कर्ज माफ केलेली आहेत. मात्र त्या संबंधीचे इतर हक्कातील बोजे आजही काही प्रमाणांत शिल्लक असल्याचे दिसून येते.
सदर
बोजाची रक्कम देखील महाराष्ट्र शासन- कृषी व सहकार विभाग, उगव
क्रमांक एम००८ (७०७) १६- ओ दिनांक २६.३.१९७९ अन्वये शासनाने माफ केलेली असतांनाही आजही
काही बंडीग बोजे इतर हक्कात कायम असल्याचे दिसते. तसेच आयकट बोजेही
शासनाने माफ केलेले आहेत.
"कोणताही लेखन प्रमाद किंवा अधिकार अभिलेखात किंवा या प्रकरणान्वये
ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत ज्या चुका झाल्या असल्याचे
हितसंबंधित पक्षकारांनी कबूल केले असेल किंवा ज्या चुका एखाद्या महसूल
अधिकाऱ्यास,
तो निरीक्षण करीत असताना आढळतील अशा कोणत्याही चुका जिल्हाधिकाऱ्यास कोणत्याही वेळी दुरुस्त करता येतील किंवा दुरुस्त करवून घेता येतील.
परंतु, जेव्हा एखाद्या महसूल अधिकाऱ्यास, तो निरीक्षण करीत असताना, कोणतीही चूक आढळून
आली असेल, तेव्हा पक्षकारांना नोटीस देण्यात आल्याशिवाय व वादग्रस्त
नोंदींसंबंधीच्या कार्यपद्धतीनुसार कोणत्याही हरकती असल्यास
त्या हरकती अंतिमरित्या निकालात काढल्याशिवाय अशी कोणतीही
चूक दुरुस्त करता येणार नाही."
या अधिकाराचा वापर करुन जेथे उक्त नोंदी
कमी करण्याबाबत शासनाचे, वरिष्ठ अधिकार्यांचे निर्देश प्रप्त झाले आहेत तेथे
बंडींग, तगाई इत्यादी अशा पोकळीस्त नोंदी
कमी करता येऊ शकतात.
सात-बारा
पुनर्लेखनाच्यावेळी काही चूक झाली आहे काय याची खात्री करावी.
संबंधीत
पोकळीस्त नाव किंवा नोंद कोणत्या हक्काने दाखल झाले होते ते बघावे. उदाहरणार्थ वारस
म्हणून अथवा गहाणदार म्हणून इत्यादी. तसेच आज रोजी त्या नावाला/नोंदीला कायदेशीररित्या
काही महत्व आहे काय याची पडताळणी करावी.
सर्व
हितसंबंधीतांना नोटीस बजावून त्यांचे जबाब घ्यावे. काही हितसंबंधीत आढळून येत
नसतील तर पक्षकारामार्फत स्थानिक
वर्तमानपत्रात, सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करावी. गैरहजर
हितसंबंधितांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर सुनावणीची नोटीस पंचनाम्याने डकवून
बजवण्याची व्यवस्था करावी.
कोतवाल,
पोलीस पाटील, तलाठी यांच्यामार्फत स्थानिक चौकशी करुन त्या बाबतचा अहवाल प्रकरणी समाविष्ट करावा.
(स्थानिक
चौकशी: म्हणजे कोणत्याही बाबीची खातरजमा
करण्यासाठी सरपंच, पोलीस पाटील आणि गावातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींकडे चौकशी
करून त्यांचे जबाब प्रकरणात सामील करणे.)
b|b
Comments